शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

घारगावच्या सरपंचाचा झाला आदर्श विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:38 IST

भेंडाळा : सध्या लग्नसराईचा महिना असल्याने अनेक उपवर व वधू लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी धडपड करीत आहेत. पण, काेराेनामुळे ...

भेंडाळा : सध्या लग्नसराईचा महिना असल्याने अनेक उपवर व वधू लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी धडपड करीत आहेत. पण, काेराेनामुळे शासनाने लावलेल्या अटीमुळे अनेकांनी विवाह समोर ढकलल्याचे दिसून येते. लग्न सोहळा म्हटलं की, नुसती पैशांची उधळण. आतापर्यंत अनेक लोकांनी आपआपल्या पाल्याच्या लग्नामध्ये लाखो रुपये खर्च केल्याचे दिसून येते. अशा स्थितीत घारगाव येथील सरपंच विवेक शेषराव भगत यांनी या सर्व गोष्टींना बगल देऊन वर-वधू आणि माता-पिता वगळता केवळ पाच लोकांच्या समक्ष लग्न करून समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

मागील महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला असल्याने महाराष्ट्र सरकारने कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यासंदर्भात शासनाने नवीन नियमावली बनवली आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रात निर्बंध आलेले आहेत. घारगावचे सरपंच विवेक शेषराव भगत यांचा विवाह चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील कवठी येथील कोमल एकनाथ घोटेकर यांच्याशी २२ एप्रिल रोजी आयोजित केला होता. परंतु कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन व शासनाच्या नियमांचे पालन करीत लग्न विवाहतिथी टाळत, २० एप्रिल रोजी वधूपक्षाच्या घरी जाऊन विवाह लावला.

आपण सरपंच आहोत, असं न मिरवता, कोणताही मोठा गाजावाजा व कोणतीही गर्दी न करता अगदी साध्या पध्दतीने तसेच शासनाने लावलेले सर्व नियम पाळून हा लग्नसोहळा पार पडला.

(बॉक्स)

इतर गावकरीही कित्ता गिरवणार

या गावांत समोर आणखी १४ लग्न असल्याने या नवतरुण सरपंचाने लग्न असलेल्या घरी जाऊन त्यांना सध्या सुरू असलेल्या महामारीबद्दल व शासनाच्या नियमांबद्दल विस्तृत माहिती दिली व मोजक्याच लोकांमध्ये लग्नकार्य आटोपण्याबाबत समज दिली. त्याबद्दलची नोटीसही ग्रामपंचायतीमार्फत त्यांना दिली. त्यामुळे गावातील प्रथम व्यक्ती अगदी साध्या पध्दतीने विवाह करू शकते, तर आपणही आपल्या पाल्याचे लग्न साध्या पध्दतीनेच करणार, असा निर्धार लग्न जुळलेल्या कुटुंबांतील व्यक्तीनी केला आहे.