शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

घारगावच्या सरपंचाचा झाला आदर्श विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:38 IST

भेंडाळा : सध्या लग्नसराईचा महिना असल्याने अनेक उपवर व वधू लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी धडपड करीत आहेत. पण, काेराेनामुळे ...

भेंडाळा : सध्या लग्नसराईचा महिना असल्याने अनेक उपवर व वधू लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी धडपड करीत आहेत. पण, काेराेनामुळे शासनाने लावलेल्या अटीमुळे अनेकांनी विवाह समोर ढकलल्याचे दिसून येते. लग्न सोहळा म्हटलं की, नुसती पैशांची उधळण. आतापर्यंत अनेक लोकांनी आपआपल्या पाल्याच्या लग्नामध्ये लाखो रुपये खर्च केल्याचे दिसून येते. अशा स्थितीत घारगाव येथील सरपंच विवेक शेषराव भगत यांनी या सर्व गोष्टींना बगल देऊन वर-वधू आणि माता-पिता वगळता केवळ पाच लोकांच्या समक्ष लग्न करून समाजासमोर एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

मागील महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला असल्याने महाराष्ट्र सरकारने कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. यासंदर्भात शासनाने नवीन नियमावली बनवली आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रात निर्बंध आलेले आहेत. घारगावचे सरपंच विवेक शेषराव भगत यांचा विवाह चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील कवठी येथील कोमल एकनाथ घोटेकर यांच्याशी २२ एप्रिल रोजी आयोजित केला होता. परंतु कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन व शासनाच्या नियमांचे पालन करीत लग्न विवाहतिथी टाळत, २० एप्रिल रोजी वधूपक्षाच्या घरी जाऊन विवाह लावला.

आपण सरपंच आहोत, असं न मिरवता, कोणताही मोठा गाजावाजा व कोणतीही गर्दी न करता अगदी साध्या पध्दतीने तसेच शासनाने लावलेले सर्व नियम पाळून हा लग्नसोहळा पार पडला.

(बॉक्स)

इतर गावकरीही कित्ता गिरवणार

या गावांत समोर आणखी १४ लग्न असल्याने या नवतरुण सरपंचाने लग्न असलेल्या घरी जाऊन त्यांना सध्या सुरू असलेल्या महामारीबद्दल व शासनाच्या नियमांबद्दल विस्तृत माहिती दिली व मोजक्याच लोकांमध्ये लग्नकार्य आटोपण्याबाबत समज दिली. त्याबद्दलची नोटीसही ग्रामपंचायतीमार्फत त्यांना दिली. त्यामुळे गावातील प्रथम व्यक्ती अगदी साध्या पध्दतीने विवाह करू शकते, तर आपणही आपल्या पाल्याचे लग्न साध्या पध्दतीनेच करणार, असा निर्धार लग्न जुळलेल्या कुटुंबांतील व्यक्तीनी केला आहे.