शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

जिल्ह्यात तब्बल ८ हजार ६२६ घरकुले अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2017 01:22 IST

घर नसलेल्या गरीब व सर्वसामान्य कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनाच्या वतीने घरकुलाच्या पाच ते सहा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

लाभार्थ्यांची उदासीनता चव्हाट्यावर : शासनाकडून प्रशासनाची कान उघाडणी लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : घर नसलेल्या गरीब व सर्वसामान्य कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनाच्या वतीने घरकुलाच्या पाच ते सहा योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र लाभार्थ्यांच्या उदासीनतेमुळे गडचिरोली जिल्ह्यात सन २०१२-१३ ते सन २०१५-१६ या तीन वर्षाच्या कालावधीत इंदिरा आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेले तब्बल ८ हजार ६२६ घरकुले अद्यापही अपूर्ण स्थितीत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. विशेष म्हणजे अनुदानापोटी कोट्यवधी रूपये जिल्ह्याला देऊनही घरकूल बांधकामात जिल्हा माघारला आहे. त्यामुळे शासनाकडून प्रशासनाकडे सातत्याने विचारणा होत असून कानउघाडणीही केली जात आहे. सन २०१२-१३ वर्षापूर्वीचेही विविध शासकीय योजनांचे हजारो घरकूल अपूर्ण स्थितीत आहे. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), रमाई आवास योजना, शबरी घरकूल, आदिम जाती घरकूल व राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना आदी योजनांची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यात सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत मंजूर झालेले काही घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र पूर्ण झालेल्या घरकुलांची टक्केवारी कमी आहे. विविध शासकीय योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात हजारो घरकुले अपूर्ण स्थितीत असून तीन ते चार वर्षांपूर्वी मंजूर झालेले घरकूल काही लाभार्थ्यांनी घरकुलांचे काम अद्यापही सुरू ठेवले आहे. शासकीय योजनांमधून मंजूर झालेले सर्व घरकुलांचे काम विहित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश केंद्र व राज्य सरकारने जिल्हा व तालुका प्रशासनाला दिले होते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात घरकुलाच्या बांधकामाने गती घेतली नाही. कार्यशाळेतून होणार जागर इंदिरा आवासासह इतर सर्व शासकीय योजनेतून मंजूर करण्यात आलेले व सद्य:स्थितीत अपूर्ण असलेले घरकुलांचे काम तत्काळ पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी बाराही तालुकास्तरावर घरकूल लाभार्थ्यांची कार्यशाळा आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी २० मे २०१७ रोजी सर्व संवर्ग विकास अधिकाऱ्यांना महत्त्वाचे पत्र पाठविले आहे. कार्यशाळेत या विषयावर होणार विस्तृत चर्चा पंचायत समितीस्तरावर होणाऱ्या कार्यशाळेत घरकूल बांधकामासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये लाभार्थ्यांकडून बांधकामाची अद्यावत स्थिती नोंदवून घेणे, लाभार्थ्यांकडून बांधकाम पूर्ण करावयाचा दिनांक ठरवून त्याची नोंद करणे, लाभार्थ्यांसोबत झालेल्या करारनाम्याचे महत्त्व पटवून देणे, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे अंदाजपत्रक, बांधकाम याबाबत माहिती देणे, बांधकाम कशा प्रकारे करावे, याबाबत माहिती देणे, ग्रामीण गृह निर्माण अभियंता यांना सर्व प्रकारचे अपूर्ण व नवीन घरकुलाची यादी देऊन पोच पावती देणे, ग्राम पंचायतनिहाय मार्च २०१८ पर्यंत घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, अशा प्रकारचे नियोजन करणे आदींचा समावेश आहे. ३१ मे व २ जूनला होणार कार्यशाळा भामरागड, गडचिरोली, आरमोरी, सिरोंचा, कुरखेडा, कोरची, धानोरा, चामोर्शी, अहेरी, एटापल्ली व देसाईगंज या ११ तालुकास्तरावर पंचायत समितीमध्ये ३१ मे बुधवारला कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. तर मुलचेरा पंचायत समितीमध्ये २ जून रोजी घरकूल लाभार्थ्यांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. सदर कार्यशाळेला बीडीओ, अभियंता व ग्रामसेवक उपस्थित राहणार आहेत.