शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

शालेय पाठ्यपुस्तके तालुकास्थळी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:29 IST

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शाळा सुरू होण्यास पुन्हा महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना तालुकास्तरावर पुस्तके पोहोचविण्यात आली आहेत. तालुकास्तरावरून पुस्तके घेऊन जाण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार आहे.

ठळक मुद्दे१.१७ लाख लाभार्थी : शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शाळा सुरू होण्यास पुन्हा महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना तालुकास्तरावर पुस्तके पोहोचविण्यात आली आहेत. तालुकास्तरावरून पुस्तके घेऊन जाण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार आहे.समग्र शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुदानित, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे मोफत वितरण केले जाते. शासनाकडून पाठ्यपुस्तके मिळत असल्याने पालकवर्ग पाठ्यपुस्तके खरेदी करीत नाही. पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थी शाळेमध्ये यावा, यासाठी शाळेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे पहिल्या वर्गातील विद्यार्थी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत पोहोचतो. मात्र त्याला पाठ्यपुस्तके मिळाली नाही तर त्याचा हिरमोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच तालुकास्तरावरील गट शिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत पुस्तके पोहोचविण्यात आली आहेत.जिल्हाभरात एकूण १ लाख १६ हजार ९१० लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना ६ लाख ३४ हजार ४८६ पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. जिल्हाभरात पहिल्या वर्गाचे एकूण १४ हजार ३१३, दुसऱ्या वर्गाचे १४ हजार ३७३, तिसºया वर्गाचे १४ हजार ७०३, चौथ्या वर्गाचे १४ हजार ८८९, पाचव्या वर्गाचे १४ हजार ३६६, सहाव्या वर्गाचे १४ हजार ५०८, सातव्या वर्गाचे १५ हजार २०८, आठव्या वर्गाचे १५ हजार २०८ लाभार्थी विद्यार्थी आहेत.विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांवर अन्यायसर्व शिक्षा अभियान अंतर्गत अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांवर असा भेदभाव केला जातो. पाठ्यपुस्तके केवळ अनुदानित शाळांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांना दिली जातात. मात्र विनाअनुदानित शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जात नाही. त्यामुळे विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये दुजाभाव केल्याची भावना निर्माण होते. शासन विनाअनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन देत नाही. दुसरीकडे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेशापासून वंचित ठेवून त्यांची कुचंबना करते.गणवेशाचा निधी आलाच नाहीगट शिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचली असली तरी गणवेशाचा निधी मात्र उपलब्ध झाला नाही. गणवेश खरेदी करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, हे सुध्दा अजूनपर्यंत निश्चित झाले नाही. मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना गणवेशाचे पैसे किंवा गणवेश उपलब्ध होण्यासाठी अर्धे सत्र संपत असल्याचा अनुभव येत आहे. अजुनपर्यंत निधी न आल्याने याही वर्षी गणवेश मिळण्यास उशीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.