शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

तलाठ्यांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण

By admin | Updated: October 16, 2015 02:00 IST

उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि लोकसहभाग यांचा त्रिवेणी संगम असणाऱ्या माहिती अधिकाराची अंमलबजावणी ...

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन : जनतेसाठी कायद्याची अंमलबजावणी करा- आव्हाडगडचिरोली : उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि लोकसहभाग यांचा त्रिवेणी संगम असणाऱ्या माहिती अधिकाराची अंमलबजावणी करतांना आपण जनतेसाठी आहोत या भावनेची जाण ठेवणे आवश्यकता आहे, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात तलाठ्यांसाठी आयोजित माहिती अधिकार कायदा २०१५ च्या प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रशिक्षण कार्यशाळेला यशवंतराव चव्हाण विकास प्रशिक्षण प्रबोधिनी (यशदा) पुणे येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. सवीश पाटील, प्रदीप देशमुख, राजेंद्र पांडे, तहसीलदार कुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कायदा व्यावहारिक, सैध्दांतिक आणि नैतिकदृष्ट्या सक्षम असल्याने या कायद्यातून जनतेत मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण झाली आहे. असे आव्हाड याप्रसंगी पुढे म्हणाले. उद्घाटन सत्रात बोलतांना डॉ. पाटील यांनी या कायद्याच्या निर्मितीचा इतिहास सांगितला. कायदा अस्तित्वात येवून आता दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या कायद्याचा ग्रामीण भागात थेट संपर्क तलाठ्यांच्या यंत्रणेशी येतो त्यामुळे चळवळ गतिमान व्हावी, यासाठी सर्व तलाठ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जास्तीत जास्त माहिती अद्ययावत करुन ती जनतेसाठी उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. सोबतच स्वयंप्रेरणेने माहिती प्रसिध्द करण्याचे बंधन कायद्यानेच घातलेले आहे. म्हणून ही माहिती खुलेपणाने व पारदर्शी पध्दतीने उपलब्ध करुन द्यावी, असे ते म्हणाले. तलाठ्यांचे सलग दोन दिवस दोन सत्रात सदर प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणात जिल्ह्यातील १०० तलाठी सहभागी झाले. प्रास्ताविक डॉ. पाटील, संचालन नितीन राऊत यांनी केले. प्रशिक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नाझर मुडे व धनबाते यांनी परिश्रम घेतले.