शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

स्थगनादेशाने टळली जप्तीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 00:09 IST

न्यायालयाच्या आदेशानंतरही नगर परिषदेने कंत्राटदाराचे बिल अदा केले नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार गडचिरोलीचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या खुर्च्यांसह सुमारे ८ लाख ७७ हजार ८० रुपयांची जंगम मालमत्ता शनिवारी जप्त करण्याची कारवाई केली जात होती.

ठळक मुद्देगडचिरोली नगर परिषद : प्रलंबित बिलाच्या वसुलीअभावी नऊ लाखांचे साहित्य काढले बाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : न्यायालयाच्या आदेशानंतरही नगर परिषदेने कंत्राटदाराचे बिल अदा केले नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार गडचिरोलीचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या खुर्च्यांसह सुमारे ८ लाख ७७ हजार ८० रुपयांची जंगम मालमत्ता शनिवारी जप्त करण्याची कारवाई केली जात होती. मात्र स्थगनादेशामुळे ही कारवाई टळली.गडचिरोली नगर परिषदेने चार पाणीपंप दुरूस्त करण्यासाठी देसाईगंज येथील कंत्राटदार इक्राम खान सुलेमान खान पठाण यांच्याकडे कंत्राट दिले होते. नगर परिषदेने एक लाख रूपये अग्रिम दिले होते. पूर्ण मोटार दुरूस्तीचे बिल ५ लाख ८९ हजार ८०० रूपये एवढे झाले. एक लाख रूपये वजा करून ४ लाख ८९ हजार ८०० रूपये नगर पालिकेकडून कंत्राटदाराला देणे होते. सदर बिल मंजूर करावे, यासाठी कंत्राटदाराने नगर पालिकेकडे बराच पत्र व्यवहार केला. मात्र त्याच वर्षी तत्कालीन मुख्याधिकारी रूचेश जयवंशी यांच्या आदेशानुसार तत्कालीन विभाग प्रमुख बी. एल. ताकसांडे यांनी इक्राम खान सुलेमान खान पठाण या कंत्राटदाराने नगर परिषदेच्या मोटार चोरून नेल्याची तक्रार देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली.या प्रकरणाचा निकाल २९ सप्टेंबर २०१७ मध्ये कंत्राटदाराच्या बाजुने लागला. मूळ रक्कम व व्याज असे मिळून एकूण ९ लाख २५ हजार ७४९ रूपये संबंधित कंत्राटदाराला द्यावे, असे निर्देश जिल्हा न्यायालयाने गडचिरोली नगर परिषदेला दिले. मात्र नगर परिषदेने रक्कम कंत्राटदाराला अदा केली नाही. त्यानंतर न्यायालयाने बजावणीचा हुकूम का करण्यात येऊ नये, असा आदेश दिला. त्यानंतरही रक्कम दिली नाही. त्याचबरोबर नगर परिषदेने स्वत:चे मतही मांडले नाही. त्यामुळे नगर परिषदेची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. त्यानुसार शनिवारी न्यायालयातील बेलीफांच्या उपस्थितीत इक्राम खान सुलेमान खान पठाण यांनी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांच्या खुर्च्यांसह मालमत्ता जप्त केली. सर्व खुर्च्या बाहेर काढल्या. मात्र काही वेळातच जप्तीच्या आदेशाला स्थगिती असल्याचा फोन जिल्हा न्यायालयातून बेलीफाला प्राप्त झाला. त्यानंतर सर्व खुर्च्या व मालमत्ता परत करण्यात आली. नगर पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी कारवाई झाल्याने नगरसेवक संतप्त झाले. याचे परिणाम शनिवारच्या सभेत उमटले.कारवाई केलेली मालमत्तानगराध्यक्ष, मुख्याधिकारी व पाणी पुरवठा सभापती यांच्या खुर्च्या, जेसीबी, तीन ट्रॅक्टर, एक कंटेनर, १५ सभागृहातील खुर्च्या, आॅफीस टेबल अशी एकूण ८ लाख ७७ हजार रूपयांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली. मात्र काही वेळातच जप्तीला उच्च न्यायालयाचा स्थगनादेश मिळाल्याचा फोन आल्यानंतर कारवाई मागे घेतली.नगर पालिकेच्या दिरंगाईचा परिणामजिल्हा न्यायालयाच्या जप्तीच्या आदेशाला उच्च न्यायालयाने १२ जानेवारी रोजीच स्थगिती दिली होती. याबाबतचा आदेश नगर पालिकेला प्राप्त झाला होता. मात्र नगर पालिका प्रशासनाने सदर आदेश जिल्हा न्यायालयात नेऊन दिला नाही. त्यामुळे जिल्हा न्यायालयाने निश्चित केलेल्या तारखेला न्यायालयाच्या बेलीफांनी नगर पाकिलेची मालमत्ता जप्त केली. १२ तारखेला मिळालेला स्थगनादेश तब्बल आठ दिवस नगर पालिकेने न्यायालयात जमा केला नाही. यावरून नगर पालिकेचे प्रशासनाचा लेटलतीफपणा उघड झाला आहे. २० तारखेच्या पूर्वीच जिल्हा न्यायालयात स्थगनादेश जमा केला असता तर शनिवारी जप्तीचे रामायण घडले नसते. यासाठी जबाबदार अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाईची मागणी होत आहे.