शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

नाक्याअभावी सागवानाची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 06:00 IST

वैनगंगा नदी गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याची दुभाजक आहे. या नदीवर अनेक पूल बांधण्यात आले आहेत. चामोर्शी तालुक्यातील जयरामपूरच्या परिसरातील नागरिकांना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी हे तालुकास्थळ जवळ व सोयीचे ठरत होते. मात्र पूल नसल्याने शेतकरी, सामान्य नागरिक यांची अडचण होत होती. डोंग्याने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे वैनगंगा नदीवर पूल बांधावा, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत होती.

ठळक मुद्देकापसातून लाकडांची वाहतूक : वैनगंगेवरील मुधोली गावाजवळील पूल

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : चामोर्शी तालुक्यातील मुधोलीजवळ वैनगंगा नदीवर राज्य शासनाने पूल बांधले आहे. या पुलावर वनविभागाचा नाका नसल्याने मोठ्या प्रमाणात सागवानी लाकडांची तस्करी गोंडपिपरी, बल्लारशाहकडे होत आहे. या ठिकाणी वनविभागाचा तपासणी नाका असणे आवश्यक आहे.वैनगंगा नदी गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याची दुभाजक आहे. या नदीवर अनेक पूल बांधण्यात आले आहेत. चामोर्शी तालुक्यातील जयरामपूरच्या परिसरातील नागरिकांना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी हे तालुकास्थळ जवळ व सोयीचे ठरत होते. मात्र पूल नसल्याने शेतकरी, सामान्य नागरिक यांची अडचण होत होती. डोंग्याने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे वैनगंगा नदीवर पूल बांधावा, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत होती. राज्य शासनाने याकडे लक्ष देऊन वैनगंगा नदीवर जयरामपूर परिसरात पुलाला मंजुरी दिली. तीन वर्षात पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. सदर पूल चंद्रपूूर जिल्ह्यातील घाटकूळ या गावाला जोडते. पुढे या मार्गाने गोंडपिपरीकडे जाता येते. या पुलाने परिसरातील नागरिकांसाठी प्रगतीची दारे खुली केली आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील सागवान मौल्यवान असल्याने या सागवानाला राष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. आष्टीजवळील पुलावरूनही गोंडपिपरीकडे जाता येते. मात्र या पुलावर वनविभागाचा नाका असल्याने सागवान तस्करी करणाऱ्यांवर वचक आहे. त्यामुळे तस्करांनी मुधोली पुलाचा उपयोग करण्यास सुरूवात केली आहे. वाहनांना अटकाव होत नसल्याने वाहनातून सागवानाची तस्करी होत आहे. काही तस्कर कापसाच्या खाली सागवानी लठ्ठे टाकून तस्करी करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या ठिकाणी वनविभागाचा नाका उभारण्याची मागणी होत आहे.पुलाने उघडली प्रगतीची दारेजयरामपूर परिसरात अनेक गावे आहेत. सदर गावे वैनगंगा नदीच्या काठावर वसली आहेत. येथील जमीन अतिशय सुपीक आहे. या परिसरातील शेतकरी मिरची, भाजीपाला, कापूस, धान आदी पिकांचे उत्पादन घेतात. मात्र या शेतकऱ्यांना गावापासून २५ किमी अंतरावर असलेल्या चामोर्शीशिवाय पर्याय नव्हता. १० किमी अंतरावर गोंडपिपरी हे तालुकास्थळ आहे. गोंडपिपरी येथे कापूस, भाजीपाला, मिरचीची मोठी बाजारपेठ आहे. मात्र नदीवर पूल नसल्याने येथील शेतकºयांसमोर पर्याय नव्हता. शासनाने पूल बांधल्यानंतर आता या परिसरातील शेतकºयांसाठी प्रगतीची दारे खुली आहेत. येथील बहुतांश शेतमाल गोंडपिपरी, बल्लारशाह येथील बाजारपेठेत नेला जात आहे. त्यामुळे चांगला भाव शेतमालाला मिळत आहे.

टॅग्स :Smugglingतस्करी