शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

५० वर्षांपूर्वी रस्त्याची निर्मिती, परंतु साधे खडीकरणही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:39 IST

सिराेंचा : तालुका मुख्यालयापासून अर्धा किमी अंतरावर असलेल्या व सिराेंचा-आलापल्ली महामार्गाला जाेडणाऱ्या काेत्तागुडम-तमदाला मार्गाची निर्मिती १९७२ मध्ये तत्कालीन आमदारांच्या ...

सिराेंचा : तालुका मुख्यालयापासून अर्धा किमी अंतरावर असलेल्या व सिराेंचा-आलापल्ली महामार्गाला जाेडणाऱ्या काेत्तागुडम-तमदाला मार्गाची निर्मिती १९७२ मध्ये तत्कालीन आमदारांच्या पुढाकाराने करण्यात आली. जवळपास ५० वर्षांचा कालावधी आजपर्यंत उलटला परंतु या रस्त्यावर साधे खडीकरणही झाले नाही. हा रस्ता कायम उपेक्षितच राहिला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात चिखल तुडवतच ये-जा करावी लागते.

परिसरातील नागरिकांच्या साेयीसाठी तत्कालीन आमदार मुकुंदराव विठाेबाजी अलाेने यांच्या पुढाकाराने १९७२ मध्ये काेत्तागुडम-तमदाला ह्या दीड ते दाेन किती रस्त्याची निर्मिती झाली. तमदाला, मेडाराम, कारसपल्ली व सिराेंचातील शेतकऱ्यांना ह्या रस्त्यामुळे साेयीचे झाले. त्यामुळे वर्षभर शेतकरी व परिसराच्या गावातील नागरिक याच मार्गाने ये-जा करीत हाेते. परंतु पावसाळ्यात रस्त्यावर जागाेजागी चिखल असताे. त्यामुळे रहदारीस अडचणी येतात. परिसरातील नागरिकांनी रस्त्याचे पक्के बांधकाम करण्याबाबत स्थानिक प्रशासनामार्फत पाठपुरावा केला हाेता, परंतु काहीच उपयाेग झाला नाही. विशेष म्हणजे १९७२मध्ये सिराेंचा निर्वाचन क्षेत्रातून काॅंग्रेसचे मुकुंदराव अलाेणे यांनी जमनादास खाेब्रागडे यांचा पराभव केला हाेता. तेव्हा त्यांनी सिराेंचा येथे अनेक विकासकामे केली. यात सदर रस्त्याच्या बांधकामाचा सुद्धा समावेश हाेता. परिसरातील नागरिक या रस्त्याला माजी आमदारांच्या नावावरून मुकुंदराव रस्ता म्हणूनसुद्धा ओळखतात. गेल्या अनेक वर्षांपासून सदर रस्त्याच्या बांधकामाची मागणी शेतकरी व परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

बाॅक्स

पक्के बांधकाम झाल्यास बारमाही रहदारी

मुकुंदराव मार्गाचे पक्के बांधकाम न झाल्याने नागरिकांना कारसपल्ली मार्गाने जावे लागते, परंतु कारसपल्ली मार्गावर नाला असल्याने पावसाळ्यात हा मार्ग अनेकदा बंद राहताे. त्यामुळे तमदाला (मुकुंदराव) मार्गाचे पक्के बांधकाम झाल्यास परिसरातील नागरिकांची साेय हाेईल. नागरिकांना कारसपल्ली मार्गाने जाण्याची आवश्यकता भासणार नाही. शिवाय नागरिकांच्या वेळेची बचत हाेईल. वर्षभर नागरिकांना ह्या रस्त्याने ये-जा करता येईल. त्यामुळे रस्त्याचे पक्के बांधकाम करावे, अशी मागणी हाेत आहे.