शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

शालेय पाठ्यपुस्तके तालुकास्थळी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:29 IST

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शाळा सुरू होण्यास पुन्हा महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना तालुकास्तरावर पुस्तके पोहोचविण्यात आली आहेत. तालुकास्तरावरून पुस्तके घेऊन जाण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार आहे.

ठळक मुद्दे१.१७ लाख लाभार्थी : शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शाळा सुरू होण्यास पुन्हा महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना तालुकास्तरावर पुस्तके पोहोचविण्यात आली आहेत. तालुकास्तरावरून पुस्तके घेऊन जाण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहणार आहे.समग्र शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुदानित, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे मोफत वितरण केले जाते. शासनाकडून पाठ्यपुस्तके मिळत असल्याने पालकवर्ग पाठ्यपुस्तके खरेदी करीत नाही. पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थी शाळेमध्ये यावा, यासाठी शाळेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे पहिल्या वर्गातील विद्यार्थी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत पोहोचतो. मात्र त्याला पाठ्यपुस्तके मिळाली नाही तर त्याचा हिरमोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच तालुकास्तरावरील गट शिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत पुस्तके पोहोचविण्यात आली आहेत.जिल्हाभरात एकूण १ लाख १६ हजार ९१० लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना ६ लाख ३४ हजार ४८६ पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. जिल्हाभरात पहिल्या वर्गाचे एकूण १४ हजार ३१३, दुसऱ्या वर्गाचे १४ हजार ३७३, तिसºया वर्गाचे १४ हजार ७०३, चौथ्या वर्गाचे १४ हजार ८८९, पाचव्या वर्गाचे १४ हजार ३६६, सहाव्या वर्गाचे १४ हजार ५०८, सातव्या वर्गाचे १५ हजार २०८, आठव्या वर्गाचे १५ हजार २०८ लाभार्थी विद्यार्थी आहेत.विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांवर अन्यायसर्व शिक्षा अभियान अंतर्गत अनुदानित व विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांवर असा भेदभाव केला जातो. पाठ्यपुस्तके केवळ अनुदानित शाळांमध्ये शिकणाºया विद्यार्थ्यांना दिली जातात. मात्र विनाअनुदानित शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जात नाही. त्यामुळे विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये दुजाभाव केल्याची भावना निर्माण होते. शासन विनाअनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन देत नाही. दुसरीकडे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गणवेशापासून वंचित ठेवून त्यांची कुचंबना करते.गणवेशाचा निधी आलाच नाहीगट शिक्षणाधिकारी कार्यालयापर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचली असली तरी गणवेशाचा निधी मात्र उपलब्ध झाला नाही. गणवेश खरेदी करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, हे सुध्दा अजूनपर्यंत निश्चित झाले नाही. मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना गणवेशाचे पैसे किंवा गणवेश उपलब्ध होण्यासाठी अर्धे सत्र संपत असल्याचा अनुभव येत आहे. अजुनपर्यंत निधी न आल्याने याही वर्षी गणवेश मिळण्यास उशीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.