शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

संचारबंदीतही तेंदूपत्ता संकलन तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:35 IST

जिल्ह्यातील दुर्गम भागातील जनतेला तेंदूपत्ता संकलनाच्या माध्यमातून जवळपास महिनाभराचा राेजगार उपलब्ध हाेते. महिनाभरात बरीच कमाई हाेत असल्याने तेंदूपत्ता संकलनाची ...

जिल्ह्यातील दुर्गम भागातील जनतेला तेंदूपत्ता संकलनाच्या माध्यमातून जवळपास महिनाभराचा राेजगार उपलब्ध हाेते. महिनाभरात बरीच कमाई हाेत असल्याने तेंदूपत्ता संकलनाची नागरिक प्रतीक्षा करीत राहतात. मागील वर्षी काेराेनामुळे कडक लाॅकडाऊन करण्यात आले हाेते. याचा माेठा परिणाम तेंदूपत्ता संकलनावर झाला हाेता. जिल्हाबंदीमुळे गावापर्यंत कंत्राटदारच पाेहाेचू शकले नाही. त्यामुळे अनेक गावांमध्ये तेंदूपत्याचे लिलावच झाले नाही. परिणामी तेंदूपत्त्यापासून मिळणाऱ्या राॅयल्टीसह गावातील नागरिकांचा राेजगार हिरावला गेला. आधीच काेराेनाचे संकट त्यात राेजगारही गेल्याने नागरिक आर्थिक अडचणीत सापडले हाेते. यावर्षी मात्र तेंदूपत्त्याला चांगला भाव मिळाला आहे. तसेच तेंदूपत्ता संकलनाचे काम काेणत्याही अडथळ्याविना सुरू आहे. मागील १५ दिवसांपासून तेंदूपत्त्याचे संकलन सुरू आहे. पुन्हा आठ दिवस तेंदूपत्ता संकलनाचे काम चालणार आहे. काही फळ्यांवरचा तेंदूपत्ता कंत्राटदारांनी उचलण्यास सुरूवात केली आहे. तेंदूपत्त्याची उचल करण्यातूनही काही प्रमाणात राेजगार उपलब्ध हाेतो.

बाॅक्स

उत्तरेकडील तालुक्यांना वाघांमुळे फटका

गडचिराेली, धानाेरा, आरमाेरी, देसाईगंज या तालुक्यांमध्ये वाघ व बिबट्यांची संख्या वाढली आहे. तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या नागरिकांवर वाघांचे हल्ले झाले आहेत. आतापर्यंत गडचिराेली तालुक्यातील तीन महिलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही गावच्या फळ्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचा राेजगार हिरावला गेला आहे. तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात दूरपर्यंत जावे लागते, अशावेळी वाघांकडून हल्ला हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाघांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत आहे.

बाॅक्स

पावसाचा फटका

अधूनमधून अवकाळी पाऊस पडत आहे. वादळामुळे तेंदूपत्त्याचे पुडे उडून जात असल्याने कंत्राटदारांचे नुकसान हाेत आहे. तसेच पावसामुळे तेंदूपत्ता ओला हाेत असल्याने ताे पुन्हा वाळण्यास काही कालावधी लागतो. पूर्वी बाहेरगावचे मजूर तेंदूपत्ता संकलनासाठी जात हाेते. ते गावाच्या जवळच जंगलात झाेपड्या उभारून राहात हाेते. आता मात्र बाहेरगावचे मजूर राहत नाही. गावातीलच मजूर तेंदूपत्त्ता संकलन करीत असल्याने ते सुरक्षित राहतात.