शहरं
Join us  
Trending Stories
1
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
2
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
3
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
4
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
5
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
6
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
7
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
8
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
9
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
10
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
11
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
12
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
13
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
14
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग
15
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
16
दिवाळीच्या फटाक्यांवर सरसकट बंदीने प्रदूषणाचा प्रश्न सुटेल काय?
17
सुंदर पिचाई, नाडेला यांची ‘अळी मिळी गुपचिळी’ का?; आयटी क्षेत्रात मोठी अस्वस्थता
18
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
19
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
20
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन

डीजेवर राहणार बारीक नजर

By admin | Updated: September 4, 2014 23:47 IST

उच्च न्यायालयाने ध्वनीच्या तीव्रतेसाठी दिलेल्या मापदंडानुसार ध्वनीचे प्रक्षेपण करावे अशा सूचना पोलीस विभागाने गणेश मंडळांना दिल्या आहेत. गणपती स्थापनेपासून गणेश मंडळे पोलिसांच्या

देसाईगंज : उच्च न्यायालयाने ध्वनीच्या तीव्रतेसाठी दिलेल्या मापदंडानुसार ध्वनीचे प्रक्षेपण करावे अशा सूचना पोलीस विभागाने गणेश मंडळांना दिल्या आहेत. गणपती स्थापनेपासून गणेश मंडळे पोलिसांच्या सूचनांचे काटेकोर पालन करीत आहेत़ मात्र गणेश विसर्जनाच्या दिवशी डीजेच्या आवाजाची तीव्रता उच्च न्यायालयाच्या निकषात मोडत नाही़ त्यामुळे यावर्षी गणेश विसर्जनात डीजेच्या वापरावर विरजण येणार आहेगणेश चतुर्थीपासून सुरू होणारी गणेश भक्तांची पर्वणी गणपती विसर्जनापर्यंत सुरू राहते़ संपूर्ण दहा दिवसांच्या कामाची कसर विसर्जनात काढावी, असा गणेश भक्तांचा नेहमीचा अंदाज असतो़ त्यानुसार गणेश मंडळे कामाला लागतात. गोळा केलेल्या वर्गणीपैकी मूर्ती विसर्जनासाठी डीजेसारख्या ध्वनी प्रक्षेपणाकरिता मोठी रक्कम पूर्वीच वेगळी काढून ठेवली जाते़ विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजेच्या तालावर मंत्रमुग्ध होऊन नाचून दहा दिवसांची हौस पूर्ण करतात. मात्र यावर्षी पोलीस विभागाने गणेश मंडळाच्या सभेत डीजेवर पूर्णपणे बंदी असल्याचे सांगितले़ यापूर्वी केवळ शहरी भागात जास्त डेसिबलच्या ध्वनी प्रक्षेपणावर बंदी होती. ग्रामीण भागात याकडे कोणीही लक्ष देत नव्हते़ मात्र आता डीजेच्या वापरावर विरजण येणार आहे़ पोलीस विभागाने मुंबई, नागपूरचे निकष गडचिरोलीसारख्या उद्योगविरहीत जिल्ह्यात लावून सर्वसामान्यांच्या आनंदावर पाणी पाडले आहे़ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण अधिनियम २००० नुसार दिवसाकरिता औद्योगिक क्षेत्राकरिता ७५, व्यवसायिक क्षेत्राकरिता ६५, घरगुती क्षेत्राकरिता ५५, शांत झोनकरिता ५० डेसिबल आवाजाची तिव्रता ठरवून दिली आहे़ मात्र मुंबईसारख्या मोठ्या शहरात गणेश मंडळे, दहीहंडी स्पर्धाच्या वेळी नियमन मंडळाने ठरवून दिलेल्या निकषाची सर्रास पायमल्ली व्हायची़ विविध राजकीय पुढाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे नियमन व नियंत्रण मंडळाच्या नियमाना डावलले जात होते. तीव्र आवाजामुळे हृदयविकार, मानसिक असंतूलन, बहिरेपणा तसेच गर्भवती स्त्रियांच्या गर्भाला धोका होण्याची भीति आहे़ त्यामुळे मुंंबई येथील आवाज फाऊंडेशनच्या सुमैरा अब्दूल अली या युवतीने मुंबई उच्च न्यायालयात तीव्र ध्वनी प्रक्षेपणाबाबत १२ नोव्हेंबर २००७ साली दाद मागितली़ यावर केन्द्र सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालय, राज्य सरकार व ध्वनी प्रदूषण नियम मंडळ यांनी आवाज फाऊंडेशच्या मागण्या ११ जानेवारी २०१० ला मान्य केल्या़ तेव्हापासूनच राज्य शासनाने ध्वनी प्रक्षेपणाच्या तीव्र आवाजाला वेसण घातली आहे़ ध्वनीची तिव्रता मोजण्याचे अत्याधुनिक यंत्रणा आपल्याकडील पोलीस विभागाकडे उपलब्ध देखील नाही़ डेसिबलची मर्यादा ओलांडणाऱ्या गणेश मंडळावर ध्वनीप्रदूषण नियमन व नियंत्रण अनियम ५ व ६ आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ मधील कलम १५ अन्वये पाच वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असून हा गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र देखील ठरलेला आहे. (वार्ताहर)