शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

शेततळ्याने दिला आधार

By admin | Updated: October 10, 2015 01:36 IST

गडचिरोली जिल्ह्यात वन कायद्यामुळे सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. त्यामुळे सिंचनाची सुविधा मागील ३० वर्षात निर्माण होऊ शकलेली नाही.

तीन एकरला लाभ : विदर्भ संघम सिंचन कार्यक्रमातून पिसेवडधात शेतकऱ्याला अच्छे दिनडी. के. मेश्राम मानापूर/देलनवाडीगडचिरोली जिल्ह्यात वन कायद्यामुळे सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. त्यामुळे सिंचनाची सुविधा मागील ३० वर्षात निर्माण होऊ शकलेली नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पावसाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे. पावसाचाही अनियमितपणा वाढत चालला असून शेतकरी अडचणीत आला आहे. अशा परिस्थितीत विदर्भ संघम सिंचन विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या शेततळ्याने तीन एकर शेतीतील धानपीक वाचविण्यास शेतकऱ्याला मदत झाल्याचे उदाहरण आरमोरी तालुक्यातील पिसेवडधा गावात दिसून आले आहे.आरमोरी तालुक्यात काही भागाला इटियाडोह प्रकल्पाचे पाणी उपलब्ध होते. मात्र तालुक्यातील बऱ्याच गावातील शेतीही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. पिसेवडधा भागातही अशीच परिस्थिती होती. या भागात सिंचन सुविधा वाढीस लागव्या म्हणून २०१० मध्ये तत्कालीन मख्ुयमंत्री अशोक चव्हाण यांनी विदर्भ संघम सिंचन विकास कार्यक्रम खास गडचिरोली जिल्ह्यासाठी लागू केला. याअंतर्गत शेतकऱ्यांना थेट वैयक्तिक लाभाच्या सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. पिसेवडधा येथील भगवान बोरूले या शेतकऱ्याच्या शेतात कृषी विभागाने शेततळे तयार केले. या शेततळ्याच्या पाण्याचा आॅईल इंजिनद्वारे उपसा करून धानपिकाला देण्याची सोय शेतकऱ्याला उपलब्ध झाली. यंदा पाऊस अनियमित स्वरूपात झाला. अशावेळी बोरूले यांनी आपल्या शेतातील शेततळ्याचे पाणी उपसून तीन एकरातील धानपीक वाचविले. या शेततळ्यात मत्स्य उत्पादन करण्याचाही भगवान बोरूले यांचा मानस असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. आता आपले धानपीक कापणीला आले आहे. केवळ शेततळ्याच्या भरवशावरच यंदा धानपीक वाचविता आले. अन्यथा परिस्थिती कठीण होती, अशी भावना शेतकऱ्याने व्यक्त केली.