शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

योजनांचा लाभ घेऊन समाज, कुटुंबाचा विकास साधा

By admin | Updated: November 29, 2014 23:21 IST

शासनाच्यावतीने विविध कल्याणकारी योजना नागरिकांसाठी राबविल्या जातात. मात्र अनेक नागरिक योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे अनेकदा नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहतात.

घोट : शासनाच्यावतीने विविध कल्याणकारी योजना नागरिकांसाठी राबविल्या जातात. मात्र अनेक नागरिक योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे अनेकदा नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहतात. परिणामी कुटुंबाचा व समाजाचा विकास खुंटते. कुटुंबाच्या विकासासाठी नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन चामोर्शी पं. स. चे संवर्ग विकास अधिकारी बादलशहा मडावी यांनी केले.बेलगट्टा येथे पोलीस विभागाच्यावतीने आयोजित जनजागरण मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच विठाबाई चौधरी, महेंद्र आलाम, पोलीस पाटील चमरू मडावी, बेलगट्टा चकचे पोलीस पाटील ऋषी मडावी, घोटचे सरपंच बाळा येनगंटीवार, चामोर्शीचे वनपरिक्षेत्राधिकारी शंकर गाजलवार, प्रभारी अधिकारी एम. जी. कवडे, पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. खतेले, पी. पी. इंगळे, एन. व्ही. पोळ, एन. बी. कदम, एन. यू. नाईक, ग्रामसेवक रोडे उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विविध विभागाच्यावतीने स्टॉल लावून योजनांची माहिती देण्यात आली. दरम्यान पोलीस विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या रांगोळी व व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक पटणे तर आभार पीएसआय इंगळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी पोलीस कर्मचारी व नागरिकांनी सकहार्य केले. (वार्ताहर)