शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

आष्टीतील रस्ते झाले बकाल

By admin | Updated: October 22, 2014 23:18 IST

चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.

आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. आष्टी हे जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर मानल्या जाते. आष्टी येथूनच चंद्रपूर, आलापल्ली, सिरोंचा, मुलचेरा, चामोर्शीकडे मार्ग जातात. त्यामुळे बहुतांश बसेस आष्टीवरूनच पुढील प्रवास करतात. आष्टी येथे असलेल्या पेपर मिलमुळेही वाहनांची वर्दळ नेहमीच सुरू होते. चंद्रपूर जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येकच वाहनाला आष्टी येथूनच जावे लागते. आष्टी येथून चंद्रपूरकडे राज्य महामार्ग गेला आहे. मात्र या महामार्गाची या पावसाळ्यात मोठी दुर्दशा झाली. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. दिवसेंदिवस या खड्ड्यांमधील माती, गिट्टी, डांबर उखडून जात असल्याने खड्यांचा विस्तार होत चालला आहे. त्याचबरोबर त्यांची खोलीही वाढत चालली आहे. खड्ड्यामुळे आजपर्यंत अनेक लहान-मोठे अपघातही घडले आहेत. त्यामुळे या मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली जात आहे. मात्र त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यान खड्डे जैसे थेच आहेत. आष्टी गावातील शिरपूरवार यांच्या घराजवळ रस्त्याची दुरवस्था झाली आहे. आष्टी ही परिसरातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. गावातील अंतर्गत रस्त्यांची निर्मिती करणे व त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागावर आहे. मात्र मागील वर्षी आष्टी येथील अनेक रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावरची गिट्टी निघाली आहे. बऱ्याच ठिकाणच्या रस्त्यांची डांबर व मातीचा रस्ता यांची तुलनाच करणे अशक्य झाले आहे. रस्ते दुरूस्तीबाबत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला अनेक वेळा कळविण्यात आले. मात्र पावसाळा सुरू झाला असल्याचे कारण पुढे करून रस्ते दुरूस्ती करण्यात आली नाही. आता पावसाळा संपून हिवाळ्याला सुरूवात झाली आहे. तरीही या मार्गांची दुरूस्ती करण्यात आली नाही. आष्टी परिसरातील बहुतांश गावांच्या रस्त्यांची हीच स्थिती झाली आहे. बकाल रस्त्यांमुळे गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र प्रशासनातील अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याने रस्त्यांची परिस्थिती जैसे थेच असल्याचे दिसून येत आहे. निवडून येणारे लोकप्रतिनिधी केवळ मत मागेपर्यंत विकासाची भाषा करतात. एकदा निवडून आल्यानंतर निवडणुकीच्या कालावधीत त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा त्यांनाच विसर पडत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. आष्टी परिसरातील जिल्हा परिषद सदस्यांचीही हीच अवस्था झाली असल्याने रस्ते बकाल झाले आहेत. (वार्ताहर)