शहरं
Join us  
Trending Stories
1
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
2
Vaishnavi Hagwane Case : 'वैष्णवीचे बाळ आणायला गेलो,आम्हाला बंदूक दाखवली'; मामांनी सगळंच सांगितलं
3
 काश्मीरमधील किश्तवाड येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, दोघांना लष्कराने घेरले 
4
हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राला दिलासा नाही, पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ; बँक खात्याची चौकशी सुरूच
5
पाकिस्तानने स्वतः युद्धविरामाची चर्चा केली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला!
6
मानवतेचा महामेरु! पत्नी कॅन्सरने गेली, इतर रुग्णांची पैशांअभावी वणवण पाहता पतीची २० लाखांची देगणी
7
आधी वैभव सूर्यवंशीसोबत खोटा फोटो, आता प्रीती झिंटाची थेट कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
8
Corona Virus : बूस्टर डोस घ्यावा लागेल का? चीन आणि भारतासह ५ देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका
9
जयंत पाटलांची लागणार होती वर्णी, भाजपासोबतची बोलणी अडली; अखेर छगन भुजबळांनी संधी साधली!
10
“मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; जागावाटपाची चर्चा नको, मित्रपक्षांवर टीका टाळा”
11
नवऱ्याच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगला पोहोचली अमृता खानविलकर, हिमांशुच्या 'त्या' कृतीवर खिळल्या नजरा
12
'ग्रोव'चा सामान्य गुंतवणूकदारांना धक्का? छोटे व्यवहारही होणार महाग, ब्रोकरेज शुल्क इतक्या पटींनी वाढणार
13
दिल्ली उद्ध्वस्त करण्याची योजना, रावळपिंडीत ट्रेनिंग घेतलं! आयएसआयचे दोन हेर पोलिसांच्या ताब्यात
14
Vaishnavi Hagawane Death Case : 'दाल मे कुछ काला है'; शरद पवार गटाची रूपाली चाकणकर, चित्रा वाघ यांच्यावर खरमरीत टीका
15
मोठी बातमी! अथिया शेट्टीने बॉलिवूडला ठोकला रामराम, आई झाल्यानंतर घेतला निर्णय! चाहत्यांना धक्का
16
अनिल गोटेंनी टाळे ठोकलेल्या खोलीत पैशांचे घबाड सापडले; कुलूप तोडून पोलीस आत गेले... 
17
जगभर विनाश होईल, आर्थिक मंदी येईल...; बाबा वेंगाची भयानक भाकितं, जगाचा अंतही सांगून टाकला!
18
"पती निर्दोष, दोनदा पाकिस्तानला गेला कारण..."; शहजादला अटक होताच ढसाढसा रडली रझिया
19
दीपिका पादुकोणचे नखरेच जास्त! मानधन अन् अटी ऐकून दिग्दर्शकाने 'या' सिनेमातून काढलं
20
माझे लग्न पाकिस्तानात करून द्या, ज्योती मल्होत्राची विनंती; चॅटिंग आणि डायरीच्या नोंदीतील माहिती

जिल्ह्यातील पाणीपातळी ०.३७ मीटरने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 05:00 IST

 बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. मात्र उन्हाळ्यात अनेक भागांत पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन बसतो. विशेषत: दुर्गम व ग्रामीण भागांना याचा सर्वाधिक फटका बसत आलेला आहे. अनेक ठिकाणी ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करीत असतात.  दरम्यान मागील वर्षी पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळल्याने भूगर्भातील पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे.  भूजल सर्वेक्षण विभागाने मार्चअखेर जिल्ह्यातील ११२ विहिरींच्या पाणीपातळीचे सर्वेक्षण केले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात मागील पाच वर्षांच्या तुलनेत या वर्षी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने केलेल्या मार्चअखेरच्या पाणीपातळी तपासणीअंती जिल्ह्याच्या पाणीपातळीत ०.३७  मीटरने वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी जिल्ह्यातील अनेक भागांत पाण्याची गंभीर समस्या कायम आहे. बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. मात्र उन्हाळ्यात अनेक भागांत पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन बसतो. विशेषत: दुर्गम व ग्रामीण भागांना याचा सर्वाधिक फटका बसत आलेला आहे. अनेक ठिकाणी ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करीत असतात.  दरम्यान मागील वर्षी पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळल्याने भूगर्भातील पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे.  भूजल सर्वेक्षण विभागाने मार्चअखेर जिल्ह्यातील ११२ विहिरींच्या पाणीपातळीचे सर्वेक्षण केले. 

जिल्ह्यातील १५३ हातपंप बंद-    जिल्ह्यात बाराही तालुके मिळून एकूण १० हजार ४८४ हातपंप आहेत. यांतील ५३२ हातपंप आतापर्यंत दुरुस्त करण्यात आले आहेत; तर तब्बल १५३ हातपंप बंद अवस्थेत आहेत. हातपंप बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रातील हातपंप दुरुस्त करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

कुरखेडा, कोरची, देसाईगंजात घट-    भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने जिल्हाभरातील केलेल्या गावातील सार्वजनिक विहिरींच्या तपासणीअंती देसाईगंज, कुरखेडा व देसाईगंज (वडसा) तालुक्यांत मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणीपातळीत घट झाल्याचे निदर्शनास येत आहे. देसाईगंज तालुक्यातील पाणीपातळीत ०.२० मीटर घट आढळून आली. कुरखेडा ०.२६, तर कोरची ०.२५ मीटर एवढी घट आढळून आली आहे. यामुळे या तालुक्यातील ग्रामीण भागात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पाण्याचा याेग्य वापर करण्याची गरज आहे. 

 

टॅग्स :water shortageपाणीकपात