शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यांची खरेदी निम्म्याने घटली

By admin | Updated: July 31, 2015 01:39 IST

मागील वर्षीच्या खरीप हंगामात सुमारे २४ हजार ३९१ क्विंटल बियाण्यांची खरेदी शेतकऱ्यांनी केली होती.

घरच्या बियाण्यांचा वापर वाढला : धानाला कमी भाव असल्याचा परिणामदिगांबर जवादे गडचिरोलीमागील वर्षीच्या खरीप हंगामात सुमारे २४ हजार ३९१ क्विंटल बियाण्यांची खरेदी शेतकऱ्यांनी केली होती. यावर्षीच्या हंगामात मात्र ही खरेदी निम्म्यावर आली असून ३० जुलैपर्यंत केवळ १२ हजार ५८६ क्विंटल बियाण्यांची खरेदी शेतकऱ्यांनी केली आहे. चांगल्या दर्जाच्या बियाण्यांची उगवण क्षमता अधिक राहते. त्याचबरोबर सदर बियाण्यांचा वापर केल्याने उत्पादनात वाढ होत असल्याने शेतकरी वर्ग कंपन्यांच्या मार्फतीने तयार केलेले बियाणे शेतात वापरण्यावर अधिक भर देत होते. त्यामुळे मागील काही वर्षात खासगी कंपन्यांच्या मार्फतीने तयार करण्यात आलेल्या बियाण्यांचा वापर वाढला होता. याचा फायदा बियाणे कंपन्यांनी उचलण्यास सुरूवात केली होती. शेतकऱ्यांकडचे बियाणे खरेदी केल्यानंतर सदर बियाणे पॅकींग करून तीन पट किमतीने विकले जात होते. परिणामी बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना फार मोठी किमत मोजावी लागत होती. मागील वर्षी जिल्हा भरातील शेतकऱ्यांनी सुमारे २४ हजार ३९१ क्विंटल बियाण्यांची खरेदी केली होती. गडचिरोली जिल्ह्यात धानाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जात असल्याने धानाच्या बियाण्यांची सर्वाधिक विक्री झाली. मागील वर्षीच्या हंगामात सुमारे २३ हजार ३४८ क्विंटल धानाच्या बियाण्यांची खरेदी करण्यात आली होती. यावर्षी मात्र ही मागणी निम्म्याने घटली आहे. ३० जुलैपर्यंत केवळ १२ हजार ५८६ क्विंटल बियाणे खरेदी करण्यात आले आहे. त्यामध्ये धानाचे बियाणे ११ हजार ८०० क्विंटल एवढे आहे. पेरणीचा हंगाम पूर्णपणे संपला असून यानंतर बियाण्यांची मागणी होणे शक्य नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अत्यंत कमी भाव मिळाला. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली नाही. जवळ असलेले धान्य बियाणे म्हणून वापरले. धानाला कमी भाव मिळाल्याने महागडे बियाणे खरेदी करणेही शक्य नव्हते. यावर्षी अगदी सुरूवातीपासूनच पाऊस हुलकावणी देत आहे. महागडे बियाणे पेरूनही करपण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे महागडे बियाणे खरेदीकडे बहुतांश शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असल्याचे दिसून येते.शेतकऱ्यांनी स्वत:च शोधला पर्यायबियाणे कंपन्या शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करतात. त्यातील खराब बियाणे काढून घेतात. उर्वरित बियाण्यांना किडनाशक पदार्थ लावून ते चांगल्या पध्दतीने पॅकींग केले जाते. एवढी प्रक्रिया करण्यासाठी बियाणे कंपन्या तीन ते चार पट किमत वसूल करून अफाट नफा कमवित आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर कृषी विभागाने शेतकऱ्यांना घरचेच बियाणे कसे किडनाशक बनवावे, याचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना किडनाशक बियाणे कसे करावे हे माहीत झाले. परिणामी शेतकऱ्यांनी स्वत:च चांगले बियाणे करण्यास सुरूवात केली. त्यामुळे बाजारातील बियाण्यांची मागणी प्रथमच यावर्षी निम्म्याने घटली आहे.