शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कर्जवाटपाचा वेग मंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 21:51 IST

जिल्हाभर सध्या समाधानकारक पाऊस असल्यामुळे रोवणीच्या कामांना वेग घेतला आहे. मात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज वाटपाचा वेग अजूनही मंदावलेलाच आहे. खरीप हंगामासाठी सहकार विभागाने दिलेल्या कर्जवाटपाच्या लक्ष्यांकापैकी जेमतेम ३६ टक्के लक्ष्य गाठण्यात आतापर्यंत यश आले आहे.

ठळक मुद्देअवघे ३६ टक्के वाटप : जिल्हा बँकेने मात्र गाठले ७२ टक्के उद्दीष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभर सध्या समाधानकारक पाऊस असल्यामुळे रोवणीच्या कामांना वेग घेतला आहे. मात्र शेतकऱ्यांना कृषी कर्ज वाटपाचा वेग अजूनही मंदावलेलाच आहे. खरीप हंगामासाठी सहकार विभागाने दिलेल्या कर्जवाटपाच्या लक्ष्यांकापैकी जेमतेम ३६ टक्के लक्ष्य गाठण्यात आतापर्यंत यश आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मात्र कर्जवाटपात पुढे असून या बँकेने ७२ टक्के लक्ष्य गाठले आहे.गेल्या १५ दिवसांपासून रोवणीची कामे सुरू आहेत. गेल्या रविवार आणि सोमवारच्या पावसानंतर पावसाने थोडी उसंत घेतली होती. त्यामुळे शेतीच्या कामांनी वेग घेतला. मात्र मजुरीचे दर, खताच्या वाढलेल्या किमती यामुळे शेतकऱ्यांना कर्जाची गरज आहे. हाती पैसा नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची कामेही खोळंबली आहेत. बँकेत सध्या शेतकऱ्यांची गर्दी जास्त आहे. पण राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्जवाटपात आखडता हात घेत आहेत.राष्ट्रीयकृत बँकांना यावर्षी खरीप हंगामासाठी १११ कोटी ६ लाख रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. आतापर्यंत या बँकांनी ४ हजार ३८४ शेतकऱ्यांना २४ कोटी ४० लाखांचे कर्जवाटप केले. उद्दीष्टाच्या तुलनेत हे कर्जवाटप अवघे २२ टक्के आहे. अ‍ॅक्सिस आणि आयसीआयसीआय या दोन्ही खासगी बँकांच्या कर्जवाटपाची स्थिती तर आणखीच बिकट आहे. त्यांनी ३ कोटी ९६ लाख रुपयांच्या उद्दीष्टापैकी केवळ ९ शेतकऱ्यांना ३२ लाख रुपयांचे कर्जवाटप केले. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने ३१ कोटी ८० लाख रुपयांच्या उद्दीष्टापैकी ८ कोटी ५ लाख रुपयांचे कर्ज वाटले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र सहकार विभागाची लाज राखली आहे. त्यांनी ५६ कोटी ९ लाख रुपयांच्या कर्जवाटपाच्या उद्दीष्टापैकी ४० कोटी ३३ लाख रुपये कर्ज वाटून ७२ टक्के उद्दीष्ट गाठले आहे. या बँकेने सर्वाधिक १२ हजार १९९ शेतकऱ्यांना कर्ज दिले.अशा पद्धतीने जिल्हाभरात आतापर्यंत सर्व बँकांमिळून अवघ्या १७ हजार ७७० शेतकऱ्यांना ७३ कोटी १० लाख रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. पुढील काही दिवसात जिल्हा बँक कर्जवाटपाचे उद्दीष्ट ओलांडू शकेल. मात्र इतर बँका दिलेले उद्दीष्टही गाठू शकेल किंवा नाही, याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.२३ टक्क्यांवर धानाची रोवणी आटोपलीमागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात रोवणीच्या कामांना वेग आला आहे. सतत पाऊस असल्याने रोवणीच्या कामांमध्ये सातत्य आहे. धान पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५१ हजार हेक्टर आहे. आतापर्यंत ११ हजार ६२३ हेक्टरवर रोवणीची कामे तर २२ हजार ८७४ हेक्टरवर आवत्या, पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत. याची टक्केवारी २३ टक्के एवढी आहे. सतत पाऊस पडत असल्याने वातवरणामध्ये गारवा आहे. त्यामुळे अपवाद वगळता पिकांवर किडीचा प्रादुर्भाव नाही. पाऊस सुरूच राहिल्यास पुढील १५ दिवसांत रोवणीची कामे आटोपण्याचा अंदाज आहे.खतासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरूकाही शेतकरी धानाच्या रोवणीच्या वेळीच खत टाकतात. तर काही शेतकरी रोवणा पूर्ण झाल्यावर खत टाकतात. रोवणीची कामे सुरू असल्याने खतासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. जिल्ह्यातील खत विक्रेत्यांकडे पुरेसे खत उपलब्ध आहे. त्याचबरोबर पॉस मशीनच्या सहाय्याने खत खरेदी करायचे असल्याने खते विक्रेत्यांकडून होणारी लुबाडणूक बंद झाली आहे.

टॅग्स :bankबँकCrop Loanपीक कर्ज