शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

साेमनपल्ली पुलामुळे १८ गावांचा संपर्क जुळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 05:00 IST

साेमनपल्ली गावाजवळील पुलाचे बांधकाम न झाल्याने दरवर्षी पावसाळ्यात नाल्याला इंद्रावती नदीचे पुराचे पाणी येत हाेते. त्यामुळे नाल्यात पुराचे पाणी भरून असायचे. परिसरातील १८ गावांचा संपर्क तुटायचा. त्यामुळे येथे उंच पुलाचे बांधकाम करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत हाेती. मागील वर्षी नागरिकांच्या मागणीची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाद्वारे पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देबांधकाम प्रगतिपथावर : पावसाळ्यातील अवराेध संपुष्टात येणार

कौसर खानलाेकमत न्यूज नेटवर्कसिराेंचा : महाराष्ट्र, तेलंगणा व छत्तीसगड या तीन राज्यांना जाेडणाऱ्या निजामाबाद-जगदलपूरचे काम पूर्ण झाले आहे. तसेच इंद्रावती व प्राणहिता नदीवर दाेन माेठ्या पुलाचे बांधकाम झाले; परंतु साेमनपल्ली गावाजवळील पुलाचे बांधकाम न झाल्याने दरवर्षी पावसाळ्यात १८ गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटत हाेता; परंतु आता येथील पुलाचे काम प्रगतिपथावर असल्याने पावसाळ्यातील अवराेध संपुष्टात येणार आहे. साेमनपल्ली गावाजवळील पुलाचे बांधकाम न झाल्याने दरवर्षी पावसाळ्यात नाल्याला इंद्रावती नदीचे पुराचे पाणी येत हाेते. त्यामुळे नाल्यात पुराचे पाणी भरून असायचे. परिसरातील १८ गावांचा संपर्क तुटायचा. त्यामुळे येथे उंच पुलाचे बांधकाम करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत हाेती. मागील वर्षी नागरिकांच्या मागणीची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाद्वारे पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. जवळपास १६ काेटी रुपयांचा खर्च पूल बांधकामावर केला जात आहे. काही महिन्यांतच हे बांधकाम पूर्ण हाेणार आहे. या पावसाळ्यात बांधकाम पूर्णत्वास येण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे पुलाअभावी दरवर्षी पावसाळ्यात परिसरातील नागरिक नावेद्वारे नाला पार करीत हाेते. मागील वर्षी तेलंगणातील एका व्यापाऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला हाेता. त्यानंतरही नागरिकांनी येथे पुलाचे बांधकाम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केली हाेती. ती मागणी आता पूर्णत्वास जात आहे.

छत्तीसगड राज्याशीही तुटत हाेता संपर्कसिराेंचा तालुक्यातील १८ गावांसह छत्तीसगड राज्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रहदारी सदर नाल्याला आलेल्या पुरामुळे बंद व्हायची. त्यामुळे नागरिकांनी अनेकदा साेमनपल्ली नाल्यावर पुलाचे बांधकाम करण्याची मागणी केली. येथील पुलाचे बांधकाम पूर्णत्वास येत असल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ निजामाबाद ते जगदलपूर राष्ट्रीय महामार्गाला अवराेध ठरणारा प्रश्न निकाली निघणार आहे.

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक