शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

सातबारा परिवर्तनास गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 23:56 IST

वर्ग-२ मधील जमिनी वर्ग-१ मध्ये परावर्तित करण्याच्या प्रक्रियेला मुलचेरा तालुक्यात गती प्राप्त झाली असून वर्षभरात ४५१ शेतकऱ्यांचा सातबारा वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये परावर्तीत झाला आहेत.

ठळक मुद्देप्रशासन पोहोचले नागरिकांच्या दारी : मुलचेरा तालुका प्रशासनाचे कार्य

लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : वर्ग-२ मधील जमिनी वर्ग-१ मध्ये परावर्तित करण्याच्या प्रक्रियेला मुलचेरा तालुक्यात गती प्राप्त झाली असून वर्षभरात ४५१ शेतकऱ्यांचा सातबारा वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये परावर्तीत झाला आहेत.तालुक्यातील सर्व सातबारांचे संगणकीकरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. संजय गांधी शाखेअंतर्गत निराधार योजना, श्रावणबाळ योजनेअंतर्गत ४ हजार १०० लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेअंतर्गत २६ लाभार्थी व आम आदमी विमा योजनेअंतर्गत ३६ प्रकरणे मंजूर झाली आहेत. ४ हजार ५१३ नागरिकांना उत्पन्न, जात, अधिवास प्रमाणपत्र वितरित केले आहे. वनहक्क वाटप उपक्रमाअंतर्गत देवदा येथील ५९ लाभार्थ्यांना वनहक्क पट्ट्यांचे वाटप केले आहे. त्याचबरोबर तालुक्यातील १ हजार ८०९ नागरिकांना वैयक्तिक पट्टे व ८६ लाभार्थ्यांना सामूदायिक पट्टे वितरित केले आहेत. ४०.७९ हेक्टर आर झुडूपी जंगल निर्वानीचे प्रस्ताव सादर केले आहेत. १२ गावांना पेसा गावांचा दर्जा देण्याबाबत प्रस्ताव सादर झाले आहेत. गारपीठग्रस्त ७० मका शेतकºयांना १ लाख ९१ हजार रूपयांच्या मदतीचे वाटप झाले आहे. ३८३ धान उत्पादक शेतकºयांना २२ लाख ८४ हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे. त्यापैकी १६ लाख रूपयांच्या मदतीचे वाटप झाले आहे.निवडणूक शाखेच्या वतीने यावर्षी घरोघरी जाऊन मतदारांची माहिती गोळा केली. ५१५ नवीन मतदार झाले आहेत. ३१७ मतदारांचा मृत्यू झाल्याने त्यांची नावे कमी केली आहेत. तर २७० मतदार स्थलांतरित झाले आहेत. तर १२४ मतदारांची नावे दोनदा झाली असल्याचे आढळून आले. सदर बदलही करण्यात आला. धन्नूर गावातील आपातग्रस्तांना १६ लाख रूपयांची मदत दिली आहे. जखमी व्यक्तींना ३८ हजार ५०० मृत जनावरांच्या मालकांना ५४ हजार रूपयांची मदत वितरित केली आहे. अंत्योदय योजनेअंतर्गत ४ हजार ५१५ कुटुंब, अन्न सुरक्षा अंतर्गत १७ हजार ७९ लाभार्थ्यांना राशनचा लाभ दिला जात आहे. हे सर्व उपक्रम मुलचेराचे तहसीलदार अनिरूद्ध कांबळे यांच्या मार्गदर्शनात केले जातात.चार हजार कुटुंबांना रोहयोची कामेचालू आर्थिक वर्षात रोजगार हमी योजनेअंतर्गत ४ हजार ३७ कुटुंबातील ८ हजार ८१६ नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. एकूण २ लाख ६७ हजार २७० मनुष्य दिवस रोजगाराची निर्मिती झाली आहे. ५ कोटी ८५ लाख रूपयांची मजुरी अदा केली आहे. रोजगार हमी योजनेच्या मजुरांना त्याच हप्त्यात मजुरी उपलब्ध होईल, यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. त्यामुळे मजुरी थकीत राहण्याचे प्रमाण मुलचेरा तालुक्यात अतिशय कमी आहे. रोजगाराची मागणी होताच रोजगार उपलब्ध करून दिला जातो, अशी माहिती मुलचेराचे तहसीलदार अनिरूद्ध कांबळे यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेती