शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

बियाण्यांची खरेदी निम्म्याने घटली

By admin | Updated: July 31, 2015 01:39 IST

मागील वर्षीच्या खरीप हंगामात सुमारे २४ हजार ३९१ क्विंटल बियाण्यांची खरेदी शेतकऱ्यांनी केली होती.

घरच्या बियाण्यांचा वापर वाढला : धानाला कमी भाव असल्याचा परिणामदिगांबर जवादे गडचिरोलीमागील वर्षीच्या खरीप हंगामात सुमारे २४ हजार ३९१ क्विंटल बियाण्यांची खरेदी शेतकऱ्यांनी केली होती. यावर्षीच्या हंगामात मात्र ही खरेदी निम्म्यावर आली असून ३० जुलैपर्यंत केवळ १२ हजार ५८६ क्विंटल बियाण्यांची खरेदी शेतकऱ्यांनी केली आहे. चांगल्या दर्जाच्या बियाण्यांची उगवण क्षमता अधिक राहते. त्याचबरोबर सदर बियाण्यांचा वापर केल्याने उत्पादनात वाढ होत असल्याने शेतकरी वर्ग कंपन्यांच्या मार्फतीने तयार केलेले बियाणे शेतात वापरण्यावर अधिक भर देत होते. त्यामुळे मागील काही वर्षात खासगी कंपन्यांच्या मार्फतीने तयार करण्यात आलेल्या बियाण्यांचा वापर वाढला होता. याचा फायदा बियाणे कंपन्यांनी उचलण्यास सुरूवात केली होती. शेतकऱ्यांकडचे बियाणे खरेदी केल्यानंतर सदर बियाणे पॅकींग करून तीन पट किमतीने विकले जात होते. परिणामी बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना फार मोठी किमत मोजावी लागत होती. मागील वर्षी जिल्हा भरातील शेतकऱ्यांनी सुमारे २४ हजार ३९१ क्विंटल बियाण्यांची खरेदी केली होती. गडचिरोली जिल्ह्यात धानाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जात असल्याने धानाच्या बियाण्यांची सर्वाधिक विक्री झाली. मागील वर्षीच्या हंगामात सुमारे २३ हजार ३४८ क्विंटल धानाच्या बियाण्यांची खरेदी करण्यात आली होती. यावर्षी मात्र ही मागणी निम्म्याने घटली आहे. ३० जुलैपर्यंत केवळ १२ हजार ५८६ क्विंटल बियाणे खरेदी करण्यात आले आहे. त्यामध्ये धानाचे बियाणे ११ हजार ८०० क्विंटल एवढे आहे. पेरणीचा हंगाम पूर्णपणे संपला असून यानंतर बियाण्यांची मागणी होणे शक्य नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अत्यंत कमी भाव मिळाला. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली नाही. जवळ असलेले धान्य बियाणे म्हणून वापरले. धानाला कमी भाव मिळाल्याने महागडे बियाणे खरेदी करणेही शक्य नव्हते. यावर्षी अगदी सुरूवातीपासूनच पाऊस हुलकावणी देत आहे. महागडे बियाणे पेरूनही करपण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे महागडे बियाणे खरेदीकडे बहुतांश शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असल्याचे दिसून येते.शेतकऱ्यांनी स्वत:च शोधला पर्यायबियाणे कंपन्या शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करतात. त्यातील खराब बियाणे काढून घेतात. उर्वरित बियाण्यांना किडनाशक पदार्थ लावून ते चांगल्या पध्दतीने पॅकींग केले जाते. एवढी प्रक्रिया करण्यासाठी बियाणे कंपन्या तीन ते चार पट किमत वसूल करून अफाट नफा कमवित आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर कृषी विभागाने शेतकऱ्यांना घरचेच बियाणे कसे किडनाशक बनवावे, याचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना किडनाशक बियाणे कसे करावे हे माहीत झाले. परिणामी शेतकऱ्यांनी स्वत:च चांगले बियाणे करण्यास सुरूवात केली. त्यामुळे बाजारातील बियाण्यांची मागणी प्रथमच यावर्षी निम्म्याने घटली आहे.