शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

रेगडी कालव्याची दुर्दशा

By admin | Updated: August 19, 2014 23:43 IST

चामोर्शी तालुक्यातील रेगडी तलावाच्या कालव्याची माती खचली आहे. मात्र याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. कालवा खचला असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे सदर कालव्याची

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील रेगडी तलावाच्या कालव्याची माती खचली आहे. मात्र याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. कालवा खचला असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे सदर कालव्याची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. रेगडी येथील कन्नमवार जलाशय हा गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव मोठा जलसिंचन प्रकल्प आहे. या तलावाच्या माध्यमातून चामोर्शी तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनीला पाण्याचा पुरवठा केला जातो. जिल्हा निर्मिती होण्यापूर्वीच सदर तलाव बांधण्यात आला. सदर तलाव दिनानदीवर बांधण्यात आला आहे. त्यामुळे या तलावाला दिना प्रकल्प असेही संबोधण्यात येते. दिना नदी जंगलातून येत असल्याने या नदीच्या पाण्याच्या सहाय्याने सदर तलाव तत्काळ भरतो. तलावाजवळून पाण्याचा वेग जास्त राहत असल्याने कालवा क्षतिग्रस्त होण्याचे प्रमाण सर्वात जास्त राहते. त्यामुळे तलावाची निर्मिती झाल्यानंतर कालव्याच्या आतील बाजूने दगडाची पिचिंग करण्यात आली होती. मात्र काळाच्या ओघात सदर पिचिंग कोसळली आहे. त्यामुळे कालव्याच्या बाजूची माती विरघडून दरड कोसळल्या आहेत. अगदी तलावाच्या जवळ पाण्याचा वेग अधिक राहत असल्याने दरवर्षी दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत चालेले आहे. परिणामी कालव्याला मोठ- मोठे भगदाड पडले आहेत. या भगदाडांमुळे पाण्याचा अपव्ययही होत आहे. मात्र पाटबंधारे विभागाचे याकडे मागील अनेक वर्षापासून दुर्लक्ष झाले आहे. हीच स्थिती उपकालव्यांचीही झाली आहे. दरवर्षी कालवे फुटण्यांमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. वेळेवरच कालवा दुरूस्त करावा लागल्यामुळे अधिकची रक्कमही पाटबंधारे विभागाला मोजावी लागते. तेवढे दिवस शेताला पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागतो. कालवा फुटल्यानंतर शेतातील पिकांचेही नुकसान होते. याबाबी दरवर्षीच घडतात. यापासून पाटबंधारे विभागामात्र कोणतेही शहाणपण शिकण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे, ज्या शेतीला या तलावाच्या पाण्याच्या सहाय्याने सिंचन केले जाते. अशा शेतकऱ्यांकडून एकरी पाणसारा वसूल केला जातो. पाणसाऱ्याच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रूपयांचा महसूल पाटबंधारे विभागाकडे गोळा होतो. यातून कालव्याची डागडूजी करणे सहज शक्य आहे. मात्र याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरीही चिंंतेत पडले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे तत्काळ लक्ष देऊन कालवा दुरूस्तीची मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)