शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

‘घेऊन जा..गे... मारबत...’ ची हाकाटी होतेय लुप्त..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:44 IST

वैरागड : गावखेडे शहरातून येणाऱ्या मोठ्या डांबरी, सिमेंट रस्त्याने जोडली गेली आणि शहराच्या प्रभावात अस्सल ग्रामीण बाज, संस्कृतीचा प्रभाव ...

वैरागड : गावखेडे शहरातून येणाऱ्या मोठ्या डांबरी, सिमेंट रस्त्याने जोडली गेली आणि शहराच्या प्रभावात अस्सल ग्रामीण बाज, संस्कृतीचा प्रभाव कमी झाला आहे. ग्रामीण भागात पोळ्याच्या पाडव्याला पहाटेला ‘ईडा, पिडा, ढेकून, मोगसा (मच्छर) घेऊन जा.. गे... मारबत....!’ अशी मोठ्याने हाकाटी देण्याची पद्धत होती. सर्व वाईट गोष्टी गावातून नष्ट होऊ दे आणि गावात सुख, शांती लाभू दे, असा त्या हाकाटीमागील अर्थ होता. अलीकडे ती हाकाटी आणि मारबतही हरवल्याचे दिसून येते.

धरणीमातेच्या कुशीत हिरवे सपान फुलवणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यासाठी पोळा सण म्हणजे आनंदाची पर्वणीच. पहिल्या दिवशी वाटबैल, दुसऱ्या दिवशी बैलपोळा आणि तिसऱ्या दिवशी तान्हा पोळा असे तीन दिवस हा सण साजरा व्हायचा. खरिपाचा हंगाम झाला की, बारा महिने पाठीवर असूड घेऊन काळ्या आईची सेवा करणाऱ्या सर्जा-राजाच्या जोडीचा विश्रांतीचा काळ येतो; पण आता बैलांची संख्याही कमी झाली आहे. शहरी भागात तर पूजनासाठी सजवलेली बैलजोडी मिळणेही कठीण झाले आहे.

ग्रामीण भागात बळीराजा आजही पोळ्याच्या दिवशी मनोभावे आपल्या बैलजोडीचे पूजन करून पुरणाच्या पोळीचा नैवेद्य देऊन त्याच्याबद्दल ऋण, प्रेम व्यक्त करत असतो. बैलपोळा म्हणजे पिठोरी अमावास्येचा दिवस. या दिवशी श्रावण मासाची समाप्ती होते. बैल पूजनासाठी हा दिवस शुभ मानला जातो. पोळ्याच्या पाडव्याचा उत्साहसुद्धा अलीकडे ओसरल्याचे जाणवते. पाडवा म्हणजे खाण्यापिण्यापुरता विषय राहिला आहे. पूर्वी ग्रामदेवीला स्मरण करून गाव सुखी, संपन्न व्हावे म्हणून प्रत्येक घरातून पोळ्याच्या पाडव्याला पहाटेच मारबती निघायच्या. ईडा, पिडा, ढेकून, मोगसा घेऊन जा गे.. मारबत...! अशा हाकाट्या देत मारबतीला गावातून फिरविले जायचे; पण हे चित्र आता लोप पावत आहे.

(बॉक्स)

मारबत प्रथा आणि पुतणा मावशीचा वध

मारबत प्रथेला संदर्भ असा दिला जातो की, द्वापार युगात गोकुळात बाळकृष्णाचा वध करण्यासाठी पुतणा राक्षशिणीने एका सुंदर स्त्रीचे रूप धारण करून गोकुळात प्रवेश केला आणि स्तनपानातून कृष्णाला विष पाजण्याचा प्रयत्न केला. बाळकृष्णाने पुतणाचा कपटी डाव ओळखला आणि तो डाव तिच्यावरच उलटवला आणि तिचा वध केला. तिचा अगडबंब देह नंदाच्या गोकुळात धारातीर्थी पडला. दुसऱ्या दिवशी पहाटेला गोकुळवासीयांनी तिचा देह गावाच्या वेशीवर नेऊन पुरला आणि अनिष्ट वृत्तीचा नाश केला. त्याचेच प्रतीक म्हणून पोळ्याच्या पाडव्याला मारबत काढण्याची प्रथा असल्याचे सांगितले जाते. आजही गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात ही प्रथा अनेक गावांत कायम आहे.