शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईनच हव्या; पालकांनी केले निर्णयाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:38 IST

गडचिराेली : राज्याच्या शालेय शिक्षणमंत्र्यांनी इयत्ता दहावी व बारावीच्या बाेर्डाच्या परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ऑफलाईनच घेण्यात येणार ...

गडचिराेली : राज्याच्या शालेय शिक्षणमंत्र्यांनी इयत्ता दहावी व बारावीच्या बाेर्डाच्या परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ऑफलाईनच घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. गडचिराेली जिल्ह्यात इंटरनेट कनेक्टिव्हीटीची सुविधा प्रभावी नाही. शाळा, संस्था व प्रशासनाकडे अद्यावत तांत्रिक सुविधा नाही. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेण्यास बऱ्याच अडचणी येऊ शेतात. त्यामुळे गडचिराेलीसारख्या मागास जिल्ह्यात दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाॅईनच घ्याव्या, अशी इच्छा जिल्ह्यातील पालकांनी लाेकमतकडे व्यक्त केली.

विदर्भासह महाराष्ट्र राज्यात काेराेनाच्या दुसऱ्या टप्प्याची लाट हळूहळू सुरू झाली आहे. मात्र पूर्व विदर्भातील गडचिराेली, चंद्रपूर या जिल्ह्यात काेराेना पाॅझिटीव्ह रुग्ण माेठ्या संख्येने नाहीत. त्यामुळे येथे ऑफलाईन परीक्षा घेण्यास काही हरकत नाही. काेविडचे सर्व नियम पाळून प्रत्यक्ष केंद्रावर ऑफलाईन परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांनाही साेयीचे जाईल. गडचिराेली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण ज्ञान नाही. त्यामुळे ऑफलाईनच पर्याय चांगला आहे.

गडचिराेली जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या जि.प.च्या दहा माध्यमिक शाळा आहेत. याशिवाय खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित व विनाअनुदानित शाळा आहेत. मुलेचरा तालुक्यात बंगालीभाषिक व माडीया भाषिक विद्यार्थी व पालक आहेत. या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उत्तरपत्रिका साेडविण्याची सवय आहे. गाेंडवाना विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दिवशी प्रचंड गाेंधळ उडाला. त्यानंतर त्यांनी लाखाे रुपये खर्च करून विशिष्ट ॲप खरेदी करून परीक्षा ऑनलाईनरित्या यशस्वी पार पाडण्यात आली.

काेट....

दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते?

गाेंडवाना विद्यापीठाकडे स्वतंत्र ॲपची व्यवस्था असल्याने त्यांनी घेतलेली ऑनलाईन परीक्षा यशस्वी झाली. शिक्षण विभाग, शाळा व संस्थांकडे पुरेशा प्रमाणात तांत्रिक सुविधा नाही. शिवाय दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हीटीची माेठी समस्या आहे.

- देविदास डाेंगरे, पालक

———————-

अहेरी उपविभागात शासनाच्या वतीने दूरसंचार सेवेचे टाॅवर उभारण्यात आले. मात्र इंटरनेटची गती राहत नाही. त्यामुळे या भागात इयत्ता दहावीची ऑनलाईन परीक्षा घेण शक्य हाेणार नाही. बऱ्याच तांत्रिक अडचणी असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ शकते.

- विजय साेनकुसरे, पालक

———————-

माझी मुलगी पहिल्या वर्गापासून नववीपर्यंत ऑफलाईन परीक्षा देत आहे. काेराेनामुळे माेबाईलवर गृहपाठ करीत आहे. मात्र बऱ्याचदा कव्हरेज राहत नसल्याने ऑनलाईन शिक्षणात अडचणी आल्या. आता प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्याने परीक्षाही केंद्रांवर व्हाव्या.

- अल्का गेडाम, पालक

काेट...

बारावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते?

काेराेना संसर्गामुळे खबरदारी म्हणून गेल्या पाच-सहा महिने माेबाइलच्या सहाय्याने ऑनलाईन शिक्षण घेण्याचा मुला-मुलींनी प्रयत्न केला. मात्र, प्रत्यक्ष अध्ययन, अध्यापन व ऑनलाईनरित्या हाेणारे अध्ययन, अध्यापन यात बरीच तफावत आहे. त्यामुळे परीक्षा ऑफलाईनच व्हावी.

- रवींद्र टिंगुसले, पालक

——————————

काेराेना महामारीच्या समस्येमुळे माझ्या मुलीस बरेच विद्यार्थी अभ्यासात मागे पडले. आता प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्याने अभ्यासाला वेग आला आहे. ऑनलाईन परीक्षा घेण्यास हरकत नाही. मात्र तेवढी परिपूर्ण व्यवस्था शिक्षण विभागाने करावी. पाल्यांचे नुकसान सहन करणार नाही.

- बंडूजी लाेनबले, पालक

————————————

अंकिसा व झिंगानूर भागात कव्हरेज राहत नसल्याने फाेन लागत नाही. इंटरनेट कनेक्टिव्हीटीचा प्रश्न गंभीर आहे. या भागात ऑफलाईन परीक्षा घेणे म्हणजे विद्यार्थ्यांना अपयशाकडे घेऊन जाणे, असाच प्रकार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेची सवय नाही.

- प्राजक्ता शेंडे, पालक