शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

योजनांचा लाभ घेऊन समाज, कुटुंबाचा विकास साधा

By admin | Updated: November 29, 2014 23:21 IST

शासनाच्यावतीने विविध कल्याणकारी योजना नागरिकांसाठी राबविल्या जातात. मात्र अनेक नागरिक योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे अनेकदा नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहतात.

घोट : शासनाच्यावतीने विविध कल्याणकारी योजना नागरिकांसाठी राबविल्या जातात. मात्र अनेक नागरिक योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे अनेकदा नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहतात. परिणामी कुटुंबाचा व समाजाचा विकास खुंटते. कुटुंबाच्या विकासासाठी नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन चामोर्शी पं. स. चे संवर्ग विकास अधिकारी बादलशहा मडावी यांनी केले.बेलगट्टा येथे पोलीस विभागाच्यावतीने आयोजित जनजागरण मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच विठाबाई चौधरी, महेंद्र आलाम, पोलीस पाटील चमरू मडावी, बेलगट्टा चकचे पोलीस पाटील ऋषी मडावी, घोटचे सरपंच बाळा येनगंटीवार, चामोर्शीचे वनपरिक्षेत्राधिकारी शंकर गाजलवार, प्रभारी अधिकारी एम. जी. कवडे, पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. खतेले, पी. पी. इंगळे, एन. व्ही. पोळ, एन. बी. कदम, एन. यू. नाईक, ग्रामसेवक रोडे उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विविध विभागाच्यावतीने स्टॉल लावून योजनांची माहिती देण्यात आली. दरम्यान पोलीस विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या रांगोळी व व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक पटणे तर आभार पीएसआय इंगळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचारी व नागरिकांनी सकहार्य केले. (वार्ताहर)