शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

नाक्याअभावी सागवानाची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 06:00 IST

वैनगंगा नदी गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याची दुभाजक आहे. या नदीवर अनेक पूल बांधण्यात आले आहेत. चामोर्शी तालुक्यातील जयरामपूरच्या परिसरातील नागरिकांना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी हे तालुकास्थळ जवळ व सोयीचे ठरत होते. मात्र पूल नसल्याने शेतकरी, सामान्य नागरिक यांची अडचण होत होती. डोंग्याने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे वैनगंगा नदीवर पूल बांधावा, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत होती.

ठळक मुद्देकापसातून लाकडांची वाहतूक : वैनगंगेवरील मुधोली गावाजवळील पूल

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : चामोर्शी तालुक्यातील मुधोलीजवळ वैनगंगा नदीवर राज्य शासनाने पूल बांधले आहे. या पुलावर वनविभागाचा नाका नसल्याने मोठ्या प्रमाणात सागवानी लाकडांची तस्करी गोंडपिपरी, बल्लारशाहकडे होत आहे. या ठिकाणी वनविभागाचा तपासणी नाका असणे आवश्यक आहे.वैनगंगा नदी गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याची दुभाजक आहे. या नदीवर अनेक पूल बांधण्यात आले आहेत. चामोर्शी तालुक्यातील जयरामपूरच्या परिसरातील नागरिकांना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी हे तालुकास्थळ जवळ व सोयीचे ठरत होते. मात्र पूल नसल्याने शेतकरी, सामान्य नागरिक यांची अडचण होत होती. डोंग्याने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे वैनगंगा नदीवर पूल बांधावा, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत होती. राज्य शासनाने याकडे लक्ष देऊन वैनगंगा नदीवर जयरामपूर परिसरात पुलाला मंजुरी दिली. तीन वर्षात पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. सदर पूल चंद्रपूूर जिल्ह्यातील घाटकूळ या गावाला जोडते. पुढे या मार्गाने गोंडपिपरीकडे जाता येते. या पुलाने परिसरातील नागरिकांसाठी प्रगतीची दारे खुली केली आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील सागवान मौल्यवान असल्याने या सागवानाला राष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. आष्टीजवळील पुलावरूनही गोंडपिपरीकडे जाता येते. मात्र या पुलावर वनविभागाचा नाका असल्याने सागवान तस्करी करणाऱ्यांवर वचक आहे. त्यामुळे तस्करांनी मुधोली पुलाचा उपयोग करण्यास सुरूवात केली आहे. वाहनांना अटकाव होत नसल्याने वाहनातून सागवानाची तस्करी होत आहे. काही तस्कर कापसाच्या खाली सागवानी लठ्ठे टाकून तस्करी करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या ठिकाणी वनविभागाचा नाका उभारण्याची मागणी होत आहे.पुलाने उघडली प्रगतीची दारेजयरामपूर परिसरात अनेक गावे आहेत. सदर गावे वैनगंगा नदीच्या काठावर वसली आहेत. येथील जमीन अतिशय सुपीक आहे. या परिसरातील शेतकरी मिरची, भाजीपाला, कापूस, धान आदी पिकांचे उत्पादन घेतात. मात्र या शेतकऱ्यांना गावापासून २५ किमी अंतरावर असलेल्या चामोर्शीशिवाय पर्याय नव्हता. १० किमी अंतरावर गोंडपिपरी हे तालुकास्थळ आहे. गोंडपिपरी येथे कापूस, भाजीपाला, मिरचीची मोठी बाजारपेठ आहे. मात्र नदीवर पूल नसल्याने येथील शेतकºयांसमोर पर्याय नव्हता. शासनाने पूल बांधल्यानंतर आता या परिसरातील शेतकºयांसाठी प्रगतीची दारे खुली आहेत. येथील बहुतांश शेतमाल गोंडपिपरी, बल्लारशाह येथील बाजारपेठेत नेला जात आहे. त्यामुळे चांगला भाव शेतमालाला मिळत आहे.

टॅग्स :Smugglingतस्करी