शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

एक एकरात तीन लाखांची मिरची

By admin | Updated: January 18, 2017 01:41 IST

येथील प्रगतशील शेतकरी मारोती कवडू बारसागडे यांनी एक एकर शेतात मिरची पिकाची लागवड केली असून यातून तीन लाख रूपयांपेक्षा

तळोधी मो. येथील शेतकरी : आधुनिक पद्धतीने लागवड मिलिंद मेडपिलवार   तळोधी मो. येथील प्रगतशील शेतकरी मारोती कवडू बारसागडे यांनी एक एकर शेतात मिरची पिकाची लागवड केली असून यातून तीन लाख रूपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सव्वा लाख रूपयांची हिरवी मिरची त्यांनी आजपर्यंत विकली आहे. मारोती बारसागडे यांची पौर नदी व वैनगंगा नदीच्या तिरावर साडेचार एकर शेती आहे. त्यापैकी एक एकर शेतीवर त्यांनी मिरची पिकाची लागवड केली. सदर मिरचीेचे उत्पादन आधुनिक पद्धतीने त्यांनी घेण्यास सुरुवात केली. संकरित पद्धतीच्या मिरचीची त्यांनी लागवड केली. मिरचीचे झाड जवळपास ४ फूट उंच वाढली आहेत. अगदी झाडाच्या देठापासून तर शेंड्यापर्यंत मिरच्या लागल्या आहेत. प्रत्येक झाडाला जवळपास एक किलो मिरची लागली आहे. आजपर्यंत त्यांनी एक लाख २५ हजार रूपयांची मिरची बाजारात विकली आहे. मिरचीबरोबरच बारसागडे यांनी टमाटर, कोबी आदी भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. शेतामध्ये चिकू, आंबा, चिंच पिकाचेही ते उत्पादन घेतात. पावसाळ्यामध्ये धानपिकाचीही लागवड केली जाते. विशेष म्हणजे १५ वर्षाअगोदर मारोती बारसागडे यांचे वडील कवडू बारसागडे यांनी बागायतीच्या उत्पन्नास सुरुवात केली. त्यावेळी या परिसरात धाना व्यतीरिक्त इतर पीक घेतले जात नव्हते. कवडू बारसागडे हे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत होते. त्यांचे प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक आहेत.