शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

५० वर्षांपूर्वी रस्त्याची निर्मिती, परंतु साधे खडीकरणही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:39 IST

सिराेंचा : तालुका मुख्यालयापासून अर्धा किमी अंतरावर असलेल्या व सिराेंचा-आलापल्ली महामार्गाला जाेडणाऱ्या काेत्तागुडम-तमदाला मार्गाची निर्मिती १९७२ मध्ये तत्कालीन आमदारांच्या ...

सिराेंचा : तालुका मुख्यालयापासून अर्धा किमी अंतरावर असलेल्या व सिराेंचा-आलापल्ली महामार्गाला जाेडणाऱ्या काेत्तागुडम-तमदाला मार्गाची निर्मिती १९७२ मध्ये तत्कालीन आमदारांच्या पुढाकाराने करण्यात आली. जवळपास ५० वर्षांचा कालावधी आजपर्यंत उलटला परंतु या रस्त्यावर साधे खडीकरणही झाले नाही. हा रस्ता कायम उपेक्षितच राहिला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात चिखल तुडवतच ये-जा करावी लागते.

परिसरातील नागरिकांच्या साेयीसाठी तत्कालीन आमदार मुकुंदराव विठाेबाजी अलाेने यांच्या पुढाकाराने १९७२ मध्ये काेत्तागुडम-तमदाला ह्या दीड ते दाेन किती रस्त्याची निर्मिती झाली. तमदाला, मेडाराम, कारसपल्ली व सिराेंचातील शेतकऱ्यांना ह्या रस्त्यामुळे साेयीचे झाले. त्यामुळे वर्षभर शेतकरी व परिसराच्या गावातील नागरिक याच मार्गाने ये-जा करीत हाेते. परंतु पावसाळ्यात रस्त्यावर जागाेजागी चिखल असताे. त्यामुळे रहदारीस अडचणी येतात. परिसरातील नागरिकांनी रस्त्याचे पक्के बांधकाम करण्याबाबत स्थानिक प्रशासनामार्फत पाठपुरावा केला हाेता, परंतु काहीच उपयाेग झाला नाही. विशेष म्हणजे १९७२मध्ये सिराेंचा निर्वाचन क्षेत्रातून काॅंग्रेसचे मुकुंदराव अलाेणे यांनी जमनादास खाेब्रागडे यांचा पराभव केला हाेता. तेव्हा त्यांनी सिराेंचा येथे अनेक विकासकामे केली. यात सदर रस्त्याच्या बांधकामाचा सुद्धा समावेश हाेता. परिसरातील नागरिक या रस्त्याला माजी आमदारांच्या नावावरून मुकुंदराव रस्ता म्हणूनसुद्धा ओळखतात. गेल्या अनेक वर्षांपासून सदर रस्त्याच्या बांधकामाची मागणी शेतकरी व परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

बाॅक्स

पक्के बांधकाम झाल्यास बारमाही रहदारी

मुकुंदराव मार्गाचे पक्के बांधकाम न झाल्याने नागरिकांना कारसपल्ली मार्गाने जावे लागते, परंतु कारसपल्ली मार्गावर नाला असल्याने पावसाळ्यात हा मार्ग अनेकदा बंद राहताे. त्यामुळे तमदाला (मुकुंदराव) मार्गाचे पक्के बांधकाम झाल्यास परिसरातील नागरिकांची साेय हाेईल. नागरिकांना कारसपल्ली मार्गाने जाण्याची आवश्यकता भासणार नाही. शिवाय नागरिकांच्या वेळेची बचत हाेईल. वर्षभर नागरिकांना ह्या रस्त्याने ये-जा करता येईल. त्यामुळे रस्त्याचे पक्के बांधकाम करावे, अशी मागणी हाेत आहे.