शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

रेगडी कालव्याची दुर्दशा

By admin | Updated: August 19, 2014 23:43 IST

चामोर्शी तालुक्यातील रेगडी तलावाच्या कालव्याची माती खचली आहे. मात्र याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. कालवा खचला असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे सदर कालव्याची

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील रेगडी तलावाच्या कालव्याची माती खचली आहे. मात्र याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. कालवा खचला असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे सदर कालव्याची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. रेगडी येथील कन्नमवार जलाशय हा गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव मोठा जलसिंचन प्रकल्प आहे. या तलावाच्या माध्यमातून चामोर्शी तालुक्यातील हजारो हेक्टर जमिनीला पाण्याचा पुरवठा केला जातो. जिल्हा निर्मिती होण्यापूर्वीच सदर तलाव बांधण्यात आला. सदर तलाव दिनानदीवर बांधण्यात आला आहे. त्यामुळे या तलावाला दिना प्रकल्प असेही संबोधण्यात येते. दिना नदी जंगलातून येत असल्याने या नदीच्या पाण्याच्या सहाय्याने सदर तलाव तत्काळ भरतो. तलावाजवळून पाण्याचा वेग जास्त राहत असल्याने कालवा क्षतिग्रस्त होण्याचे प्रमाण सर्वात जास्त राहते. त्यामुळे तलावाची निर्मिती झाल्यानंतर कालव्याच्या आतील बाजूने दगडाची पिचिंग करण्यात आली होती. मात्र काळाच्या ओघात सदर पिचिंग कोसळली आहे. त्यामुळे कालव्याच्या बाजूची माती विरघडून दरड कोसळल्या आहेत. अगदी तलावाच्या जवळ पाण्याचा वेग अधिक राहत असल्याने दरवर्षी दरड कोसळण्याचे प्रमाण वाढत चालेले आहे. परिणामी कालव्याला मोठ- मोठे भगदाड पडले आहेत. या भगदाडांमुळे पाण्याचा अपव्ययही होत आहे. मात्र पाटबंधारे विभागाचे याकडे मागील अनेक वर्षापासून दुर्लक्ष झाले आहे. हीच स्थिती उपकालव्यांचीही झाली आहे. दरवर्षी कालवे फुटण्यांमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतो. वेळेवरच कालवा दुरूस्त करावा लागल्यामुळे अधिकची रक्कमही पाटबंधारे विभागाला मोजावी लागते. तेवढे दिवस शेताला पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागतो. कालवा फुटल्यानंतर शेतातील पिकांचेही नुकसान होते. याबाबी दरवर्षीच घडतात. यापासून पाटबंधारे विभागामात्र कोणतेही शहाणपण शिकण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे, ज्या शेतीला या तलावाच्या पाण्याच्या सहाय्याने सिंचन केले जाते. अशा शेतकऱ्यांकडून एकरी पाणसारा वसूल केला जातो. पाणसाऱ्याच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रूपयांचा महसूल पाटबंधारे विभागाकडे गोळा होतो. यातून कालव्याची डागडूजी करणे सहज शक्य आहे. मात्र याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरीही चिंंतेत पडले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे तत्काळ लक्ष देऊन कालवा दुरूस्तीची मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)