शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

आष्टीतील रस्ते झाले बकाल

By admin | Updated: October 22, 2014 23:18 IST

चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. आष्टी हे जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर मानल्या जाते. आष्टी येथूनच चंद्रपूर, आलापल्ली, सिरोंचा, मुलचेरा, चामोर्शीकडे मार्ग जातात. त्यामुळे बहुतांश बसेस आष्टीवरूनच पुढील प्रवास करतात. आष्टी येथे असलेल्या पेपर मिलमुळेही वाहनांची वर्दळ नेहमीच सुरू होते. चंद्रपूर जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येकच वाहनाला आष्टी येथूनच जावे लागते. आष्टी येथून चंद्रपूरकडे राज्य महामार्ग गेला आहे. मात्र या महामार्गाची या पावसाळ्यात मोठी दुर्दशा झाली. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. दिवसेंदिवस या खड्ड्यांमधील माती, गिट्टी, डांबर उखडून जात असल्याने खड्यांचा विस्तार होत चालला आहे. त्याचबरोबर त्यांची खोलीही वाढत चालली आहे. खड्ड्यामुळे आजपर्यंत अनेक लहान-मोठे अपघातही घडले आहेत. त्यामुळे या मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली जात आहे. मात्र त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यान खड्डे जैसे थेच आहेत. आष्टी गावातील शिरपूरवार यांच्या घराजवळ रस्त्याची दुरवस्था झाली आहे. आष्टी ही परिसरातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. गावातील अंतर्गत रस्त्यांची निर्मिती करणे व त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागावर आहे. मात्र मागील वर्षी आष्टी येथील अनेक रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावरची गिट्टी निघाली आहे. बऱ्याच ठिकाणच्या रस्त्यांची डांबर व मातीचा रस्ता यांची तुलनाच करणे अशक्य झाले आहे. रस्ते दुरूस्तीबाबत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला अनेक वेळा कळविण्यात आले. मात्र पावसाळा सुरू झाला असल्याचे कारण पुढे करून रस्ते दुरूस्ती करण्यात आली नाही. आता पावसाळा संपून हिवाळ्याला सुरूवात झाली आहे. तरीही या मार्गांची दुरूस्ती करण्यात आली नाही. आष्टी परिसरातील बहुतांश गावांच्या रस्त्यांची हीच स्थिती झाली आहे. बकाल रस्त्यांमुळे गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र प्रशासनातील अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याने रस्त्यांची परिस्थिती जैसे थेच असल्याचे दिसून येत आहे. निवडून येणारे लोकप्रतिनिधी केवळ मत मागेपर्यंत विकासाची भाषा करतात. एकदा निवडून आल्यानंतर निवडणुकीच्या कालावधीत त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा त्यांनाच विसर पडत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. आष्टी परिसरातील जिल्हा परिषद सदस्यांचीही हीच अवस्था झाली असल्याने रस्ते बकाल झाले आहेत. (वार्ताहर)