शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

कंट्राेल रूममधून राेखणार कृषी निविष्ठांचा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 05:00 IST

शेतकऱ्यांना बियाणांची निवड करताना अडचणी येतात. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत तक्रारी करता याव्यात, यासाठी जिल्हास्तरावर कंट्राेल रूम स्थापन करण्यात आले आहे. सदर कंट्राेल रूममध्ये राज्यशासनाचा कृषी विभाग व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. तक्रार नाेंदविल्यानंतर लगेच शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण केले जाणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : खरीप हंगामात बियाणे, खते व कीटकनाशकांचा काळाबाजार हाेताे. यात शेतकऱ्यांची फसवणूक हाेते. तसेच शेतकऱ्यांना तक्रारी करण्यासाठी साेयीसुविधा नसते. ही साेय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष (कंट्राेल रूम) स्थापन करण्यात आले आहे. खते, बियाणे व इतर बाबीसंदर्भात काळाबाजार दिसताच थेट नियंत्रण कक्षात तक्रार देता येणार आहे. चालू खरीप हंगामाला काही दिवसांतच सुरूवात हाेणार आहे. बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. अशावेळी शेतकऱ्यांना बियाणांची निवड करताना अडचणी येतात. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत तक्रारी करता याव्यात, यासाठी जिल्हास्तरावर कंट्राेल रूम स्थापन करण्यात आले आहे. सदर कंट्राेल रूममध्ये राज्यशासनाचा कृषी विभाग व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. तक्रार नाेंदविल्यानंतर लगेच शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण केले जाणार आहे. कृषी निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंगबाबत असलेल्या तक्रारींचे निवारण केले जाईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्ताेळी यांनी दिली.

या क्रमांकावर नाेंदवा तक्रार-    कृषी निविष्ठांबाबत असलेल्या तक्रारी कृषी विभागापर्यंत पाेहाेचविण्यासाठी शेतकऱ्यांना ९४०४५३५४८१ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. हा क्रमांक शेतकऱ्यांना तक्रार नाेंदविण्यासाठी समपात (डेडीकेटेड) करण्यात आला असून सकाळी ८ ते रात्री ८ वाजतापर्यंत शेतकऱ्यांना भ्रमणध्वनीवर तक्रार नाेंदविता येईल. 

शेतकऱ्यांनी काय खबरदारी घ्यावी?

-    खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर कृषी केंद्रांवर निविष्ठा खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी उसळते. अशावेळी शेतकऱ्यांची फसवणूक हाेण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच कृषी  निविष्ठा खरेदी करावी. बियाणे खरेदी करताना खरेदीची पक्की पावती, लाॅट नंबर, अंतिम मुदत तपासावी. साेबतच ते जपून ठेवावे. अनधिकृत विक्रेत्याकडून बियाणे खरेदी करू नये, असे जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम यांनी कळविले.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती