शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
4
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
5
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
6
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
7
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
8
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
9
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
10
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
11
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
12
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
13
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
14
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
15
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
16
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
17
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
18
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
19
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
20
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार

सिरोंचात तीन दुकाने जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2016 01:12 IST

येथील नगर पंचायत मालकीच्या चाळीतील श्रावणी केबल नेटवर्क लोकल केबलच्या दुकानाला (कंट्रोल रूम) २२ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास आग लागली.

शॉर्टसर्किटने आग : १८ लाख रूपयांचे नुकसानसिरोंचा : येथील नगर पंचायत मालकीच्या चाळीतील श्रावणी केबल नेटवर्क लोकल केबलच्या दुकानाला (कंट्रोल रूम) २२ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास आग लागली. आगीत या दुकानांबरोबरच चाळीतील इतर दोन दुकानातीलही साहित्य जळून खाक झाले. यामध्ये १८ लाख २५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. सिरोंचा येथील नगर पंचायतीच्या चाळीत श्रावणी केबल नेटवर्कचे दुकान आहे. या दुकानात सकाळच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. दुकानातील साहित्य जळण्यास सुरुवात झाली. त्याचा धूर दुकानाच्या व्हॅन्टीलेटरमधून निघत असल्याचे दिसून आले. सिरोंचा येथील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. संबंधित दुकानदाराला फोन करून याबाबतची सूचना दिली. पोलीस स्टेशनलाही कळविण्यात आले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. शटर उघडताच आगीचे डोंब बाहेर येण्यास सुरुवात झाली. युवकांनी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले होते. याच चाळीतील इतर दोन दुकाने साईकृपा टेलिकॉम स्टेशनरी व समीर सेलेक्शन्स रेडिमेड गारमेन्टस या दुकानांनाही आग लागली. श्रावणी केबल हे दुकान सीतापती लक्ष्मीनारायण गट्टुवार यांच्या मालकीचे आहे. या दुकानाचे १५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. साईकृपा टेलिकॉम स्टेशनरीचे २ लाख १५ हजार रूपयांचे नुकसान झाले. सदर दुकान राजेश डोनय्या अंकम यांच्या मालकीचे आहे. तर समीर सेलेक्शन रेडिमेड गारमेन्टस दुकान लोकनाथम राजाराम अरिगेलवार यांच्या मालकीचे आहे. त्यांच्या दुकानाचे १ लाख १० हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यादरम्यान लक्षात आले. माहिती मिळताच तहसीलदार सत्यनारायण कडार्लावार, मंडल अधिकारी मंडावार, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी पवार, ठाणेदार दीपक लुडके, पीएसआय कदम, दाबाळे, काटपे, नगराध्यक्ष राजू पेदापल्ली, बांधकाम सभापती ईश्वरम्मा बुद्धावार, नगरसेवक सतीश भोगे, वीज कंपनीचे आवारी, पेटकर घटनास्थळी दाखल झाले. महसूल विभागाच्या मार्फतीने सिरोंचाचे तलाठी गजभिये व इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. आग विझविण्यासाठी संदीप राचर्लावार, रवी चकिनारपुवार, रिजवान शेख, अश्विन अरगेला, इतायत अली, रणजीत गागापुरपू, संदीप पेंदोटी यांच्यासह सिरोंचा शहरातील युवक, महिला व नागरिकांनी सहकार्य केले. दुकानदारांना मदत देण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)गावकरी व वन विभागाचे सहकार्यआग लागली असल्याचे लक्षात येताच याबाबतची माहिती गावातील युवकांनी वन विभागाला दिली. वन विभागाचे उपवनसंरक्षक रघुनाथ शुक्ला यांच्या निर्देशानंतर वनपाल तुम्मावार यांनी पाण्याचे टँकर आणले व आग विझविण्यात आली. त्यामुळे वेगाने पसरणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविता येणे शक्य झाले. सिरोंचा हा गडचिरोली जिल्ह्यातील शेवटचा तालुका असल्याने या तालुक्यासाठी अग्निशमन वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.