शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या निधीला राज्य सरकारकडून कात्री

By admin | Updated: July 30, 2016 02:01 IST

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद यंत्रणेमार्फत मोठ्या प्रमाणावर विकास कामांचा निधी वितरित करण्यात येत होता.

ग्रामीण विकास अडचणीत : मंत्रालयातून निधीत करण्यात आली कपात गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद यंत्रणेमार्फत मोठ्या प्रमाणावर विकास कामांचा निधी वितरित करण्यात येत होता. मात्र राज्यात भाजप-सेना सरकार सत्तारूढ झाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मंत्रालयातूनच जिल्हा परिषदेच्या निधीला कात्री लावण्याचा प्रकार येथे सुरू झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने ग्रामीण विकासाच्या योजनांचा तयार केलेला आराखडा अत्यल्प निधीमुळे आता रखडून पडण्याची शक्यता आहे. या प्रश्नावरून ३० जुलै रोजी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जि.प. सदस्य आक्रमक चर्चा करण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषदेमधून २२ सदस्य जिल्हा नियोजन समितीवर आहेत. या सर्वांचा पालकमंत्र्यांवर रोष असल्याचे दिसून येत आहे. आर. आर. पाटील गडचिरोलीचे पालकमंत्री असताना सन २०१० पासून २०१४ पर्यंत त्यांनी जिल्हा नियोजन आराखडा सव्वाशे कोटी रूपयांवर नेला होता. याशिवाय राज्य सरकारच्या विविध योजनांतून तेवढाच निधी गडचिरोली जिल्ह्याला दिला होता. हा बहुतांश निधी जिल्हा परिषदेच्या यंत्रणांमार्फत गावपातळीवर काँक्रीट रस्ते, नाल्या, पथदिवे, सौरदिवे आदी कामांसाठी खर्च करण्यात आला. २०१४ नंतर राज्यात सत्तांतरण झाले व भाजप-सेना सरकार विराजमान झाले. गडचिरोली जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाच्या अधिपत्त्याखाली आहे. त्यामुळे भाजपच्या लोकप्रतिनिधींनी स्थानिकस्तरावर जि.प.च्या हक्काचा निधी राज्य सरकारकडे वळता करण्याचा प्रयत्न केला होता. तो हाणून पाडण्यात आला. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीने जिल्हा परिषदेच्या योजनांचा नियोजन आराखडा समाविष्ट करून राज्य सरकारकडे तो प्रस्ताव पाठविला. त्यानंतर राज्य सरकारने मुंबई मंत्रालयातून जिल्हा परिषदेच्या अनेक योजनांच्या निधीला कात्री लावली असून आता जिल्हा परिषदेला अत्यल्प निधी मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण विकासाचे काम पूर्णपणे ठप्प पडण्याची शक्यता असून गैरआदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतींची अवस्था अत्यंत वाईट होण्याची शक्यता वर्तवितली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी) गडचिरोली या आदिवासी बहूल जिल्ह्यात पेसा कायद्यांतर्गत आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या निकषानुसार पाच टक्के विकासकामाकरीता शासनाकडून निधी उपलब्ध करून दिल्या गेलेला आहे. परंतु आदिवासी क्षेत्राबाहेरील ग्रामपंचायतींना पाच टक्के विकास निधीतून वगळण्यात आलेले आहे. त्यामुळे गैरआदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतीवर एक प्रकारचा अन्यायच झालेला आहे. केंद्र शासनाने बीआरजीएफ योजना बंद केल्याने तसेच राज्य सरकारकडून गैरआदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून दिलेला नसल्याने विकास खुंटला आहे. त्यामुळे गैरआदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतींनाही पेसा ग्रामपंचायतीप्रमाणेच पाच टक्के विकास निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. - डॉ. तामदेव दुधबळे, सदस्य जिल्हा परिषद गडचिरोली