शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

...तर जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 05:00 IST

राज्याच्या अनेक शहरांत कोरोना रुग्ण पुन्हा वाढत आहेत. ही बाब विचारात घेता जिल्ह्यातही नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे अन्यथा कोरोना रुग्ण वाढू नये म्हणून जिल्ह्यात काही प्रमाणात पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या ऑनलाइन बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांची बैठक घेतली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे संकेत, कोरोनाला रोखण्यासाठी खबरदारी घ्या

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या दोन महिन्यांपासून सतत कमी होत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आता नागरिकांच्या बिनधास्तपणामुळे पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येईल, असा सूचक इशारा जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी मंगळवारी घेतलेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत दिला. राज्याच्या अनेक शहरांत कोरोना रुग्ण पुन्हा वाढत आहेत. ही बाब विचारात घेता जिल्ह्यातही नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे अन्यथा कोरोना रुग्ण वाढू नये म्हणून जिल्ह्यात काही प्रमाणात पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या ऑनलाइन बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांची बैठक घेतली. नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे, शारीरिक अंतर पाळणे तसेच गर्दी न करणे याबाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी विभागप्रमुखांना दिले.जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली असली तरी काही प्रमाणात पुन्हा रुग्ण वाढताना दिसत आहेत. ही संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी आरोग्य विभागासह पोलीस विभागाने दक्षता बाळगावी, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. नागरिकांनी कोरोनाबाबत शिस्त पाळली नाही तर पुन्हा काही प्रमाणात कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक कार्यक्रम यामध्ये यात्रा, जयंती तसेच लग्न समारंभ या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. अशा वेळी मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे प्रत्येकाला अनिवार्य आहे. त्यामुळे प्रशासनाकडून याबाबत खबरदारी म्हणून पोलीस तसेच आरोग्य विभागाने योग्य ती कारवाई करण्याची सूचना त्यांनी केली. सध्या कोरोना लसीकरण सुरू आहे व रुग्णसंख्याही या महिन्यात कमी झाली. यामुळे नागरिकांनी कोरोनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असल्याचे जाणवत आहे; परंतु राज्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात रुग्ण पुन्हा वाढत असल्यामुळे गडचिरोलीत यापुढे नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेऊन कोरोना संसर्ग वाढू न देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या बैठकीला आरोग्य विभागातील अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.

गडचिरोली शहरात वाढताहेत रुग्णगेल्या चार दिवसांत जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढले आहेत. रविवारी ७, सोमवारी ९ तर मंगळवारी ४ नवीन रुग्णांची नोंद झाली. या तीन दिवसांतील २० रुग्णांपैकी १६ रुग्ण हे गडचिरोली शहर व लगतच्या परिसरातील आहेत. ४ नवीन बाधितांमध्ये शहराच्या कन्नमवार वॉर्ड, कोटगल आणि गणेशनगरातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. याशिवाय एक जण वडसा तालुक्यातील आहे. योग्य खबरदारी न घेतल्यास इतरही तालुक्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू शकते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या