शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

रेल्वे आरक्षण केंद्रावरही दलालांचा सुळसुळाट

By admin | Updated: June 18, 2014 00:12 IST

गडचिरोली येथील रेल्वे आरक्षण केंद्रावर सध्या दलालांचा सुळसुळाट झाला असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तिकीट मिळणे कठीण झाले आहे. या दलालांचा बंदोबस्त करण्यासाठी येथे पोलीस शिपायाची

गडचिरोली : गडचिरोली येथील रेल्वे आरक्षण केंद्रावर सध्या दलालांचा सुळसुळाट झाला असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तिकीट मिळणे कठीण झाले आहे. या दलालांचा बंदोबस्त करण्यासाठी येथे पोलीस शिपायाची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गडचिरोली हा राज्यातील मागास व दुर्गम जिल्हा आहे. येथील नागरिकांना येथे आरक्षण तिकीट घेण्यासाठी चंद्रपूर किंवा वडसा येथे जावे लागत होते. येथील नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी गडचिरोली येथे रेल्वे आरक्षण केंद्र देण्यात आले. येथून पुणे व मुंबई तसेच इतर ठिकाणसाठीच्या प्रवासाची तिकीट काढणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे तिकीटचा काळाबाजार करणाऱ्या दलालांची संख्याही वाढली आहे. २५ ते ३० वयोगटातील हे मुले १० ते १२ च्या संख्येने पहाटे ४ वाजतापासून रेल्वे आरक्षण केंद्रावर उपस्थित राहून एका कागदावर स्वत:चे नाव लिहून आपला रांगेत पहिला नंबर लावतात. त्यांचे एकमेकासोबत संगनमत असून आळीपाळीने तेच तिकीट काढतात. त्यांचे ओळखपत्र घेऊन तत्काळ तिकीटही ते मिळवितात. तिकीट देणारे रेल्वे कर्मचारी व दलाल यांच्यात वाटाघाटी असून दलालांकडून ठराविक रक्कम घेतली जाते. तिकीट देणारा रेल्वे कर्मचारी या दलालांना नावानिशी ओळखतो, अशी माहिती रिपब्लीकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हा महासचिव विजय शेडमाके यांनी लोकमतला दिली आहे. या दलालांचे रोजचे काम असल्याने त्यांना कमी वेळात जास्तीतजास्त पैसे या कामात मिळतात. अन्य प्रवाशांसोबत अरेरावीची भाषा वापरून ते गुंडागर्दीही येथे करीत असतात. एका कोऱ्या कागदावर स्वत:चे नाव लिहून प्रथम क्रमांक लावणाऱ्या या लोकांना कन्फर्म तिकीट दिले जाते. इतरांचा नंबर येईपर्यंत वेटींग तिकीट सुरू होते. या प्रकाराबाबत गडचिरोली पोलीस ठाण्यातही तक्रार देण्यात आली आहे. परंतु या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नसल्याने दलालांचे फावत आहे व आरक्षण केंद्राचा सर्वसामान्य फायदा मिळणे कठीण झाला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)