शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
3
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
4
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
5
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
6
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
7
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
8
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
9
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
10
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
11
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
12
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
13
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
14
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
16
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
17
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
18
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
19
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
20
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले

५ कोटींची संजीवनी

By admin | Updated: August 6, 2014 23:50 IST

वीज बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांना ५० टक्के सुट देणारी कृषी संजीवनी योजना राज्यशासनाने सुरू केली असून या योजनेचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील १३ हजार २६८ कृषीपंप धारकांना होणार आहे.

कृषी संजीवनी योजना : ८ कोटी ६५ लाख थकीतगडचिरोली : वीज बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांना ५० टक्के सुट देणारी कृषी संजीवनी योजना राज्यशासनाने सुरू केली असून या योजनेचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील १३ हजार २६८ कृषीपंप धारकांना होणार आहे. यातून जवळपास ५ कोटी रूपयाची रक्कम माफ केली जाणार आहे. दरवर्षी पडणार ओला किंवा कोरडा दुष्काळ, खर्चाच्या तुलनेत उत्पादन कमी झाल्याने शेतकरी नेहमीच अडचणीत येतात. उत्पन्नच न झाल्याने मागील अनेक वर्षापासून कृषीपंपाचे वीजबिल राज्यातील लाखो शेतकऱ्यांकडे थकीत आहे. वीजबिल न भरल्याने महावितरण कंपनीने सदर शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी राज्य शासनाने कृषी संजीवनी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या मुद्दलापैकी ५० टक्के रक्कम शेतकऱ्याने भरल्यास उर्वरित ५० टक्के मुद्दल राज्यसरकार भरणार आहे. दंड व व्याजाची रक्कमसुध्दा माफ केली जाणार आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्याला त्याच्याकडे थकीत असलेल्या रकमेपैकी २० टक्के रक्कम ३१ आॅगस्टपूर्वी, २० टक्के रक्कम ३० सप्टेंबरपूर्वी व उर्वरित १० टक्के रक्कम ३१ आॅक्टोंबरपूर्वी भरायची आहे. थकबाकी भरल्यानंतर तसेच १ एप्रिल २०१४ नंतरचे बिल नियमितपणे भरले असेल तर थकबाकीची ५० टक्के रक्कम शासन भरणार आहे. व्याज व दंडसुध्दा माफ करणार आहे. नियमितपणे वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचे पुढील ६ महिन्याचे बिल शासन भरणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकुण १८ हजार १०७ कृषीपंपधारक शेतकरी आहेत. यापैकी १३ हजार २६८ शेतकऱ्यांकडे ८ कोटी ६५ लाख रूपयांची थकबाकी आहे. या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला तर त्यांना ४ कोटी ३२ लाख ५० हजाराची सवलत मिळणार आहे. ४ हजार ८३९ शेतकरी वीजबिलांचा भरणा नियमितपणे करीत आहे. त्यांचे ६ महिन्यांचे वीजबिल माफ केले जाणार आहे. असे एकुण जवळपास ५ कोटींचे वीजबिल माफ होणार आहे. (नगर प्रतिनिधी)