शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

स्कूल व्हॅन व्यावसायिकांना शाळा बंदचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 05:00 IST

 मागील १५ महिन्यांपासून कोरोना महामारीने ‘सळो की पळो’ करून सोडले, त्यामुळे देशासह महाराष्ट्रात लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी शासनाला करावी लागली. त्यासाठी सर्वत्र शाळा, कॉन्व्हेंट बंद करण्यात आले. यामुळे स्कूल व्हॅन चालक-मालकावर मोठे संकट ओढवले. अनेकांनी बँक, खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढून स्कूल व्हॅन खरेदी करून व्यवसाय सुरू केला. मात्र, काेराेनामुळे त्यांचा रोजगार हिरावला गेला.

ठळक मुद्देराेजगार हिरावला : कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा?

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने स्कूल व्हॅन बंद असून जागेवरच उभ्या आहेत. त्यामुळे व्हॅन मालक-चालकाला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे. शाळा बंदचा फटका या व्यावसायिकांना बसला आहे. अनेक व्यावसायिक शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा करत आहेत.  मागील १५ महिन्यांपासून कोरोना महामारीने ‘सळो की पळो’ करून सोडले, त्यामुळे देशासह महाराष्ट्रात लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी शासनाला करावी लागली. त्यासाठी सर्वत्र शाळा, कॉन्व्हेंट बंद करण्यात आले. यामुळे स्कूल व्हॅन चालक-मालकावर मोठे संकट ओढवले. अनेकांनी बँक, खासगी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढून स्कूल व्हॅन खरेदी करून व्यवसाय सुरू केला. मात्र, काेराेनामुळे त्यांचा रोजगार हिरावला गेला. शहरात जवळपास ११ स्कूल व्हॅन चालक असून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे तसेच वेळोवेळी करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे या व्यवसायावर संक्रांत आली आणि व्हॅन उभ्या ठेवण्याची पाळी आली. चालक व मालकापुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे मोठे संकट ओढवले तर बँकेचे कर्ज कसे भरायचे, कुटुंबाचा खर्च कसा करायचा, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यावर्षी तरी शाळा सुरू होतील, अशी आशा होती; मात्र शाळा सुरू झाल्या तेही विद्यार्थ्यांविना. त्यामुळे त्यांची आशा मावळली आहे.  तालुक्यात बऱ्याच ठिकाणी कॉन्व्हेंट असल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी ये-जा करत असतात; मात्र शाळा बंदचा त्यांनाही फटका बसला. शिक्षणासाठी काम करीत असलेल्या स्कूल व्हॅन चालक - मालकांचा शासनाने सुद्धा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे- त्यासाठी कॉन्व्हेंट, शाळा सुरू करावी म्हणजे व्हॅन चालकांचा व्यवसाय सुरू होईल़, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शाळा सुरू  झाल्यानंतर विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्था हाेणार आहे. व्यवसायावर बंधने n स्कूल व्हॅन, बसमधून केवळ विद्यार्थ्यांना ने-आण करण्याची परवानगी आरटीओ कार्यालयाकडून मिळते. या गाडीने अन्य प्रकारची प्रवासी वाहतूक व इतर वाहतूक करण्यास उपयोग करता येत नाही, त्यासाठी सर्वांना कारवाईची भीती असते. त्यामुळे आता शासनाच्या निर्णयाकडे या व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

शाळा सुरू करण्याची मागणीगेल्या अनेक वर्षांपासून नोकऱ्या मिळणे कठीण झाले. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्कूल व्हॅन व्यवसाय सुरू केला; मात्र कोरोनामुळे तोही रोजगार हिरावला. त्यामुळे व्यवसायावर मोठे संकट ओढवले आहे. घेतलेले कर्ज कसे भरायचे, या विवंचनेत असल्याचे सांगून शासनाने विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.- गुड्डू येनगट्टीवार, वाहन चालक-मालक व्यावसायिक चामोर्शी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याjobनोकरी