शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

घारगावच्या सरपंचाचा झाला आदर्श विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:38 IST

भेंडाळा : सध्या लग्नसराईचा महिना असल्याने अनेक उपवर व वधू लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी धडपड करीत आहेत. पण, काेराेनामुळे ...

भेंडाळा : सध्या लग्नसराईचा महिना असल्याने अनेक उपवर व वधू लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी धडपड करीत आहेत. पण, काेराेनामुळे शासनाने लावलेल्या अटीमुळे अनेकांनी विवाह समोर ढकलल्याचे दिसून येते. लग्न सोहळा म्हटलं की, नुसती पैशांची उधळण. आतापर्यंत अनेक लोकांनी आपआपल्या पाल्याच्या लग्नामध्ये लाखो रुपये खर्च केल्याचे दिसून येते. अशा स्थितीत घारगाव येथील सरपंच विवेक शेषराव भगत यांनी या सर्व गोष्टींना बगल देऊन वर-वधू आणि माता-पिता वगळता केवळ पाच लोकांच्या समक्ष लग्न करून समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

मागील महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला असल्याने महाराष्ट्र सरकारने कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यासंदर्भात शासनाने नवीन नियमावली बनवली आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रात निर्बंध आलेले आहेत. घारगावचे सरपंच विवेक शेषराव भगत यांचा विवाह चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील कवठी येथील कोमल एकनाथ घोटेकर यांच्याशी २२ एप्रिल रोजी आयोजित केला होता. परंतु कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन व शासनाच्या नियमांचे पालन करीत लग्न विवाहतिथी टाळत, २० एप्रिल रोजी वधूपक्षाच्या घरी जाऊन विवाह लावला.

आपण सरपंच आहोत, असं न मिरवता, कोणताही मोठा गाजावाजा व कोणतीही गर्दी न करता अगदी साध्या पध्दतीने तसेच शासनाने लावलेले सर्व नियम पाळून हा लग्नसोहळा पार पडला.

(बॉक्स)

इतर गावकरीही कित्ता गिरवणार

या गावांत समोर आणखी १४ लग्न असल्याने या नवतरुण सरपंचाने लग्न असलेल्या घरी जाऊन त्यांना सध्या सुरू असलेल्या महामारीबद्दल व शासनाच्या नियमांबद्दल विस्तृत माहिती दिली व मोजक्याच लोकांमध्ये लग्नकार्य आटोपण्याबाबत समज दिली. त्याबद्दलची नोटीसही ग्रामपंचायतीमार्फत त्यांना दिली. त्यामुळे गावातील प्रथम व्यक्ती अगदी साध्या पध्दतीने विवाह करू शकते, तर आपणही आपल्या पाल्याचे लग्न साध्या पध्दतीनेच करणार, असा निर्धार लग्न जुळलेल्या कुटुंबांतील व्यक्तीनी केला आहे.