शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाकडे शिक्षकांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:26 IST

जिल्हाभरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा गुरुवारपासून सुरू झाल्या. शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये काेराेना पसरू नये यासाठी शिक्षण विभागाने सर्व माध्यमिक ...

जिल्हाभरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा गुरुवारपासून सुरू झाल्या. शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये काेराेना पसरू नये यासाठी शिक्षण विभागाने सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना शाळा सुरू होण्याच्या काही दिवसांपूर्वी काेराेनाची लस घेणे आवश्यक केले होते. ज्या शिक्षकांनी काेराेनाच्या दोन्ही लस घेतल्या आहेत. त्यांना चाचणीतून वगळण्यात आले होते, मात्र ज्यांनी एकच डाेस घेतला किंवा एकही डाेस घेतला नाही, अशांना मात्र काेराेना चाचणी करणे आवश्यक करण्यात आले होते.

गडचिरोली जिल्ह्यात एकूण २५९ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. जवळपास तीन हजार शिक्षक या शाळांमध्ये कार्यरत आहेत. शाळेत जाण्यापूर्वी कोरोना चाचणी करणे शिक्षण विभागाने आवश्यक केले असले तरी अनेक शिक्षकांनी हा नियम धाब्यावर बसविला असल्याचे दिसून येत आहे. केवळ एक ते दोन टक्केच शिक्षकांनी शाळा सुरू होण्यापूर्वी चाचणी केली. अनेक शिक्षक शहरात वास्तव्यास राहतात. शहरातून ग्रामीण भागात असलेल्या शाळेत दर दिवशी ते ये-जा करतात. काेराेनाचा प्रसार प्रामुख्याने शहरी भागात अधिक असल्याने या शिक्षकांपासून विद्यार्थ्यांना काेराेनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ज्या शिक्षकांनी कोरोना लसचा एक डोस घेतला आहे किंवा ज्यांनी अजिबात लस घेतली नाही त्या शिक्षकांना काेराेना चाचणी सक्तीची करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

सोमवारपासून वाढणार उपस्थिती

शासनाच्या आदेशानुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा दि. १५ जुलैपासून सुरू करण्यात आल्या असल्या तरी काही ग्रामपंचायतींनी शाळा सुरू करण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण २५९ शाळांपैकी गुरुवारी केवळ १९६ शाळा सुरू झाल्या. पहिल्या दिवशी जवळपास २५ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आढळून आली सोमवारपासून विद्यार्थी उपस्थिती पुन्हा वाढण्याची शक्यता शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे.

पूर्वीप्रमाणे शिबिर नाही

मागील वर्षीच्या शैक्षणिक सत्रात शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शिक्षकांना काेराेना चाचणी करणे आवश्यक केले होते. त्यासाठी आरोग्य विभागाने स्वतंत्र शिबिर आयोजित केले होते. यावर्षी मात्र आरोग्य विभागाने शिबिरांचे आयोजन केले नाही. त्यामुळे बहुतांश शिक्षकांनी काेराेना चाचणी केली नाही.

पहिल्या दिवशी उपस्थिती

आठवी

एकूण विद्यार्थी-१६,११७

उपस्थिती- ३,२९५

नववी

एकूण विद्यार्थी- १६,९८९

उपस्थिती -३,५६१

दहावी-

एकूण विद्यार्थी- १६,८५७

उपस्थिती-३,४५७

बारावी-

एकूण विद्यार्थी-१३,१४८

उपस्थिती- ३,१२६

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

एकूण शाळा- २५९

एकूण शिक्षक-३,०००