शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘घेऊन जा..गे... मारबत...’ ची हाकाटी होतेय लुप्त..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:44 IST

वैरागड : गावखेडे शहरातून येणाऱ्या मोठ्या डांबरी, सिमेंट रस्त्याने जोडली गेली आणि शहराच्या प्रभावात अस्सल ग्रामीण बाज, संस्कृतीचा प्रभाव ...

वैरागड : गावखेडे शहरातून येणाऱ्या मोठ्या डांबरी, सिमेंट रस्त्याने जोडली गेली आणि शहराच्या प्रभावात अस्सल ग्रामीण बाज, संस्कृतीचा प्रभाव कमी झाला आहे. ग्रामीण भागात पोळ्याच्या पाडव्याला पहाटेला ‘ईडा, पिडा, ढेकून, मोगसा (मच्छर) घेऊन जा.. गे... मारबत....!’ अशी मोठ्याने हाकाटी देण्याची पद्धत होती. सर्व वाईट गोष्टी गावातून नष्ट होऊ दे आणि गावात सुख, शांती लाभू दे, असा त्या हाकाटीमागील अर्थ होता. अलीकडे ती हाकाटी आणि मारबतही हरवल्याचे दिसून येते.

धरणीमातेच्या कुशीत हिरवे सपान फुलवणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यासाठी पोळा सण म्हणजे आनंदाची पर्वणीच. पहिल्या दिवशी वाटबैल, दुसऱ्या दिवशी बैलपोळा आणि तिसऱ्या दिवशी तान्हा पोळा असे तीन दिवस हा सण साजरा व्हायचा. खरिपाचा हंगाम झाला की, बारा महिने पाठीवर असूड घेऊन काळ्या आईची सेवा करणाऱ्या सर्जा-राजाच्या जोडीचा विश्रांतीचा काळ येतो; पण आता बैलांची संख्याही कमी झाली आहे. शहरी भागात तर पूजनासाठी सजवलेली बैलजोडी मिळणेही कठीण झाले आहे.

ग्रामीण भागात बळीराजा आजही पोळ्याच्या दिवशी मनोभावे आपल्या बैलजोडीचे पूजन करून पुरणाच्या पोळीचा नैवेद्य देऊन त्याच्याबद्दल ऋण, प्रेम व्यक्त करत असतो. बैलपोळा म्हणजे पिठोरी अमावास्येचा दिवस. या दिवशी श्रावण मासाची समाप्ती होते. बैल पूजनासाठी हा दिवस शुभ मानला जातो. पोळ्याच्या पाडव्याचा उत्साहसुद्धा अलीकडे ओसरल्याचे जाणवते. पाडवा म्हणजे खाण्यापिण्यापुरता विषय राहिला आहे. पूर्वी ग्रामदेवीला स्मरण करून गाव सुखी, संपन्न व्हावे म्हणून प्रत्येक घरातून पोळ्याच्या पाडव्याला पहाटेच मारबती निघायच्या. ईडा, पिडा, ढेकून, मोगसा घेऊन जा गे.. मारबत...! अशा हाकाट्या देत मारबतीला गावातून फिरविले जायचे; पण हे चित्र आता लोप पावत आहे.

(बॉक्स)

मारबत प्रथा आणि पुतणा मावशीचा वध

मारबत प्रथेला संदर्भ असा दिला जातो की, द्वापार युगात गोकुळात बाळकृष्णाचा वध करण्यासाठी पुतणा राक्षशिणीने एका सुंदर स्त्रीचे रूप धारण करून गोकुळात प्रवेश केला आणि स्तनपानातून कृष्णाला विष पाजण्याचा प्रयत्न केला. बाळकृष्णाने पुतणाचा कपटी डाव ओळखला आणि तो डाव तिच्यावरच उलटवला आणि तिचा वध केला. तिचा अगडबंब देह नंदाच्या गोकुळात धारातीर्थी पडला. दुसऱ्या दिवशी पहाटेला गोकुळवासीयांनी तिचा देह गावाच्या वेशीवर नेऊन पुरला आणि अनिष्ट वृत्तीचा नाश केला. त्याचेच प्रतीक म्हणून पोळ्याच्या पाडव्याला मारबत काढण्याची प्रथा असल्याचे सांगितले जाते. आजही गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात ही प्रथा अनेक गावांत कायम आहे.