शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

पोचमार्गावरील खड्ड्यांमुळे तेलंगणा प्रवास अडचणींचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:42 IST

आंतरराज्य पूल बनल्यानंतर लगेच एका महिन्यातच तेलंगणा सरकारने पुढाकार घेत असिफाबाद डेपोतील बस गुडेममार्गे अहेरी व आलापल्लीपर्यंत सोडण्याची सुरुवात ...

आंतरराज्य पूल बनल्यानंतर लगेच एका महिन्यातच तेलंगणा सरकारने पुढाकार घेत असिफाबाद डेपोतील बस गुडेममार्गे अहेरी व आलापल्लीपर्यंत सोडण्याची सुरुवात केली. ज्यामुळे रोटी-बेटीचे संबंध असलेले कित्येक प्रवासी त्या बसने प्रवास करत असत. अहेरी उपविभागातील तेलंगणाकडे जाणारे प्रवासी अहेरी व आलापल्लीमधून निवांतपणे प्रवास करत होते; परंतु दहा दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने पूर्वीपासूनच खराब असलेल्या रस्त्याची आणखी दुर्दशा केल्याने त्या रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहे. ज्यामध्ये एक ट्रकही उलटला होता आणि तेव्हापासून तेलंगणामधून येणाऱ्या बसेसच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. रद्द झालेल्या बसफेऱ्यांचा प्रभाव प्रवाशांवर मोठ्या प्रमाणात पडला आहे. आता प्रवाशांना स्वतःच्या मालकीची चारचाकी किंवा ऑटोच्या साहाय्याने गुडम गाठावे लागत आहे; पण त्यातही दुर्घटनाग्रस्त ठरू शकणाऱ्या त्या रस्त्यावर प्रवास मात्र करावाच लागत आहे. आंतरराज्य पुलापासून राज्यमार्गपर्यंत येणारा पोच व जमीन अधिग्रहणासाठी माजी राज्यमंत्री व आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी ७० कोटी रुपयांची रक्कम मंजूरसुद्धा केली आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल; पण अद्यापही तात्पुरता मार्ग रहदारी योग्य नसल्याने व त्या मार्गाकडे शासन व प्रशासनाच्या लक्ष देणे गरजेचे आहे. शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे ही समस्या प्रवाशांवर ओढवली आहे.

बाॅक्स

बसफेऱ्या अजुनही पूर्ववत नाहीत

तेलंगणातील असिफाबाद डेपोमधून अहेरी व आलापल्लीसाठी सकाळी ६.३० वाजता, १०.३० दुपारी १२.०० वाजता, ३.०० वाजता त्यानंतर सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत, अशा पाच फेऱ्या चालत असल्याने प्रवाशांना आप्तस्वकीयांना भेटण्यासाठी सहज सुविधा मिळत होती. ती पूर्णपणे बंद झाली आहे; परंतु आता तरी महाराष्ट्र प्रशासनाने याकडे लक्ष देऊन बस पूर्ववत सुरू होतील, अशी व्यवस्था करून देण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

बॉक्स

तळीरामांची अवस्था भीतीदायक

अहेरीतून २ किमी अंतरावर असलेल्या गुडेम येथे आपली हौस पूर्ण करण्यासाठी नियमित जाणाऱ्या तळीरामांनासुद्धा या खड्डे पडलेल्या मार्गाचा नाहक त्रास होत आहे. त्यामुळे त्यांच्या मनात भीतीदायक अवस्था निर्माण झाली आहे. जाताना प्रत्येक जण स्वतःला आवरतच जातो; पण येताना तोल संभाळणे कठीण होत आहे.

110921\img_20210911_162838.jpg

पोचमार्गावर पडलेले खड्डे