शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

देसाईगंज शहरातील बायपास रस्त्याचे भिजत घाेंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:39 IST

सिरोंचा-आष्टी-चामोर्शी-गडचिरोली-आरमोरी-देसाईगंज-साकोली या राज्य मार्ग ३५३ सीचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या संदर्भात २ जानेवारी २०१६ ...

सिरोंचा-आष्टी-चामोर्शी-गडचिरोली-आरमोरी-देसाईगंज-साकोली या राज्य मार्ग ३५३ सीचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या संदर्भात २ जानेवारी २०१६ ला तांत्रिक निविदाही काढण्यात आली होती. नवनिर्मित राष्ट्रीय महामार्गासाठी १६२.२२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येऊन सदर काम तीन महिन्यांत पूर्ण करायचे होते. मात्र, हे काम संथगतीनेच सुरू झाले. सद्य:स्थितीत काम बंदच असल्याने सदर मार्ग शहराच्या जुन्याच मार्गाने जाणार की बायपासने, याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.

भूमिगत पुलाच्या अप्रोच मार्गांवरून केवळ दुचाकी, ट्रॅक्टर, कार, चारचाकी वाहनेच आवागमन करू शकतात. तसेच रेल्वे पुलाची उंची केवळ ३.६० मीटरच असल्याने मालवाहतूक वाहने बायपास मार्गाने वळवण्यावाचून पर्याय नाही. मात्र, या मार्गाची झालेली दुरवस्था पाहून जड वाहतूकदारांची डोकेदुखी वाढली आहे. सध्या वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

विशेष बाब अशी की, रेल्वे गाड्यांच्या आवागमनामुळे वेळोवेळी रेल्वे फाटक बंद करण्यात येत असल्याने तासनतास वाहतुकीचा खोळंबा होताे. यामुळे जड वाहने उभी ठेवावी लागतात. त्यातही तीन किलोमीटर अधिकचा फेरा मारून वाहतूक करावी लागत असल्याने व हा मार्ग अद्यापही दुर्लक्षित असल्याने बांधकामाचे भिजत घोंगडे कायम आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त हाेत आहे. जड वाहतुकीच्या सोयीसाठी तातडीने या रस्त्याचे बांधकाम करण्याची मागणी देसाईगंजच्या संकल्प सेवा समितीने मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बाॅक्स

फ्लायओव्हरची गरज

देसाईगंज शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूकही वाढली आहे. दुचाकी, चारचाकी वाहने तसेच मालवाहतूक वाहनांचेही आवागमन असते. शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता येथे फ्लायओव्हर निर्माण करण्याची गरज आहे. तेव्हाच येथील वाहतुकीची समस्या सुटू शकते; परंतु संबंधित विभाग या समस्येकडे लक्ष देणार काय, असा सवाल नागरिक करीत आहेत.