शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पीक कर्ज भरण्याची लगबग वाढली; बँकांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 16:24 IST

Gadchiroli : व्याजमाफीसाठी धडपड सुरू; एप्रिल महिन्यापासून मिळते नवीन कर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मार्च महिना संपण्यास केवळ १३ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखांमध्ये कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी उसळत आहे.

शेतीच्या खर्चासाठी शेतकऱ्याला सरकार मार्फत अगदी शून्य टक्के व्याजदराने कर्जाचा पुरवठा केला जातो. मात्र त्यासाठी शेतकऱ्याने पीक कर्ज ३१ मार्चपूर्वी भरणे आवश्यक आहे. पीक कर्जाचा पैसा जवळपास नऊ महिने वापरता येत असल्याने पीक कर्ज घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमार्फत कर्ज वितरण केले जाते. यात सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा सहकारी बँकेमार्फत होते. खरिपातील धान नोव्हेंबर महिन्यात निघते. डिसेंबर महिन्यापासून शेतकरी भावाचा अंदाज बघून धानाची विक्री करतात. फेब्रुवारी महिन्यापासून शेतकरी कर्ज भरत असतात. १७ मार्चपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ६१.६४ टक्के कर्ज परतफेड करण्यात आली आहे.

३१ मार्चपर्यंत भरले तरच होणार व्याज माफ

  • शासनाकडून टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना दिले पीक शून्य कर्ज जाते. मात्र त्यासाठी अट म्हणजे संबधित शेतकऱ्याने कर्जाची परतफेड ३१ मार्चपूर्वी करणे आवश्यक आहे.
  • जवळपास नऊ महिने कर्ज वापरता येत असल्याने बहुतांश शेतकरी ३१ मार्चपूर्वी कर्जाची परतफेड करतात. शेवटच्या आठ दिवसांमध्ये सर्वाधिक कर्जाची परतफेड होते.

बचत गटाच्या तुलनेत फायदेशीरएप्रिलमध्ये उचलले कर्ज थेट मार्च महिन्यात भरले जाते. जवळपास १० ते ११ महिने शेतकरी बिनव्याजी पैसे वापरू शकते. त्यामुळे अनेक शेतकरी पीककर्जाची उचल करून नियमितपणे भरणा करतात. बचत गटाच्या तुलनेत पीककर्ज शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर आहे. शेतकऱ्यांनी पीककर्ज उचलावे.

सर्वाधिक कर्ज वितरण सहकारी बँकेमार्फतसेवा सहकारी संस्था व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शेतकऱ्यांशी जोडली आहे. तसेच ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांचे बँक खाते सहकारी बँकांच्या शाखेत आहेत. त्यामुळे नागरिकांना या बँकेबाबत आपुलकी वाटत असल्याने सर्वाधिक शेतकरी सहकारी बँकेतूनच कर्जाची उचल करतात.

तालुकानिहाय कर्ज वितरण व वसुली (आकडे कोटीत)तालुका          वाटप          वसुली           टक्केकोरची            ५.९५           ३.७०             ६२.२७कुरखेडा         १५.४२           ८.९०            ५७.७४देसाईगंज         ४.३६           २.९१             ६६.६९आरमोरी         १२.९२          ८.२०             ६३.४८गडचिरोली      १०.४६           ७.२०            ६८.८४धानोरा            ९.६६            ६.२०            ६४.१९चामोर्शी          ३३.४९          २१.०२            ६२.७६अहेरी             ८.३३             ४.४०            ५२.८२मुलचेरा           ४.१४            २.१२             ५१.२०भामरागड        २.१८            १.४१             ६४.४८एटापल्ली        ४.६९           २.८१             ५९.७३सिरोंचा            ५.३२            ३.२०             ६०.११एकूण            ११६.९३         ७२.०७           ६१.६४

२३ हजार ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज व्याजमुक्तशेतकऱ्यांना खरीप हंगामात सुमारे ११६ कोटी २२ लाख रुपयांच्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. त्यापैकी १४ हजार ४६ सदस्यांनी कर्ज भरले आहे.

"शून्य टक्के व्याज दराचा लाभघेण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ मार्चपूर्वी पीक कर्जाचा भरणा करावा. एप्रिल महिन्यात पुन्हा नवीन खरीप हंगामाचे कर्ज वितरण केले जाते. १७ मार्चपर्यंत ६१.६४ टक्के कर्जवसुली झाली आहे. ३१ मार्चपूर्वीपर्यंत २५ टक्क्यांच्यावर कर्जवसुली होईल, असा अंदाज आहे."- सतीश आयलवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक, गडचिरोली

टॅग्स :farmingशेतीbankबँकGadchiroliगडचिरोली