शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

सुरजागड प्रकल्पात बाधा आणणाऱ्या नक्षली कारवायांना जशास तसे उत्तर द्या;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:41 IST

गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पाजवळील एका ५० वर्षीय व्यक्तीची सोमवारी हत्या करण्यात आली. या व्यक्तीच्या मृतदेहासोबत नक्षलवाद्यांनी एक चिठ्ठी ...

गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पाजवळील एका ५० वर्षीय व्यक्तीची सोमवारी हत्या करण्यात आली. या व्यक्तीच्या मृतदेहासोबत नक्षलवाद्यांनी एक चिठ्ठी लिहून, सुरजागड प्रकल्पाबद्दलचा असलेला विरोध प्रकट केला होता. या घटनेनंतर मंत्री शिंदे यांनी तातडीने ही बैठक घेऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. या मृत व्यक्तीचा सुरजागड प्रकल्पाशी कोणताही संबंध नसल्याचे यावेळी पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

सुरजागड लोहखनिज प्रकल्प उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून तो कार्यान्वित करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. त्यामुळे हा प्रकल्प राबविताना त्यात कुणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यास जशास तसे उत्तर द्या, असे यावेळी ना. शिंदे म्हणाले.

नक्षली कारवाया रोखण्यासाठी जिल्ह्यातील रस्ते आणि दळणवळण वेगाने सुधारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. त्यासाठी या भागातील रस्त्यांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यासोबतच हा प्रकल्प उभा करताना कंपनीतर्फे स्थानिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, प्रशिक्षण केंद्र यांचे काम नीट सुरू आहे अथवा नाही, याबाबतचा आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.

या बैठकीला गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीना, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

(बॉक्स)

सुरजागड हा छत्तीसगडी नक्षलींचा मार्ग

पोलिसांनी गस्त घालताना पुरेशी काळजी घ्यावी, अशी सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केली. तसेच सुरजागड आउटपोस्टच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला. यावर पोलीस अधीक्षकांनी, या भागात पूर्ण गस्त असून नक्षलवाद्यांच्या बारीकसारीक हालचालींवर लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुरजागड हा छत्तीसगडमधून महाराष्ट्रात येण्याचा नक्षलवाद्यांचा पारंपरिक मार्ग आहे. तरीही तिथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे यावेळी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले.

(बॉक्स)

वाघाचा बंदोबस्त तातडीने करा

- जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या नरभक्षक वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. यासाठी 'वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया'सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेची मदत घेण्याची सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली.

- जिल्ह्यात नरभक्षक वाघाने केलेल्या हल्ल्यात १७ नागरिकांचा मृत्यू झाला असून ५०० पेक्षा अधिक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. जिल्हा प्रशासन आणि वन विभागाकडून त्या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्यापही तो वाघ सापडला नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

(बॉक्स)

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना

वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाच्या चमूत पशुवैद्यकीय अधिकारी, शास्त्रज्ञ, बायोलॉजिस्ट आशा तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असतो. त्यांच्या माध्यमातून नरभक्षक वाघाचा शास्त्रोक्त पद्धतीने शोध घेऊन भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी दीर्घकालीन उपाय करण्यात येणार असल्याचे यावेळी पालकमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.