शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

सोयाबीनने हिरावला दिवाळीचा आनंद

By admin | Updated: October 26, 2014 22:41 IST

सोयाबीन कापणीसाठी दिवाळीपूर्वी गेलेल्या मजुरांना दिवाळीसाठी परतता आले नाही. त्यामुळे हजारो मजुरांना दिवाळीच्या आनंदापासून वंचित राहावे लागले आहे.

गडचिरोली : सोयाबीन कापणीसाठी दिवाळीपूर्वी गेलेल्या मजुरांना दिवाळीसाठी परतता आले नाही. त्यामुळे हजारो मजुरांना दिवाळीच्या आनंदापासून वंचित राहावे लागले आहे. गडचिरोली जिल्ह्यात धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने रोवलेले धानपिक हातात येईलच याची शाश्वती राहत नाही. त्यामुळे बहुसंख्य शेतमजूर व अल्प भूधारक शेतकरी मजुरी करूनच जीवन जगतात. येथील मजुरांना धानपिकाच्या रोवणीपासून ते धानपिकाचे निंदन काढेपर्यंत गावातच रोजगार उपलब्ध होतो. निंदनाची कामे झाल्यानंतर धान कापणीदरम्यानच्या एक महिन्याच्या कालावधीत धानपिकासंबंधित विशेष कामे राहत नसल्याने मजुरांना रोजगार उपलब्ध होत नाही. विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सोयाबीन पिकाची दसऱ्याच्या आठ दिवसांपूर्वीच कापणी पूर्ण होते. हा दरवर्षीचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. यावर्षीमात्र उशिरा पाऊस पडल्याने सोयाबीन पिकाच्या पेरणीला उशिर झाला. परिणामी सोयाबीन पीक उशिरा परिपक्व झाले. त्याचबरोबर यावर्षी दिवाळीचा सण १५ दिवसांनी अगोदर आला आहे. यावर्षी दिवाळी सणाच्या जेमतेम चार दिवसांपूर्वीच कापणीला सुरूवात झाली. सोयाबीन कापणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील हजारो मजुरांनी आठ दिवसांपूर्वीच घरून निघाले होते. मध्यंतरी दिवाळीचा सण आला. मात्र केवळ दिवाळी सण साजरा करण्यासाठी हजारो रूपये खर्च करून तसेच दिवसाची मजुरी बुडवून येणे शक्य नसल्याने यावर्षी मजूर परतलेच नाही. संपूर्ण जग दिवाळीचा आनंद साजरा करत असतांना मजुरांना मात्र वावरात सोयाबीन कापनीचे कष्ट उपसावे लागत होते. दिवाळी सणासाठी पैसाही उपलब्ध नसल्याने घरी असलेल्या व्यक्तींना उधारवाडी आणूनच दिवाळीचा सण साजरा करावा लागला. सोयाबीन कापणीसाठी गेलेले मजूर एकराप्रमाणे सोयाबीन कापणीचा हुंडा घेऊन काम करतात. सकाळीच कामाला सुरूवात करून रात्री ७ ते ८ वाजेपर्यंत सोयाबीन कापणे व जमा करण्याचे काम करीत असल्याने दिवसाकाठी ५०० ते ६०० रूपये मजुरी पडते. २० दिवस चालणाऱ्या या कामातून ८ ते १० हजार रूपये कमाई होते. ऐवढे उत्पन्न दोन एकर धानाची शेती केल्यानंतरही होत नाही. त्यामुळे मजूर सोयाबीन पिकाच्या कापणीचा हंगाम कोणत्याही परिस्थितीत सोडत नाही. रोजगाराच्या साधनाअभावी येथील शेतमजुराला दिवाळीच्या आनंदापेक्षा पोट भरण्याची चिंता सर्वाधिक राहते. त्यामुळे सोयाबीन कापणीचा हंगाम सोडणे या मजुरांना अशक्य होते. गावातील जवळपास ५० टक्के शेतमजूर सोयाबीन कापणीसाठी गेली असल्याने गावकऱ्यांनाही दिवाळीचा आनंद पाहिजे त्या प्रमाणात लुटता आला नाही. मजुरीसाठी दहाही दीशा वनवन भटकण्याची येथील मजुरांना सवयच झाली आहे. पावसाळ्यादरम्यानही चंद्रपूर जिल्ह्यात धानाची रोवणी करण्यासाठी हजारो मजूर जातात. धानपिकाची रोवणीदरम्यान कधीकधी पोळ्याचा सण येत असल्याने हा सणसुद्धा दुसऱ्यागावी साजरा करावा लागतो. मात्र पोटासाठी मन मारून हे सर्व कष्ट उपसावेच लागतात. गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराचे साधन नसल्याने वनवन भटकण्याशिवाय मजुरांसमोर दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नाही. सणाचा आनंद घेतो म्हटला तर कुटुंबाचे पोट उपाशी राहण्याची पाळी येते. त्यामुळे रोजगार उपलब्ध होणे आवश्यक आहे. (नगर प्रतिनिधी)