शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

मर्जीतल्या कंत्राटदाराला दिले तेंदू युनिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2017 01:13 IST

पेसा अधिनियम व शासन निर्णयानुसार जाहीर लिलाव प्रक्रिया राबवून तेंदू युनिट विकणे ग्रामसभांना बंधनकारक आहे.

कोरची तालुका : ग्रा.पं. पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलिसांकडे धावकोरची : पेसा अधिनियम व शासन निर्णयानुसार जाहीर लिलाव प्रक्रिया राबवून तेंदू युनिट विकणे ग्रामसभांना बंधनकारक आहे. मात्र स्वत:च्या स्वार्थासाठी कोरची क्षेत्रातील काही लोकांनी जाहिरात न देता महाग्रामसभा स्थापन करून व कंत्राटदारांशी संगणमत करून खास कंत्राटदारांना तेंदू युनिट विकले. त्यामुळे ग्रामसभांना अत्यल्प किंमत मिळाली. या प्रकाराची तक्रार काही ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी १२ मार्च रोजी कोरची पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. मात्र खास कंत्राटदार व महाग्रामसभांचे वजन अधिक असल्याने पोलिसांनीही या तक्रारीची दखल घेतली नाही.पेसा अधिनियम व शासन निर्णयानुसार तेंदू युनिट विक्रीचा अधिकार ग्राम पंचायतीअंतर्गत ग्रामसभांना देण्यात आला आहे. कोरची तालुक्याची भौगोलिकदृष्ट्या कोरची व कोटगूल अशा दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. तालुक्यातील एकूण १२५ गावांपैकी ८१ गावे कोरची परिसरात तर ४४ गावे कोटगूल क्षेत्रात समाविष्ट आहेत. कोटगूल क्षेत्रातील कोटगूल, मोठा झेलिया, पिटेसूर, कोसमी क्र. २, नांगपूर व सोनपूर या ग्रा. पं. अंतर्गत ४४ गावांच्या ग्रामसभांनी वृत्तपत्रात रितसर जाहिरात देऊन तेंदू युनिटची लिलाव प्रक्रिया राबविली. यात ग्रामसभांना प्रती गोणी ११ हजार ते १४ हजार ७२५ असा दर तेंदू युनिटवर मिळाला. मात्र कोरची क्षेत्रातील काही लोकांनी महाग्रामसभा स्थापन केली. कंत्राटदारांना बोलावून त्यांच्याशी संगणमत करून वृत्तपत्रात कुठल्याही प्रकारची जाहिरात न देता प्रत्यक्ष कंत्राटदाराला कोरची क्षेत्रातील ८१ गावांमधील तेंदू युनिट देण्याचे ठरविले. त्यानुसार टेंभली, कालापाणी युनिटमध्ये ८०९ रूपये, बेडगाव युनिटमध्ये २ हजार ९१, बेतकाठी युनिटचे ८ हजार १२१, मसेली युनिटचे ७ हजार २०, मर्केकसा -४ हजार ८०० तर नवेझरी युनिटला ७ हजार २० रूपये प्रती गोणी असा दर देण्याचे ठरले. कंत्राटदार व महाग्रामसभेच्या पदाधिकाऱ्यांमध्येच हा सौदा झाला. यावर मसेली, मुरकुटी व बोदालदंड ग्राम पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी हा सौदा आम्हाला मान्य नसल्याचे सांगून त्याविरोधात एकत्र आले. या प्रकाराची तक्रार कोरची पोलीस ठाण्यात ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांनी दाखल केली. मात्र अद्यापही कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे लेखी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. कंत्राटदार व महाग्रामसभेच्या संगणमतामुळे आमच्या ग्रामसभांच्या तेंदू युनिटला अत्यल्प भाव मिळाला, त्यामुळे आर्थिक नुकसान झाले, असे निवेदनात म्हटले आहे. चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)मार्च महिन्यातच जंगलाला लागली आगमार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खुट कटाईचे काम करण्यात आले. त्यानंतर अगदी काही दिवसातच कोरची तालुक्यातील जंगलाला आगी लागण्यास सुरूवात झाली. तेंदूची लहान रोपटे आगीत जळाल्यानंतर त्याला बुंध्यापासून नवीन पालवी फुटते. यातून मिळणारा तेंदूचा दर्जा अतिशय चांगला असतो. त्याचबरोबर पानेही अधिक येतात, असा गैरसमज नागरिक व तेंदू कंत्राटदाराचा झाला असल्याने जंगलाला आगी लावण्याचे प्रमाण वाढत आहे. आगी लावण्यासाठी तेंदू कत्राटदारच जबाबदार असल्याचे दिसून येत आहे.