शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील १३४० शासकीय पाळणाघरे अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 12:16 IST

राज्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेली राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना सध्या कोमात गेली आहे.

ठळक मुद्देदीड वर्षापासून वालीच नाहीकेंद्राने अंग काढले, राज्याने हात वर केले

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेली राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना सध्या कोमात गेली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या टोलवाटोलवीमुळे १३४० पाळणाघरे दीड वर्षांपासून अधांतरी आहेत. पोषक आहार नाही, की कर्मचाऱ्यांचा पगार नाही. परिणामी हजारो बालकांची आबाळ होत असून ते कुपोषणाच्या खाईत ढकलले जात आहेत.केंद्र सरकारच्या समाजकल्याण बोर्डमार्फत अनेक वर्षांपासून राजीव गांधी राष्ट्रीय पाळणाघर योजना चालविली जात होती. सहा वर्षापर्यंतच्या बालकांना पोषक आहार देण्यापासून तर त्यांचा सांभाळ करून प्राथमिक स्वरुपाचे शिक्षण देण्यापर्यंतची कामे या पाळणाघरांमधून केली जात होती. डिसेंबर २०१६ पर्यंत ही योजना सुरूळीत सुरू होती. पण जानेवारी २०१७ पासून ही योजना सर्व राज्यांच्या समाजकल्याण बोर्डांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाने ही योजना चालविण्यास असमर्थता दर्शवून जिल्हा परिषदांकडे जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. पण कोणीही त्या योजनेची जबाबदारी घेतली नाही. परिणामी जानेवारी २०१७ पासून राज्यातील सर्व पाळणाघरांचे काम पुढील आदेशापर्यंत थांबविण्याचे आदेश पाळणाघरे चालविणाऱ्या संबंधित संस्थांना देण्यात आले. यासंदर्भात राज्याच्या समाजकल्याण बोर्डकडे विचारणा केली असता त्या योजनेवर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात आले.प्रत्येक पाळणाघरावर एक शिक्षिका आणि एक सेविका अशी दोन पदे मंजूर होती. यातील शिक्षिका तर डीएड् झालेल्या आहेत. पण दीड वर्षांपासून हे २६८० कर्मचारी पाळणाघर पुन्हा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आर्थिक हालअपेष्टा सहन करीत दिवस काढत आहेत.

बालकांची कुपोषणाकडे वाटचालग्रामीण भागात बालकांचे आई-वडील मोलमजुरीला जातात. दिवसभर त्यांच्या मुलांचा सांभाळ या पाळणाघरांमध्ये होत होता. मात्र सध्या पाळणाघरच सुरू नसल्याने पोषक आहार बंद होऊन हजारो मुले कुपोषित होत आहेत. याशिवाय दिवसभर त्यांचा सांभाळ करण्यासाठी घरी कोणी राहात नसल्यामुळे त्या बालकांची आबाळ होत आहे.

३० टक्के निधीसाठीही राज्य सरकार अनुत्सुकजानेवारी २०१७ पासून केंद्राने ही योजना राज्याकडे सोपविताना ६० टक्के निधी केंद्राकडून देण्यात येईल असे सांगितले होते. उर्वरित निधीपैकी ३० टक्के निधी राज्याने द्यावा तर १० टक्के निधी संबंधित संस्थांनी स्वत: उभारावा असे सुचविले. मात्र या योजनेसाठी ३० टक्के निधी खर्च करण्याचीही राज्य सरकारची तयारी नसल्यामुळे गोरगरीब बालकांबाबत महिला व बालकल्याण विभाग एवढा निष्ठूर कसा झाला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Governmentसरकार