शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

शिवगाटाला जाण्यासाठी रस्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:16 IST

तालुक्यातील कन्हाळगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शिवगाटा येथे जाण्यासाठी अद्यापही रस्त्याची निर्मिती करण्यात आली नाही.

ठळक मुद्देहातपंप बंदने पाणी टंचाईचे सावट : ग्रामस्थांना चार किमीची करावी लागते पायपीट

ऑनलाईन लोकमतधानोरा : तालुक्यातील कन्हाळगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शिवगाटा येथे जाण्यासाठी अद्यापही रस्त्याची निर्मिती करण्यात आली नाही. त्यामुळे गावकºयांना जंगलातून ४ किमीची पायपीट करून गावात पोहोचावे लागते. अन् एकीकडे गावात सिमेंटचे रस्ते मंजूर करण्यात आले असून त्यांचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे गावकºयांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. स्वातंत्र्यानंतरही गावातील नागरिकांना गावात पोहोचण्यासाठी रस्त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम शिवगाटा गावात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. गावात एकमेव असलेले हातपंप एक महिन्यापासून बंद आहे. गावातील विहिरीच्या पाण्याने तळ गाठले आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात जाण्यासाठी रस्ताच नाही, ४ किमी जगंलातून पायवाट काढून गावात जावे लागते. गावातील अंतर्गत रस्त्यांवर मात्र सिमेंटचे रस्ते बनविले जात आहेत. एकीकडे लगतच्या गावात जाण्यासाठी रस्ता नाही आणि गावात सिमेंटचे रस्ते बनविले जात आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.लोकप्रतिनिधी, प्रशासनाने याकडे लक्ष देवून अगोदर गावात जाण्यासाठी रस्त्याची निर्मिती करावी, गावातील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी शिवगाटावासीयांनी केली आहे. शिवगाटा या गावात गेल्या एक महिन्यापासून वीज पुरवठा खंडीत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. एकूणच शिवगाटा या गावात विविध समस्या आवासून उभ्या झाल्या आहेत. मात्र या गंभीर समस्यांकडे कन्हाळगाव ग्रामपंचायत प्रशासनाचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. अशीच परिस्थिती धानोरा तालुक्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या अनेक गावांचे आहे. शासनाकडून विविध योजनेअंतर्गत लाखो रूपये खर्च होतात. मात्र विकास कागदावर आहे.वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी उदासीनधानोरा तालुका व अहेरी उपविभागाच्या अनेक आदिवासी बहूल दुर्गम गावात रस्ते, शाळा, वीज आदीसह विविध मूलभूत समस्या अद्यापही कायम आहेत. मात्र या समस्याकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनासह पं.स., जि.प. पदाधिकारी, आमदार, खासदार व पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठ अधिकारीही गाव विकासाबाबत गंभीर नाही.