शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

गृहपालाच्या स्थानांतरणाविरोधात विद्यार्थी एकवटले

By admin | Updated: September 6, 2014 23:45 IST

वसतिगृहाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्थानिक शासकिय आदिवासी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.

देसाईगंज : वसतिगृहाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी स्थानिक शासकिय आदिवासी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे, गृहपालाचे स्थानांतरण रद्द करण्यात यावे यासाठीही वसतिगृहातील विद्यार्थी एकवटले आहेत. वसतिगृहातील विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन देण्यात आले. मात्र निवेदनाची दखल अधिकाऱ्यांनी घेतली नाही. यामुळे शनिवारी दुसऱ्या दिवशी वसतिगृहाचे पाच विद्यार्थी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहात एकूण ६९ आदिवासी विद्यार्थी आहेत़ मागण्या मार्गी लावण्यासाठी वसतिगृहाचे सर्व विद्यार्थी एकवटलेले आहेत़ पावसाचे दिवस असताना सुध्दा वसतिगृहाचे विद्यार्थी साखळी उपोषणाला बसले आहेत़ उपोषणाचा शनिवारी दुसरा दिवस असून अद्यापपर्यंत उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही अधिकारी तसेच राजकीय नेत्यांनी भेट दिलेली नाही़ वसतिगृहाचे गृहपाल डब्लू़ आऱ शेख यांचे प्रशासकीय स्थानांतरण रद्द करण्यात यावे, मागील २ महिण्यापासून विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता मिळालेला नाही तो त्वरीत देण्यात यावा, नवीन आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम शहराबाहेर ६ किमी अंतरावर सुरू आहे़ मुलींना शहराबाहेरच्या वसतिगृहात ये-जा करणे अतिशय अवघड होणार असल्यामुळे वसतिगृहाचे बांधकाम थांबविण्यात यावे, सन २०१४-१५ या सत्रातील गणेवशाची रक्कम विद्यार्थ्यांना मिळालेली नाही ती त्वरीत देण्यात यावी तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य उपलब्ध करून द्यावे या मागण्यांसाठी वसतिगृहातील विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत़ या संदर्भात विद्यार्थ्यांनी आदिवासी अप्पर आयुक्त नागपूर यांना २५ आॅगस्टला निवेदन दिले असून ३० आॅगस्ट रोजी आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे़ मात्र अद्यापपर्यंत मागण्यासंदर्भांत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही़ या मागण्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी अखेर उपोषणाचे अस्त्र उगारलेले आहे़ (वार्ताहर)