शहरं
Join us  
Trending Stories
1
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
4
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
5
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
6
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
7
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
8
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
9
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
10
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
11
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
12
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
13
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
14
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
15
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
16
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
17
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
18
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
19
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
20
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
Daily Top 2Weekly Top 5

५ कोटींची संजीवनी

By admin | Updated: August 6, 2014 23:50 IST

वीज बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांना ५० टक्के सुट देणारी कृषी संजीवनी योजना राज्यशासनाने सुरू केली असून या योजनेचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील १३ हजार २६८ कृषीपंप धारकांना होणार आहे.

कृषी संजीवनी योजना : ८ कोटी ६५ लाख थकीतगडचिरोली : वीज बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांना ५० टक्के सुट देणारी कृषी संजीवनी योजना राज्यशासनाने सुरू केली असून या योजनेचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील १३ हजार २६८ कृषीपंप धारकांना होणार आहे. यातून जवळपास ५ कोटी रूपयाची रक्कम माफ केली जाणार आहे. दरवर्षी पडणार ओला किंवा कोरडा दुष्काळ, खर्चाच्या तुलनेत उत्पादन कमी झाल्याने शेतकरी नेहमीच अडचणीत येतात. उत्पन्नच न झाल्याने मागील अनेक वर्षापासून कृषीपंपाचे वीजबिल राज्यातील लाखो शेतकऱ्यांकडे थकीत आहे. वीजबिल न भरल्याने महावितरण कंपनीने सदर शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी राज्य शासनाने कृषी संजीवनी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या मुद्दलापैकी ५० टक्के रक्कम शेतकऱ्याने भरल्यास उर्वरित ५० टक्के मुद्दल राज्यसरकार भरणार आहे. दंड व व्याजाची रक्कमसुध्दा माफ केली जाणार आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्याला त्याच्याकडे थकीत असलेल्या रकमेपैकी २० टक्के रक्कम ३१ आॅगस्टपूर्वी, २० टक्के रक्कम ३० सप्टेंबरपूर्वी व उर्वरित १० टक्के रक्कम ३१ आॅक्टोंबरपूर्वी भरायची आहे. थकबाकी भरल्यानंतर तसेच १ एप्रिल २०१४ नंतरचे बिल नियमितपणे भरले असेल तर थकबाकीची ५० टक्के रक्कम शासन भरणार आहे. व्याज व दंडसुध्दा माफ करणार आहे. नियमितपणे वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचे पुढील ६ महिन्याचे बिल शासन भरणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकुण १८ हजार १०७ कृषीपंपधारक शेतकरी आहेत. यापैकी १३ हजार २६८ शेतकऱ्यांकडे ८ कोटी ६५ लाख रूपयांची थकबाकी आहे. या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला तर त्यांना ४ कोटी ३२ लाख ५० हजाराची सवलत मिळणार आहे. ४ हजार ८३९ शेतकरी वीजबिलांचा भरणा नियमितपणे करीत आहे. त्यांचे ६ महिन्यांचे वीजबिल माफ केले जाणार आहे. असे एकुण जवळपास ५ कोटींचे वीजबिल माफ होणार आहे. (नगर प्रतिनिधी)