शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

सहा महिन्यांत २६ मुली गेल्या पळून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:36 IST

गडचिराेली : जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत १८ वर्षांखालील सुमारे २६ मुली पळून गेल्या. त्यापैकी १८ मुलींचा ...

गडचिराेली : जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत १८ वर्षांखालील सुमारे २६ मुली पळून गेल्या. त्यापैकी १८ मुलींचा शाेध घेण्यात पाेलिसांना यश आले आहे तर ८ मुलींचा शाेध घेण्याचे काम सुरू आहे.

१४ ते १८ या वयाेगटातील मुली मन व शरीराने फारशा परिपक्व राहत नाहीत. भावनेच्या आहारी जाऊन त्या निर्णय घेतात. पळून जाणाऱ्या बहुतांश मुली स्वत:च्या मर्जीने प्रियकरासाेबत पळून जातात; मात्र त्या अल्पवयीन असल्याने याबाबतची तक्रार तिच्या पालकांमार्फत पाेलीस स्टेशनमध्ये दाखल केली जाते. पालकांच्या तक्रारीवरून पाेलीस स्टेशनमध्ये प्रियकराविराेधात अपहरणाचा गुन्हा दाखल हाेतो. पालकांच्या तक्रारीवरून मुलीचा शाेध घेण्याची जबाबदारी पाेलिसांवर येऊन पडते व पाेलीस तिचा शाेध घेतात. दिवसेंदिवस अल्पवयीन मुली पळून जाण्याचे प्रकार वाढले आहेत, ही अतिशय गंभीर बाब आहे.

बाॅक्स....

मुली चुकतात कुठे?

उदाहरण १

आज प्रत्येकाच्या घरी स्मार्टफाेन उपलब्ध आहे. मुली फाेनचा वापर सर्वाधिक करतात. फाेनच्या माध्यमातून अश्लील चित्र, व्हिडीओ बघितले जातात. यातून मुलीच्या भावना उत्तेजित हाेऊन मुलांप्रति आकर्षण वाढते. मुलगी जर माेबाइलचा वापर करीत असेल तर पालकांनी तिच्यावर थाेडीफार लक्ष ठेवण्याची गरज आहे.

उदाहरण २

गडचिराेली शहरातील एका मुलीची ओळख मुलासाेबत झाली. यातून मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यावेळी मुलगी केवळ दहाव्या वर्गात शिकत हाेती. म्हणजेच केवळ १४ वर्षांची हाेती. मुलगा मात्र २२ वर्षांचा हाेता. दाेघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेऊन ते घरून पळून गेले; मात्र लग्न हाेऊ शकले नाही. शेवटी आईवडिलांकडे मुलीला परत यावे लागले. यात मुलीची माेठी बदनामी झाली, शाळाही साेडावी लागली.

उदाहरण ३

सहकारी मैत्रीण यांची संगत कशी आहे, या गाेष्टी महत्त्वाच्या आहेत. घरातील वातावरण चांगले असले तरी वाईट मैत्रिणीची संगत असल्यास मुलगी बिघडण्याची शक्यता अधिक राहते. आपली मुलगी कुणासाेबत बाेलते, तिच्या मैत्रिणी काेणत्या, त्या काय करतात, याची माहिती पालकांनी न ठेवल्यास स्वत:ची मुलगीही बिघडण्याची शक्यता राहते.

बाॅक्स...

अल्पवयीन मुली बेपत्ता

२०१८ - ३१

२०१९ - ३७

२०२० - २८

२०२१ - २६

बाॅक्स...

मुला-मुलींचे चुकीचे पाऊल पडू नये म्हणून व्हा त्यांचे मित्र

- मुला-मुलींशी प्रत्येक पालकाने मैत्री करावी. प्रत्येक गोष्ट, सभोवताली घडणाऱ्या घटना, चांगले-वाईट हे त्यांना समजावून सांगावे. कोणताच संकोच मनात बाळगू नये.

- अल्पवयात मुला-मुलींना समज कमी असते. बाहेरील मित्र-मैत्रिणी यांच्याशी जास्त वेळ गप्पा होत असल्या, तर त्याबाबत त्यांना समजावून सांगितले पाहिजे, एखाद्या मुलाचे, मुलीचे पाऊल चुकीचे पडत असेल, तर लगेच लक्षात येते. त्याबाबत त्यांना प्रेमाने व मैत्रीच्या नात्याने समजावून सांगणे केव्हाही चांगले.

- वयाच्या १५ वर्षांनंतर मुला-मुलींमध्ये बदल जाणवतो. मोबाइलचा अति वापर केव्हाही टाळला पाहिजे. मुलांना ते समजावून सांगावे, ऑनलाइन अभ्यासाच्या व्यतिरिक्त मोबाइल हाताळू देऊ नये. मोबाइल का जास्त वापरू नये, त्याची काही उदाहरणे देऊन मुलांना ते पटवून सांगितले पाहिजे.

-आईने मुलीशी तर वडिलांनी मुलांशी खुलून गप्पा केल्या, तर ते त्यांच्या नजरेसमोर घडणाऱ्या घटना, घडामोडी पालकांना सांगतात. नेमकी काय चूक झाली, कशामुळे झाली, हे आपण त्यांना समजावून सांगू शकतो.