शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

बियाण्यांची खरेदी निम्म्याने घटली

By admin | Updated: July 31, 2015 01:39 IST

मागील वर्षीच्या खरीप हंगामात सुमारे २४ हजार ३९१ क्विंटल बियाण्यांची खरेदी शेतकऱ्यांनी केली होती.

घरच्या बियाण्यांचा वापर वाढला : धानाला कमी भाव असल्याचा परिणामदिगांबर जवादे गडचिरोलीमागील वर्षीच्या खरीप हंगामात सुमारे २४ हजार ३९१ क्विंटल बियाण्यांची खरेदी शेतकऱ्यांनी केली होती. यावर्षीच्या हंगामात मात्र ही खरेदी निम्म्यावर आली असून ३० जुलैपर्यंत केवळ १२ हजार ५८६ क्विंटल बियाण्यांची खरेदी शेतकऱ्यांनी केली आहे. चांगल्या दर्जाच्या बियाण्यांची उगवण क्षमता अधिक राहते. त्याचबरोबर सदर बियाण्यांचा वापर केल्याने उत्पादनात वाढ होत असल्याने शेतकरी वर्ग कंपन्यांच्या मार्फतीने तयार केलेले बियाणे शेतात वापरण्यावर अधिक भर देत होते. त्यामुळे मागील काही वर्षात खासगी कंपन्यांच्या मार्फतीने तयार करण्यात आलेल्या बियाण्यांचा वापर वाढला होता. याचा फायदा बियाणे कंपन्यांनी उचलण्यास सुरूवात केली होती. शेतकऱ्यांकडचे बियाणे खरेदी केल्यानंतर सदर बियाणे पॅकींग करून तीन पट किमतीने विकले जात होते. परिणामी बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना फार मोठी किमत मोजावी लागत होती. मागील वर्षी जिल्हा भरातील शेतकऱ्यांनी सुमारे २४ हजार ३९१ क्विंटल बियाण्यांची खरेदी केली होती. गडचिरोली जिल्ह्यात धानाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जात असल्याने धानाच्या बियाण्यांची सर्वाधिक विक्री झाली. मागील वर्षीच्या हंगामात सुमारे २३ हजार ३४८ क्विंटल धानाच्या बियाण्यांची खरेदी करण्यात आली होती. यावर्षी मात्र ही मागणी निम्म्याने घटली आहे. ३० जुलैपर्यंत केवळ १२ हजार ५८६ क्विंटल बियाणे खरेदी करण्यात आले आहे. त्यामध्ये धानाचे बियाणे ११ हजार ८०० क्विंटल एवढे आहे. पेरणीचा हंगाम पूर्णपणे संपला असून यानंतर बियाण्यांची मागणी होणे शक्य नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अत्यंत कमी भाव मिळाला. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली नाही. जवळ असलेले धान्य बियाणे म्हणून वापरले. धानाला कमी भाव मिळाल्याने महागडे बियाणे खरेदी करणेही शक्य नव्हते. यावर्षी अगदी सुरूवातीपासूनच पाऊस हुलकावणी देत आहे. महागडे बियाणे पेरूनही करपण्याची शक्यता अधिक होती. त्यामुळे महागडे बियाणे खरेदीकडे बहुतांश शेतकऱ्यांनी पाठ फिरविली असल्याचे दिसून येते.शेतकऱ्यांनी स्वत:च शोधला पर्यायबियाणे कंपन्या शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करतात. त्यातील खराब बियाणे काढून घेतात. उर्वरित बियाण्यांना किडनाशक पदार्थ लावून ते चांगल्या पध्दतीने पॅकींग केले जाते. एवढी प्रक्रिया करण्यासाठी बियाणे कंपन्या तीन ते चार पट किमत वसूल करून अफाट नफा कमवित आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर कृषी विभागाने शेतकऱ्यांना घरचेच बियाणे कसे किडनाशक बनवावे, याचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना किडनाशक बियाणे कसे करावे हे माहीत झाले. परिणामी शेतकऱ्यांनी स्वत:च चांगले बियाणे करण्यास सुरूवात केली. त्यामुळे बाजारातील बियाण्यांची मागणी प्रथमच यावर्षी निम्म्याने घटली आहे.