शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

गावागावांत जाऊन शिक्षक करीत आहेत पुस्तकांचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:25 IST

भेंडाळा : यंदा शिक्षण विभागाने इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत पुस्तकांचे मोफत वाटप अजूनपर्यंत केले नाही. तसेच २० टक्के पुस्तकांचा ...

भेंडाळा : यंदा शिक्षण विभागाने इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत पुस्तकांचे मोफत वाटप अजूनपर्यंत केले नाही. तसेच २० टक्के पुस्तकांचा पुनर्वापर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे तालुक्यातील शिक्षक गावागावांत जाऊन विद्यार्थ्यांकडून जुनी पुस्तके मागत आहेत.

बऱ्याचशा शाळांनी इयत्ता पाचवी व आठवीचे ऑनलाईन क्लासेस सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांना सध्या पुस्तकाचा पुरवठा न झाल्यामुळे त्यांचा हिरमोड होत आहे. आता शाळा सुरू होऊन जवळजवळ महिना होतं आहे तरी काही विद्यार्थ्यांना पुस्तकेच मिळाली नसल्याने ऑनलाइन धडे देताना अडचणी येत आहेत. शिक्षण विभागाने गतवर्षी पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना दिलेल्या २० टक्के पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. या उपक्रमातून कागदाची बचत होऊन झाडांचे संवर्धन होण्यास मदत होणार असे सांगितले होते.

२०१९-२० किंवा २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात जुनी वापरलेली पाठ्यपुस्तके शाळेत जमा करावीत, असे आवाहन शाळांनी पालक आणि विद्यार्थ्यांना केले होते. पण, अजूनपर्यंत पूर्णतः विद्यार्थ्याची जुनी पुस्तके शाळेत परत केलेली नाहीत. त्यामुळे शिक्षकांनीच घरोघरी फिरून पुस्तकांचे संकलन करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

बाॅक्स

शाळांना पुस्तके पडतात कमी

काही माेठ्या शाळा आहेत. त्यातील पटसंख्या नेहमी कमीजास्त हाेत राहते. दरवर्षीच पटसंख्येच्या तुलनेत कमी प्रमाणात पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला जाते. त्यामुळे पुस्तकांचे संकलन केले जात आहे. तसेच मागील वर्षी शाळाच सुरू झाल्या नाहीत. परिणामी काही विद्यार्थ्यांकडील पुस्तका चांगल्या असल्याने त्यांचा वापर करणे शक्य आहे.

180721\0649img_20210714_145141.jpg

शिक्षक गावागावांत जाऊन पुस्तकाचे संकलन करून नवीन विद्यार्थ्यानां देत आहेत पुस्तके