शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

सातबारा परिवर्तनास गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 23:56 IST

वर्ग-२ मधील जमिनी वर्ग-१ मध्ये परावर्तित करण्याच्या प्रक्रियेला मुलचेरा तालुक्यात गती प्राप्त झाली असून वर्षभरात ४५१ शेतकऱ्यांचा सातबारा वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये परावर्तीत झाला आहेत.

ठळक मुद्देप्रशासन पोहोचले नागरिकांच्या दारी : मुलचेरा तालुका प्रशासनाचे कार्य

लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : वर्ग-२ मधील जमिनी वर्ग-१ मध्ये परावर्तित करण्याच्या प्रक्रियेला मुलचेरा तालुक्यात गती प्राप्त झाली असून वर्षभरात ४५१ शेतकऱ्यांचा सातबारा वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये परावर्तीत झाला आहेत.तालुक्यातील सर्व सातबारांचे संगणकीकरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. संजय गांधी शाखेअंतर्गत निराधार योजना, श्रावणबाळ योजनेअंतर्गत ४ हजार १०० लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेअंतर्गत २६ लाभार्थी व आम आदमी विमा योजनेअंतर्गत ३६ प्रकरणे मंजूर झाली आहेत. ४ हजार ५१३ नागरिकांना उत्पन्न, जात, अधिवास प्रमाणपत्र वितरित केले आहे. वनहक्क वाटप उपक्रमाअंतर्गत देवदा येथील ५९ लाभार्थ्यांना वनहक्क पट्ट्यांचे वाटप केले आहे. त्याचबरोबर तालुक्यातील १ हजार ८०९ नागरिकांना वैयक्तिक पट्टे व ८६ लाभार्थ्यांना सामूदायिक पट्टे वितरित केले आहेत. ४०.७९ हेक्टर आर झुडूपी जंगल निर्वानीचे प्रस्ताव सादर केले आहेत. १२ गावांना पेसा गावांचा दर्जा देण्याबाबत प्रस्ताव सादर झाले आहेत. गारपीठग्रस्त ७० मका शेतकºयांना १ लाख ९१ हजार रूपयांच्या मदतीचे वाटप झाले आहे. ३८३ धान उत्पादक शेतकºयांना २२ लाख ८४ हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे. त्यापैकी १६ लाख रूपयांच्या मदतीचे वाटप झाले आहे.निवडणूक शाखेच्या वतीने यावर्षी घरोघरी जाऊन मतदारांची माहिती गोळा केली. ५१५ नवीन मतदार झाले आहेत. ३१७ मतदारांचा मृत्यू झाल्याने त्यांची नावे कमी केली आहेत. तर २७० मतदार स्थलांतरित झाले आहेत. तर १२४ मतदारांची नावे दोनदा झाली असल्याचे आढळून आले. सदर बदलही करण्यात आला. धन्नूर गावातील आपातग्रस्तांना १६ लाख रूपयांची मदत दिली आहे. जखमी व्यक्तींना ३८ हजार ५०० मृत जनावरांच्या मालकांना ५४ हजार रूपयांची मदत वितरित केली आहे. अंत्योदय योजनेअंतर्गत ४ हजार ५१५ कुटुंब, अन्न सुरक्षा अंतर्गत १७ हजार ७९ लाभार्थ्यांना राशनचा लाभ दिला जात आहे. हे सर्व उपक्रम मुलचेराचे तहसीलदार अनिरूद्ध कांबळे यांच्या मार्गदर्शनात केले जातात.चार हजार कुटुंबांना रोहयोची कामेचालू आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेअंतर्गत ४ हजार ३७ कुटुंबातील ८ हजार ८१६ नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. एकूण २ लाख ६७ हजार २७० मनुष्य दिवस रोजगाराची निर्मिती झाली आहे. ५ कोटी ८५ लाख रूपयांची मजुरी अदा केली आहे. रोजगार हमी योजनेच्या मजुरांना त्याच हप्त्यात मजुरी उपलब्ध होईल, यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. त्यामुळे मजुरी थकीत राहण्याचे प्रमाण मुलचेरा तालुक्यात अतिशय कमी आहे. रोजगाराची मागणी होताच रोजगार उपलब्ध करून दिला जातो, अशी माहिती मुलचेराचे तहसीलदार अनिरूद्ध कांबळे यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेती