शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

एमआयडीसीची जमीन परत करा

By admin | Updated: April 20, 2015 01:32 IST

एमआयडीसी स्थापन करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी अत्यंत कमी किंमतीत शासनाने अधिग्रहीत केल्या.

गडचिरोली : एमआयडीसी स्थापन करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी अत्यंत कमी किंमतीत शासनाने अधिग्रहीत केल्या. मात्र २६ वर्षांचा कालावधी उलटूनही याठिकाणी उद्योग स्थापन झाले नाही. त्यामुळे शासनाने एमआयडीसीच्या जमिनी संबंधित जुन्या शेतमालकांना परत कराव्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.उद्योगांना वाव मिळावा यासाठी १९८५ साली कोटगल मार्गावर एमआयडीसी स्थापन करण्यात आली. त्यासाठी ३६ शेतकऱ्यांच्या जमिनी अत्यंत कमी किंमतीत शासनाने अधिग्रहीत केल्या. सुपीक जमिनीला प्रतिहेक्टरी ३५ हजार व कोरडवाहू जमिनीला प्रतिहेक्टरी २५ हजार रूपये दिले. हा भाव काही शेतकऱ्यांना मान्य नसल्याने त्यापैकी आठ शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या निर्णयानुसार आठ शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव भाव मिळाला आहे. मात्र २९ शेतकऱ्यांनी शासनाकडे रितसर मागणी केली असता, त्यांना काहीच देण्यात आले नाही. या ठिकाणच्या जमिनी अत्यंत महागड्या आहेत. आजच्या स्थितीत एकरी ४० ते ५० लाख रूपये भाव मिळाला असता. मात्र शासनाला जमिन दिल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. जमिनी अधिग्रहीत केलेल्या शेतकरी कुटुंबातील एक व्यक्ती शासकीय सेवेत घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शासनाने हे आश्वासन पाळले नाही. एकीकडे शासन आदिवासी व दलित घटकांना जमीन वाटप करीत आहे. तर दुसरीकडे अत्यंत मौलीक जमीन पडीत पडून आहे. त्यामुळे सदर जमीन परत करण्याची मागणी वासुदेव भोयर, वासुदेव कोटगले, हिरालाल रामटेके, प्रभाकर कोटगले, सदाशिव भोयर, रमेश गेडाम यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी केली आहे. तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा दिला आहे. (नगर प्रतिनिधी)