शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी तालुकानिहाय सूक्ष्म कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:38 IST

जे गाव लसीकरणासाठी तयार आहे त्या ठिकाणी पात्र नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण केले जात आहे. तसेच ज्या गावांमध्ये अफवा, गैरसमज ...

जे गाव लसीकरणासाठी तयार आहे त्या ठिकाणी पात्र नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण केले जात आहे. तसेच ज्या गावांमध्ये अफवा, गैरसमज आहेत त्या ठिकाणीही जनजागृती करून लसीकरण मोहिमेला गती दिली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यात लस घेण्यास तयार असलेल्या गावांच्या वयोगटानुसार याद्या तयार करण्यात येणार आहेत. त्यानंतर तालुकास्तरीय टीम गावात जाऊन लसीकरण मोहीम राबविणार आहे.

(बॉक्स)

स्थानिक पदाधिकाऱ्यांची घेणार मदत

- ग्रामीण तसेच आदिवासी भागात लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी लसीकरणावेळीही जनजागृतीपर माहिती दिली जाणार आहे. लसीकरणाच्या दिवशी गावागावात स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही लसीकरणासाठी आमंत्रित केले जाणार आहे.

गैरसमज दूर करण्यासाठी लस घेणाऱ्याला कुपींची निवड स्वत: करता येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या लसी असल्याबाबतचा गैरसमज दूर होईल. तसेच गावात असणारे प्रतिष्ठित व पात्र व्यक्तींना प्रथम लस देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे इतरही लोक लस घेण्यास तयार होतील.

(बॉक्स)

२१ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी

लसीकरणाला जिल्ह्यात गती देण्यासाठी आरोग्य विभागाकडून २१ प्रकारच्या उपाययोजना तयार करण्यात आल्या आहेत. या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी गावस्तरापर्यंत आरोग्य विभाग करणार आहे. यामध्ये कोरोना चाचण्यांपासून विलगीकरण व लसीकरण या बाबींचा समावेश आहे. लसीकरणात वाढ होण्यासाठी पोस्टर, कलापथक, विविध माध्यमे, महिला बचत गट सदस्य, ग्रामदक्षता समिती यांची मदत घेतली जाणार आहे.

(बॉक्स)

लसींबाबत असलेले गैरसमज आणि सत्य

१) गैरसमज - कोविड लस घेतल्यावर रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो.

सत्य - ही लस मुळातच रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहे. दोन्ही डोस घेतल्यावर रोगप्रतिकारक शक्ती बरेच महिने कायम राहते. लस घेऊनही कोरोना होत असल्याचे प्रमाण नगण्य आहे. कोरोना झालाच तर तो सौम्य स्वरूपाचा राहतो.

२) गैरसमज - लस घेतल्यावर मृत्यू होतो.

सत्य - लस घेतल्यानंतर मृत्यू झाला असे उदाहरण जिल्ह्यात नाही. आतापर्यंत हजारो लोकांनी लस घेतलेली आहे; पण लसीमुळे मृत्यू झालेला नाही. वास्तविक कोरोना लस घेतल्यावर संसर्ग होत नाही व त्यातून मृत्यू टाळता येतो.

३) गैरसमज - कोरोना आदिवासी भागातील लोकांना होत नाही. ती शहरातील बिमारी आहे.

सत्य - कोरोना हा संसर्गजन्य आजार असून संपर्कात आल्यास एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो. लोक कामानिमित्त तालुका व इतर शहरात जात असतात. अनेक दुर्गम गाव, टोल्यावर कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत.

४) अफवा- कोरोना नसताना अहवाल पॉझिटिव्ह देतात. दवाखान्यात नेऊन अवयव काढून घेतात.

सत्य- ज्याला लक्षणे नाहीत अशांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्यांना गावस्तरावरच विलगीकरणात ठेवले जाते. किंवा घरीच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येते. मात्र, लक्षणे आहेत त्यांना तातडीने दवाखान्यात उपचाराची गरज असते. कोरोना झाल्यावर अथवा मृत्यू झाल्यास कोणतेही अवयव काढले जात नाहीत. तशी व्यवस्थाच नाही.

५) गैरसमज - अहवाल पॉझिटिव्ह दिल्यास आरोग्य विभागाला, त्यांच्या कर्मचाऱ्यांना पैसे मिळतात.

सत्य - आरोग्य विभाग व त्यामधील कर्मचारी गेली कित्येक दिवस आहोरात्र सेवा देत आहेत. कोरोनामुळे जिल्ह्यात ३ आरोग्य सेवक, १ आशा कार्यकर्ती व १ औषध निर्माण अधिकारी मृत पावला आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढवल्याने कोणत्याही प्रकारचा निधी शासनाकडून मिळत नाही, ती निव्वळ अफवा आहे.

६) गैरसमज- आमच्या गावातील पुजाऱ्याकडे कोरोनावर औषध आहे.

सत्य - कोरोनावर कोणतेही खात्रीशीर औषध सध्या नाही. दवाखान्यात संसर्ग कमी करण्यासाठी औषधोपचार केले जातात. उलट गावात उपचार घेऊन संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

७) अफवा - कोरोना हे एक षडयंत्र आहे आणि लस घेतल्यावर म्हातारी लोकं मरतात, तरुणांमध्ये नपुंसकत्व/ वंध्यत्व येते.

सत्य - कोरोनात कोणतेही षडयंत्र नाही. आतापर्यंत कित्येक नेत्यांना कोरोना झाला आहे. त्यातून ते बरेही झालेत. लस घेतल्यास संसर्ग टाळता येतो. लसीमुळे नपुंसकत्व किंवा वंध्यत्व येत नाही. उलट कोरोना संसर्गाविरुद्ध प्रतिकारक क्षमता वाढते.