शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

चामोर्शी तालुक्यातील दहा हजार शेतकरी बोनसपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:40 IST

यावर्षी धान खरेदी प्रक्रिया फार गुंतागुंतीची होती. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपले धान विकले व प्रति क्विंटलमागे मिळणारा ७०० रुपये ...

यावर्षी धान खरेदी प्रक्रिया फार गुंतागुंतीची होती. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आपले धान विकले व प्रति क्विंटलमागे मिळणारा ७०० रुपये बोनस मिळेल या आशेने गेल्या दोन महिन्यांपासून आहेत. गतवर्षी या कालावधीत शेतकऱ्यांना बोनस मिळाले होते, त्यामुळे खरीप हंगामातील बी बियाणे, तसेच लागवड खर्च करण्यासाठी थोडीफार मदत झाली होती. यावर्षी खरीप हंगाम तोंडावर आला असताना अजूनही बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. दरवर्षी शेतकरी खरीप हंगामात सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून बँकांकडून कर्ज घेत असतात व ते परतफेडसुद्धा करतात; मात्र यावर्षी ऐन धान परिपक्व होण्याच्या मार्गावर असताना पीक रोगाच्या स्वाधीन झाले, तसेच उरलेले पीक बांधणी व कापणी करताना पावसामुळे धान शेतातच भिजवून गेले, त्यामुळे धानाला अपेक्षित भावसुद्धा मिळाला नाही. केवळ ५० टक्के उत्पादनावर वर्षभराचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले असताना कोरोना महामारी संकट आल्याने कोणतेही काम मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पदरी असलेल्या पैशातून गेले दोन महिन्यांपासून दैनंदिन खर्च करावा लागत आहे. खरीप हंगाम सुरू होण्याअगोदर बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी सहारे व भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.