शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

एटापल्ली तालुक्यातील चारपैकी तीन मार्ग खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:36 IST

एटापल्ली तालुक्यातील सर्वच प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. त्यामुळे या ...

एटापल्ली तालुक्यातील सर्वच प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास कसा करावा, असा नागरिकांसमाेर प्रश्न आहे. आलापल्ली-एटापल्ली हा मार्ग ३० किमी आहे. एटापल्ली-गट्टा ३६ कि.मी. आहे. एटापल्ली-जारावंडी हा मार्ग ५५ कि.मी. आहे. यासह एटापल्ली-मुलचेरा आदी प्रमुख चार मार्ग आहेत. एटापल्ली-मुलचेरा मार्ग चंदनवेलीपर्यंत सुस्थितीत आहे. यापुढे चंदनवेली ते बोलेपल्ली व देवदा ते मुलचेरापर्यंत मार्गाची दयनीय अवस्था आहे. सदर एक मार्ग वगळता इतर सर्वच मार्गांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. नाइलाजास्तव नागरिक कसेबसे वर्षभर प्रवास करतात. काही दिवसातच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. यावर्षीच्या तर उन्हाळ्यात रस्त्यांची दुरुस्ती हाेणे शक्य नाही. त्यामुळे यंदाच्याही पावसाळ्यात नागरिकांना या मार्गावरून प्रवास करावा लागणार आहे. आठवडाभरापासून मान्सूनपूर्व व अवकाळी पाऊस येत असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये साचत आहे. अनेक वाहनधारकांची वाहने खड्ड्यांमध्ये जाऊन त्यांची दिशाभूल हाेत आहे.

बाॅक्स

जनतेच्या समस्या मांडणार काेण?

एटापल्ली तालुका जंगलव्याप्त व नक्षलग्रस्त आहे. तालुक्यातील अनेक गावांपर्यंत अद्यापही पक्के रस्ते तयार झाले नाहीत. कच्च्या रस्त्यानेच नागरिकांना ये-जा करावी लागते. पावसाळ्यात येथील रस्त्यांवर चिखल असते. याशिवाय अनेक मार्गांवर उंच पुलांचा अभाव असल्याने पावसाळ्यात आवागमन करणे कठीण हाेते. परिसरात अद्यापही पक्के रस्ते निर्माण झाले नाही. ज्या लाेकप्रतिनिधींकडे आपल्या क्षेत्राचा विकास करण्याची जबाबदारी जनतेने दिली आहे, तेच लाेकप्रतिनिधी सर्वसामान्यांच्या समस्या साेडविण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. जिल्ह्याचे खासदार तर एटाल्ली तालुक्यात ये-जा करणे बंद केले आहे. लाेकप्रतिनिधीच जनतेच्या समस्या साेडविणार नसतील तर दुर्गम भागातील समस्या साेडविणार काेण? असा सवाल नागरिकांनी केला आहे.

===Photopath===

220521\22gad_1_22052021_30.jpg

===Caption===

रस्त्यावरील खड्ड्यात अवकाळी  पावसाचे पाणी अशाप्रकारे साचले आहे.