शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

सातबारा परिवर्तनास गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 23:56 IST

वर्ग-२ मधील जमिनी वर्ग-१ मध्ये परावर्तित करण्याच्या प्रक्रियेला मुलचेरा तालुक्यात गती प्राप्त झाली असून वर्षभरात ४५१ शेतकऱ्यांचा सातबारा वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये परावर्तीत झाला आहेत.

ठळक मुद्देप्रशासन पोहोचले नागरिकांच्या दारी : मुलचेरा तालुका प्रशासनाचे कार्य

लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : वर्ग-२ मधील जमिनी वर्ग-१ मध्ये परावर्तित करण्याच्या प्रक्रियेला मुलचेरा तालुक्यात गती प्राप्त झाली असून वर्षभरात ४५१ शेतकऱ्यांचा सातबारा वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये परावर्तीत झाला आहेत.तालुक्यातील सर्व सातबारांचे संगणकीकरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. संजय गांधी शाखेअंतर्गत निराधार योजना, श्रावणबाळ योजनेअंतर्गत ४ हजार १०० लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेअंतर्गत २६ लाभार्थी व आम आदमी विमा योजनेअंतर्गत ३६ प्रकरणे मंजूर झाली आहेत. ४ हजार ५१३ नागरिकांना उत्पन्न, जात, अधिवास प्रमाणपत्र वितरित केले आहे. वनहक्क वाटप उपक्रमाअंतर्गत देवदा येथील ५९ लाभार्थ्यांना वनहक्क पट्ट्यांचे वाटप केले आहे. त्याचबरोबर तालुक्यातील १ हजार ८०९ नागरिकांना वैयक्तिक पट्टे व ८६ लाभार्थ्यांना सामूदायिक पट्टे वितरित केले आहेत. ४०.७९ हेक्टर आर झुडूपी जंगल निर्वानीचे प्रस्ताव सादर केले आहेत. १२ गावांना पेसा गावांचा दर्जा देण्याबाबत प्रस्ताव सादर झाले आहेत. गारपीठग्रस्त ७० मका शेतकºयांना १ लाख ९१ हजार रूपयांच्या मदतीचे वाटप झाले आहे. ३८३ धान उत्पादक शेतकºयांना २२ लाख ८४ हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे. त्यापैकी १६ लाख रूपयांच्या मदतीचे वाटप झाले आहे.निवडणूक शाखेच्या वतीने यावर्षी घरोघरी जाऊन मतदारांची माहिती गोळा केली. ५१५ नवीन मतदार झाले आहेत. ३१७ मतदारांचा मृत्यू झाल्याने त्यांची नावे कमी केली आहेत. तर २७० मतदार स्थलांतरित झाले आहेत. तर १२४ मतदारांची नावे दोनदा झाली असल्याचे आढळून आले. सदर बदलही करण्यात आला. धन्नूर गावातील आपातग्रस्तांना १६ लाख रूपयांची मदत दिली आहे. जखमी व्यक्तींना ३८ हजार ५०० मृत जनावरांच्या मालकांना ५४ हजार रूपयांची मदत वितरित केली आहे. अंत्योदय योजनेअंतर्गत ४ हजार ५१५ कुटुंब, अन्न सुरक्षा अंतर्गत १७ हजार ७९ लाभार्थ्यांना राशनचा लाभ दिला जात आहे. हे सर्व उपक्रम मुलचेराचे तहसीलदार अनिरूद्ध कांबळे यांच्या मार्गदर्शनात केले जातात.चार हजार कुटुंबांना रोहयोची कामेचालू आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेअंतर्गत ४ हजार ३७ कुटुंबातील ८ हजार ८१६ नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. एकूण २ लाख ६७ हजार २७० मनुष्य दिवस रोजगाराची निर्मिती झाली आहे. ५ कोटी ८५ लाख रूपयांची मजुरी अदा केली आहे. रोजगार हमी योजनेच्या मजुरांना त्याच हप्त्यात मजुरी उपलब्ध होईल, यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. त्यामुळे मजुरी थकीत राहण्याचे प्रमाण मुलचेरा तालुक्यात अतिशय कमी आहे. रोजगाराची मागणी होताच रोजगार उपलब्ध करून दिला जातो, अशी माहिती मुलचेराचे तहसीलदार अनिरूद्ध कांबळे यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेती