शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

एमआयडीसीची जमीन परत करा

By admin | Updated: April 20, 2015 01:32 IST

एमआयडीसी स्थापन करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी अत्यंत कमी किंमतीत शासनाने अधिग्रहीत केल्या.

गडचिरोली : एमआयडीसी स्थापन करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी अत्यंत कमी किंमतीत शासनाने अधिग्रहीत केल्या. मात्र २६ वर्षांचा कालावधी उलटूनही याठिकाणी उद्योग स्थापन झाले नाही. त्यामुळे शासनाने एमआयडीसीच्या जमिनी संबंधित जुन्या शेतमालकांना परत कराव्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.उद्योगांना वाव मिळावा यासाठी १९८५ साली कोटगल मार्गावर एमआयडीसी स्थापन करण्यात आली. त्यासाठी ३६ शेतकऱ्यांच्या जमिनी अत्यंत कमी किंमतीत शासनाने अधिग्रहीत केल्या. सुपीक जमिनीला प्रतिहेक्टरी ३५ हजार व कोरडवाहू जमिनीला प्रतिहेक्टरी २५ हजार रूपये दिले. हा भाव काही शेतकऱ्यांना मान्य नसल्याने त्यापैकी आठ शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या निर्णयानुसार आठ शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव भाव मिळाला आहे. मात्र २९ शेतकऱ्यांनी शासनाकडे रितसर मागणी केली असता, त्यांना काहीच देण्यात आले नाही. या ठिकाणच्या जमिनी अत्यंत महागड्या आहेत. आजच्या स्थितीत एकरी ४० ते ५० लाख रूपये भाव मिळाला असता. मात्र शासनाला जमिन दिल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. जमिनी अधिग्रहीत केलेल्या शेतकरी कुटुंबातील एक व्यक्ती शासकीय सेवेत घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शासनाने हे आश्वासन पाळले नाही. एकीकडे शासन आदिवासी व दलित घटकांना जमीन वाटप करीत आहे. तर दुसरीकडे अत्यंत मौलीक जमीन पडीत पडून आहे. त्यामुळे सदर जमीन परत करण्याची मागणी वासुदेव भोयर, वासुदेव कोटगले, हिरालाल रामटेके, प्रभाकर कोटगले, सदाशिव भोयर, रमेश गेडाम यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी केली आहे. तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा दिला आहे. (नगर प्रतिनिधी)