शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

तेंदू लिलावांकडे ठेकेदारांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 22:33 IST

गडचिरोली जिल्ह्यातील वर्षातील सर्वात मोठा व्यवसाय असलेल्या तेंदूपत्त्यावर यावर्षी मंदीचे सावट आहे.

ठळक मुद्देजाचक अटी, मंदीचा परिणाम : यावर्षी व्यवसायावर मोठे संकट!

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील वर्षातील सर्वात मोठा व्यवसाय असलेल्या तेंदूपत्त्यावर यावर्षी मंदीचे सावट आहे. कोट्यवधीची उलाढाल असलेल्या या व्यवसायाकडे यावर्षी ठेकेदारांनी पाठ फिरविल्यामुळे ग्रामसभांपुढे आर्थिक संकट उभे ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अहेरी उपविभागात तेंदुपत्ता व्यवसायावर आदिवासी नागरिकांचे वार्षिक आर्थिक नियोजन असते. मागील वर्षी तेंदूपत्त्याला खूप चांगला दर मिळाला. मजुरांना बोनसची चांगली रक्कमही मिळाली. ठेकेदार वृत्तपत्रात जाहीरात न येतासुध्दा स्वत: माहीती घेवुन लिलावाच्या दिवशी हजर राहायचे. यावर्षी मात्र उलट परस्थिती दिसत आहे.बुधवारी तालुक्यातील तोडसा ग्रामपंचायतअंतर्गत तोडसा येथे तेंदूपत्ता लिलाव ठेवण्यात आला होता. याकरीता सरपंच, सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या सर्व गावातील नागरिक, तसेच ग्रामसेवक व पंचायत समीतीचे कर्मचारी उपस्थित होते. ग्रामस्त तब्बल दोन - अडीच तास ठेकेदारांची वाट पहात होते. परंतु एकही ठेकेदार न आल्याने शेवटी सरपंच प्रशांत आत्राम यांनी लिलावासाठी पुढची तारीख जाहीर केली.लिलावाला ठेकदार येत नसल्यांचे चित्र याच वर्षी पहायला मिळत आहे. तेंदूपत्ता लिलाव न झाल्यांस गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी नागरिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता आहे.मागील वर्षी खरेदी केलेला तेंदुपत्ता गोदामात पडून आहे. तेंदू पत्त्यावर यावर्षी मंदीचे सावट आहे. जीएसटीसह शासनाच्या जाचक अटी, नोटाबंदी, पोलिसांची तेंदू ठेकेदारावरील कारवाई अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळे यावर्षी तेंदू ठेकेदार तेंदुपत्ता लिवाव घेण्याची शक्यता कमीच आहे.- अशोक मल्लेलवार,तेंदू ठेकेदार, गडचिरोली