शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पाणीपातळी ०.३७ मीटरने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 05:00 IST

 बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. मात्र उन्हाळ्यात अनेक भागांत पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन बसतो. विशेषत: दुर्गम व ग्रामीण भागांना याचा सर्वाधिक फटका बसत आलेला आहे. अनेक ठिकाणी ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करीत असतात.  दरम्यान मागील वर्षी पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळल्याने भूगर्भातील पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे.  भूजल सर्वेक्षण विभागाने मार्चअखेर जिल्ह्यातील ११२ विहिरींच्या पाणीपातळीचे सर्वेक्षण केले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात मागील पाच वर्षांच्या तुलनेत या वर्षी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने केलेल्या मार्चअखेरच्या पाणीपातळी तपासणीअंती जिल्ह्याच्या पाणीपातळीत ०.३७  मीटरने वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी जिल्ह्यातील अनेक भागांत पाण्याची गंभीर समस्या कायम आहे. बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. मात्र उन्हाळ्यात अनेक भागांत पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन बसतो. विशेषत: दुर्गम व ग्रामीण भागांना याचा सर्वाधिक फटका बसत आलेला आहे. अनेक ठिकाणी ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करीत असतात.  दरम्यान मागील वर्षी पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळल्याने भूगर्भातील पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे.  भूजल सर्वेक्षण विभागाने मार्चअखेर जिल्ह्यातील ११२ विहिरींच्या पाणीपातळीचे सर्वेक्षण केले. 

जिल्ह्यातील १५३ हातपंप बंद-    जिल्ह्यात बाराही तालुके मिळून एकूण १० हजार ४८४ हातपंप आहेत. यांतील ५३२ हातपंप आतापर्यंत दुरुस्त करण्यात आले आहेत; तर तब्बल १५३ हातपंप बंद अवस्थेत आहेत. हातपंप बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रातील हातपंप दुरुस्त करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

कुरखेडा, कोरची, देसाईगंजात घट-    भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने जिल्हाभरातील केलेल्या गावातील सार्वजनिक विहिरींच्या तपासणीअंती देसाईगंज, कुरखेडा व देसाईगंज (वडसा) तालुक्यांत मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणीपातळीत घट झाल्याचे निदर्शनास येत आहे. देसाईगंज तालुक्यातील पाणीपातळीत ०.२० मीटर घट आढळून आली. कुरखेडा ०.२६, तर कोरची ०.२५ मीटर एवढी घट आढळून आली आहे. यामुळे या तालुक्यातील ग्रामीण भागात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पाण्याचा याेग्य वापर करण्याची गरज आहे. 

 

टॅग्स :water shortageपाणीकपात