शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

शालेय पाठ्यपुस्तके तालुकास्थळी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:29 IST

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शाळा सुरू होण्यास पुन्हा महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना तालुकास्तरावर पुस्तके पोहोचविण्यात आली आहेत. तालुकास्तरावरून पुस्तके घेऊन जाण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार आहे.

ठळक मुद्दे१.१७ लाख लाभार्थी : शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शाळा सुरू होण्यास पुन्हा महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना तालुकास्तरावर पुस्तके पोहोचविण्यात आली आहेत. तालुकास्तरावरून पुस्तके घेऊन जाण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार आहे.समग्र शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुदानित, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे मोफत वितरण केले जाते. शासनाकडून पाठ्यपुस्तके मिळत असल्याने पालकवर्ग पाठ्यपुस्तके खरेदी करीत नाही. पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थी शाळेमध्ये यावा, यासाठी शाळेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे पहिल्या वर्गातील विद्यार्थी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत पोहोचतो. मात्र त्याला पाठ्यपुस्तके मिळाली नाही तर त्याचा हिरमोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच तालुकास्तरावरील गट शिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत पुस्तके पोहोचविण्यात आली आहेत.जिल्हाभरात एकूण १ लाख १६ हजार ९१० लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना ६ लाख ३४ हजार ४८६ पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. जिल्हाभरात पहिल्या वर्गाचे एकूण १४ हजार ३१३, दुसऱ्या वर्गाचे १४ हजार ३७३, तिसºया वर्गाचे १४ हजार ७०३, चौथ्या वर्गाचे १४ हजार ८८९, पाचव्या वर्गाचे १४ हजार ३६६, सहाव्या वर्गाचे १४ हजार ५०८, सातव्या वर्गाचे १५ हजार २०८, आठव्या वर्गाचे १५ हजार २०८ लाभार्थी विद्यार्थी आहेत.विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांवर अन्यायसर्व शिक्षा अभियान अंतर्गत अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांवर असा भेदभाव केला जातो. पाठ्यपुस्तके केवळ अनुदानित शाळांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांना दिली जातात. मात्र विनाअनुदानित शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जात नाही. त्यामुळे विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये दुजाभाव केल्याची भावना निर्माण होते. शासन विनाअनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन देत नाही. दुसरीकडे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेशापासून वंचित ठेवून त्यांची कुचंबना करते.गणवेशाचा निधी आलाच नाहीगट शिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचली असली तरी गणवेशाचा निधी मात्र उपलब्ध झाला नाही. गणवेश खरेदी करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, हे सुध्दा अजूनपर्यंत निश्चित झाले नाही. मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना गणवेशाचे पैसे किंवा गणवेश उपलब्ध होण्यासाठी अर्धे सत्र संपत असल्याचा अनुभव येत आहे. अजुनपर्यंत निधी न आल्याने याही वर्षी गणवेश मिळण्यास उशीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.