शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

५ कोटींची संजीवनी

By admin | Updated: August 6, 2014 23:50 IST

वीज बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांना ५० टक्के सुट देणारी कृषी संजीवनी योजना राज्यशासनाने सुरू केली असून या योजनेचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील १३ हजार २६८ कृषीपंप धारकांना होणार आहे.

कृषी संजीवनी योजना : ८ कोटी ६५ लाख थकीतगडचिरोली : वीज बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांना ५० टक्के सुट देणारी कृषी संजीवनी योजना राज्यशासनाने सुरू केली असून या योजनेचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील १३ हजार २६८ कृषीपंप धारकांना होणार आहे. यातून जवळपास ५ कोटी रूपयाची रक्कम माफ केली जाणार आहे. दरवर्षी पडणार ओला किंवा कोरडा दुष्काळ, खर्चाच्या तुलनेत उत्पादन कमी झाल्याने शेतकरी नेहमीच अडचणीत येतात. उत्पन्नच न झाल्याने मागील अनेक वर्षापासून कृषीपंपाचे वीजबिल राज्यातील लाखो शेतकऱ्यांकडे थकीत आहे. वीजबिल न भरल्याने महावितरण कंपनीने सदर शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी राज्य शासनाने कृषी संजीवनी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत वीजबिलाच्या मुद्दलापैकी ५० टक्के रक्कम शेतकऱ्याने भरल्यास उर्वरित ५० टक्के मुद्दल राज्यसरकार भरणार आहे. दंड व व्याजाची रक्कमसुध्दा माफ केली जाणार आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्याला त्याच्याकडे थकीत असलेल्या रकमेपैकी २० टक्के रक्कम ३१ आॅगस्टपूर्वी, २० टक्के रक्कम ३० सप्टेंबरपूर्वी व उर्वरित १० टक्के रक्कम ३१ आॅक्टोंबरपूर्वी भरायची आहे. थकबाकी भरल्यानंतर तसेच १ एप्रिल २०१४ नंतरचे बिल नियमितपणे भरले असेल तर थकबाकीची ५० टक्के रक्कम शासन भरणार आहे. व्याज व दंडसुध्दा माफ करणार आहे. नियमितपणे वीजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांचे पुढील ६ महिन्याचे बिल शासन भरणार आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकुण १८ हजार १०७ कृषीपंपधारक शेतकरी आहेत. यापैकी १३ हजार २६८ शेतकऱ्यांकडे ८ कोटी ६५ लाख रूपयांची थकबाकी आहे. या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला तर त्यांना ४ कोटी ३२ लाख ५० हजाराची सवलत मिळणार आहे. ४ हजार ८३९ शेतकरी वीजबिलांचा भरणा नियमितपणे करीत आहे. त्यांचे ६ महिन्यांचे वीजबिल माफ केले जाणार आहे. असे एकुण जवळपास ५ कोटींचे वीजबिल माफ होणार आहे. (नगर प्रतिनिधी)