शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
3
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
4
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
5
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
6
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
7
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
8
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
9
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
12
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
13
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
14
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
15
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
16
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
17
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
18
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
19
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
20
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   

देसाईगंज येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:35 IST

माेटवाणी यांनी निवेदनात म्हटले आहे की, राज्याच्या अगदी शेवटच्या टोकावर असलेला गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम ...

माेटवाणी यांनी निवेदनात म्हटले आहे की, राज्याच्या अगदी शेवटच्या टोकावर असलेला गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम व नक्षलग्रस्त तसेच इतर जिल्ह्यांच्या तुलनेत विकासापासून कोसो दूर आहे. जिल्ह्यात भौतिक सुविधा नसल्याने नागरिकांचा विकास शकत नाही. गरीब, शेतकरी, शेतमजुरांना आरोग्याच्या सोयी व सवलतींचा लाभ मिळत नसल्याने अनेकदा आजारांना बळी पडावे लागते.

जिल्ह्यात गडचिरोली किंवा देसाईगंज येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले तर जनतेच्या आरोग्याचे प्रश्न सुटून जीवितहानी टळू शकते. शिवाय देसाईगंज येथे मोठी बाजारपेठ आहे. भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यांसाठी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे पशुसंवर्धन विभागाची ८०० एकर जमीन असून मोठमोठी सभागृहे बांधलेली आहेत. त्यामुळे देसाईगंज येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास काहीच हरकत नाही. येथे वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास इतर जिल्ह्यांतील रुग्णांसाठी फायद्याचे हाेईल. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन वैद्यकीय महाविद्यालय देसाईगंज किंवा गडचिरोली येथे सुरू करावे, अशी मागणी जेसा मोटवाणी यांनी केली आहे.