शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
2
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
3
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
4
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
5
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
6
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
7
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
8
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
9
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
10
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
11
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
12
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
13
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
14
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...
15
"पाय खूप सुजतात, नीट जेवणही नशिबात नसतं"; केदारनाथच्या पिठ्ठूची डोळे पाणावणारी गोष्ट
16
Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर
17
१०० वर्षांनी अद्भूत योग: ८ राशींना लॉटरी, सुख-सोयींचा काळ; पद-पैसा वृद्धी, शेअर बाजारात नफा!
18
'या' ५८ देशांत भारतीयांना व्हिसा फ्री प्रवेश! विमान पकडा आणि थेट परदेशात उतरा, यादीत अनेक सुंदर देश
19
नाशिक बोगस शालार्थ आयडी प्रकरण : 'त्या' शिक्षक, अधिकाऱ्यांची झाडाझडती
20
हार्दिक पांड्या IPL मध्ये खेळतोय, दुसरीकडे त्याची Ex पत्नी नताशा काय करतेय? Photo Viral

नाक्याअभावी सागवानाची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 06:00 IST

वैनगंगा नदी गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याची दुभाजक आहे. या नदीवर अनेक पूल बांधण्यात आले आहेत. चामोर्शी तालुक्यातील जयरामपूरच्या परिसरातील नागरिकांना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी हे तालुकास्थळ जवळ व सोयीचे ठरत होते. मात्र पूल नसल्याने शेतकरी, सामान्य नागरिक यांची अडचण होत होती. डोंग्याने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे वैनगंगा नदीवर पूल बांधावा, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत होती.

ठळक मुद्देकापसातून लाकडांची वाहतूक : वैनगंगेवरील मुधोली गावाजवळील पूल

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : चामोर्शी तालुक्यातील मुधोलीजवळ वैनगंगा नदीवर राज्य शासनाने पूल बांधले आहे. या पुलावर वनविभागाचा नाका नसल्याने मोठ्या प्रमाणात सागवानी लाकडांची तस्करी गोंडपिपरी, बल्लारशाहकडे होत आहे. या ठिकाणी वनविभागाचा तपासणी नाका असणे आवश्यक आहे.वैनगंगा नदी गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याची दुभाजक आहे. या नदीवर अनेक पूल बांधण्यात आले आहेत. चामोर्शी तालुक्यातील जयरामपूरच्या परिसरातील नागरिकांना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी हे तालुकास्थळ जवळ व सोयीचे ठरत होते. मात्र पूल नसल्याने शेतकरी, सामान्य नागरिक यांची अडचण होत होती. डोंग्याने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे वैनगंगा नदीवर पूल बांधावा, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत होती. राज्य शासनाने याकडे लक्ष देऊन वैनगंगा नदीवर जयरामपूर परिसरात पुलाला मंजुरी दिली. तीन वर्षात पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. सदर पूल चंद्रपूूर जिल्ह्यातील घाटकूळ या गावाला जोडते. पुढे या मार्गाने गोंडपिपरीकडे जाता येते. या पुलाने परिसरातील नागरिकांसाठी प्रगतीची दारे खुली केली आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील सागवान मौल्यवान असल्याने या सागवानाला राष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. आष्टीजवळील पुलावरूनही गोंडपिपरीकडे जाता येते. मात्र या पुलावर वनविभागाचा नाका असल्याने सागवान तस्करी करणाऱ्यांवर वचक आहे. त्यामुळे तस्करांनी मुधोली पुलाचा उपयोग करण्यास सुरूवात केली आहे. वाहनांना अटकाव होत नसल्याने वाहनातून सागवानाची तस्करी होत आहे. काही तस्कर कापसाच्या खाली सागवानी लठ्ठे टाकून तस्करी करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या ठिकाणी वनविभागाचा नाका उभारण्याची मागणी होत आहे.पुलाने उघडली प्रगतीची दारेजयरामपूर परिसरात अनेक गावे आहेत. सदर गावे वैनगंगा नदीच्या काठावर वसली आहेत. येथील जमीन अतिशय सुपीक आहे. या परिसरातील शेतकरी मिरची, भाजीपाला, कापूस, धान आदी पिकांचे उत्पादन घेतात. मात्र या शेतकऱ्यांना गावापासून २५ किमी अंतरावर असलेल्या चामोर्शीशिवाय पर्याय नव्हता. १० किमी अंतरावर गोंडपिपरी हे तालुकास्थळ आहे. गोंडपिपरी येथे कापूस, भाजीपाला, मिरचीची मोठी बाजारपेठ आहे. मात्र नदीवर पूल नसल्याने येथील शेतकºयांसमोर पर्याय नव्हता. शासनाने पूल बांधल्यानंतर आता या परिसरातील शेतकºयांसाठी प्रगतीची दारे खुली आहेत. येथील बहुतांश शेतमाल गोंडपिपरी, बल्लारशाह येथील बाजारपेठेत नेला जात आहे. त्यामुळे चांगला भाव शेतमालाला मिळत आहे.

टॅग्स :Smugglingतस्करी