शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

तेंदूपत्ता व्यवसायावर मंदीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:11 IST

देशभरातील बाजारपेठेत तेंदूपत्त्याच्या व्यवसायावर मंदीचे सावट आहे. काही व्यापाऱ्यांकडे गतवर्षी खरेदी केलेला तेंदूपत्ता अजूनही शिल्लक आहे. परिणामी कंत्राटदारांचे प्रचंड नुकसान झाल्याने त्यांनी तेंदूपत्त्याच्या लिलावांकडे पाठ फिरविली आहे.

ठळक मुद्देलिलावाकडे कंत्राटदारांची पाठ : अर्ध्यापेक्षा अधिक तेंदूपत्ता गोदामांमध्ये पडून

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशभरातील बाजारपेठेत तेंदूपत्त्याच्या व्यवसायावर मंदीचे सावट आहे. काही व्यापाऱ्यांकडे गतवर्षी खरेदी केलेला तेंदूपत्ता अजूनही शिल्लक आहे. परिणामी कंत्राटदारांचे प्रचंड नुकसान झाल्याने त्यांनी तेंदूपत्त्याच्या लिलावांकडे पाठ फिरविली आहे. आजपर्यंत ५० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी तेंदूपत्त्याचा लिलाव आयोजित केला होता. मात्र एकाही कंत्राटदाराने हजेरी लावली नाही. त्यामुळे तेंदूपत्ता संकलन अडचणीत आले आहे.पेसा कायद्यांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात जवळपास १ हजार २०० गावांना तेंदूपत्ता संकलनाचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. यापैकी ५६ गावे वगळता उर्वरित सर्वच गावांनी स्वत:च तेंदूपत्ता खरेदी करण्याचा निर्णय यावर्षी घेतला. २०१६-१७ मध्ये तेंदूपत्ता संकलनाचे पहिले वर्ष असल्याने गावकऱ्यांना अनुभव नव्हता. त्यामुळे कंत्राटदाराच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तीन हजार ते पाच हजार रूपये प्रती स्टॅन्डर्ड बॅग (एक हजार तेंदूपुडा) दराने तेंदूपत्त्याची विक्री केली. वृत्तपत्रात जाहिरात देऊन तेंदूपत्त्याची विक्री झाल्यास अधिक किंमत मिळू शकते.ही बाब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीत येणाºया गावांमधील तेंदूपत्ता लिलावाची जाहिरात द्यावी, असे निर्देश दिले. त्यानुसार मागील वर्षी जाहिराती देण्यात आल्या. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. कंत्राटदारांमध्ये स्पर्धा होऊन तेंदूपत्त्याचा भाव प्रती स्टॅन्डर्ड बॅग १२ हजार ते २२ हजार रूपयांपर्यंत पोहोचला. याचा फार मोठा लाभ ग्रामसभांना मिळाला.तेंदूपत्त्याच्या बाजारपेठेत प्रचंड मंदीचे सावट निर्माण झाले आहे. कंत्राटदारांनी मागील वर्षी चढ्या भावाने तेंदूपत्ता खरेदी केला होता. मात्र तेवढी किंमत बाजारपेठेत मिळाली नाही. पुढे भाव वाढतील या उद्देशाने तेंदूपत्ता साठवून ठेवला. मात्र मंदीचे सावट न हटल्याने भाव वाढू शकला नाही. परिणामी काही कंत्राटदारांचे गोदाम अजुनही तेंदूपत्त्याने भरून आहेत. त्यामुळे सदर कंत्राटदार यावर्षी तेंदूपत्ता खरेदी करण्यास इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. तेंदूपत्ता संकलनाच्या कामाला मे महिन्याच्या शेवटी सुरूवात होणार आहे. १०० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींनी जाहिरात काढून लिलाव आयोजित केला. मात्र लिलावाला एकही कंत्राटदार आला नाही. त्यामुळे तेंदूपत्त्याची विक्री झाली नाही. परिणामी ग्रामसभांना दुसऱ्यांदा लिलाव ठेवावा लागत आहे. दुसºयाही फेरीत कंत्राटदार हजेरी लावतील, याची शाश्वती राहिली नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली असल्याचे दिसून येत आहे.वन विभागाला मिळाला गतवर्षीच्या तुलनेत केवळ १० टक्के दरगडचिरोली वगळता विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तेंदूपत्त्याचे लिलाव झाले आहेत. यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत केवळ १० टक्के भाव मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाचे १० युनिट आहेत. पहिल्या दोन राऊंडला एकाही कंत्राटदाराने निविदा भरली नाही. तिसºया वेळी एका युनिटसाठी केवळ एकाच कंत्राटदाराने निविदा भरली आहे. मागील वर्षी वन विभागाला पाच ते सात हजार रूपये प्रति स्टॅन्डर्ड बॅग भाव मिळाला होता. यावर्षी मात्र ४०० ते ५०० रूपये भाव मिळाला आहे. यामुळे वन विभागाचेही प्रचंड नुकसान झाले आहे.जिल्हाभरातील तेंदूपत्ता कंत्राटदार आले एकत्रतेंदूपत्ता संकलन करणारे जेमतेम १५ ते २० कंत्राटदार आहेत. मागील वर्षी स्पर्धा होऊन चढ्या भावाने तेंदूपत्ता खरेदी करावा लागला होता. मात्र तेवढा भाव बाजारात न मिळाल्याने प्रचंड नुकसान सहन करावे लागले. याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी यावर्षी सर्व कंत्राटदारांनी एकत्र येत पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये तेंदूपत्ता खरेदी न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. काही कंत्राटदार तर रॉयल्टीची रक्कम न देताच केवळ मजुरी देऊन तेंदूपत्ता खरेदी करण्यास तयार असल्याची माहिती पुढे आली आहे.तेंदूपत्ता कंत्राटदार मजुरांच्या मदतीने तेंदूपत्ता तोडते. यातील सर्वच मजुरांच्या बँक खात्यात मजुरीची रक्कम जमा करावी, असे शासनाचे निर्देश असले तरी सर्वच मजुरांकडे बँक खाते राहत नाही. त्याचबरोबर मजुरही रोखीने मजुरी घेण्यास पसंती दर्शवितात. मागील वर्षी वेलगूर येथील तेंदूपत्ता मजुरांना मजुरीची रक्कम देण्यासाठी नेली जात असताना पोलिसांनी आलापल्ली येथे कारवाई करून रोकड जप्त केली होती. त्यामुळे ही कंत्राटदारांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.