शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

सुरजागड प्रकल्पात बाधा आणणाऱ्या नक्षली कारवायांना जशास तसे उत्तर द्या;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:41 IST

गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पाजवळील एका ५० वर्षीय व्यक्तीची सोमवारी हत्या करण्यात आली. या व्यक्तीच्या मृतदेहासोबत नक्षलवाद्यांनी एक चिठ्ठी ...

गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्पाजवळील एका ५० वर्षीय व्यक्तीची सोमवारी हत्या करण्यात आली. या व्यक्तीच्या मृतदेहासोबत नक्षलवाद्यांनी एक चिठ्ठी लिहून, सुरजागड प्रकल्पाबद्दलचा असलेला विरोध प्रकट केला होता. या घटनेनंतर मंत्री शिंदे यांनी तातडीने ही बैठक घेऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. या मृत व्यक्तीचा सुरजागड प्रकल्पाशी कोणताही संबंध नसल्याचे यावेळी पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

सुरजागड लोहखनिज प्रकल्प उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून तो कार्यान्वित करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. त्यामुळे हा प्रकल्प राबविताना त्यात कुणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्यास जशास तसे उत्तर द्या, असे यावेळी ना. शिंदे म्हणाले.

नक्षली कारवाया रोखण्यासाठी जिल्ह्यातील रस्ते आणि दळणवळण वेगाने सुधारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. त्यासाठी या भागातील रस्त्यांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यासोबतच हा प्रकल्प उभा करताना कंपनीतर्फे स्थानिकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, प्रशिक्षण केंद्र यांचे काम नीट सुरू आहे अथवा नाही, याबाबतचा आढावा घेण्याच्या सूचनाही त्यांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.

या बैठकीला गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय मीना, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

(बॉक्स)

सुरजागड हा छत्तीसगडी नक्षलींचा मार्ग

पोलिसांनी गस्त घालताना पुरेशी काळजी घ्यावी, अशी सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केली. तसेच सुरजागड आउटपोस्टच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला. यावर पोलीस अधीक्षकांनी, या भागात पूर्ण गस्त असून नक्षलवाद्यांच्या बारीकसारीक हालचालींवर लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुरजागड हा छत्तीसगडमधून महाराष्ट्रात येण्याचा नक्षलवाद्यांचा पारंपरिक मार्ग आहे. तरीही तिथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे यावेळी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले.

(बॉक्स)

वाघाचा बंदोबस्त तातडीने करा

- जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेल्या नरभक्षक वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे निर्देश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. यासाठी 'वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया'सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेची मदत घेण्याची सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली.

- जिल्ह्यात नरभक्षक वाघाने केलेल्या हल्ल्यात १७ नागरिकांचा मृत्यू झाला असून ५०० पेक्षा अधिक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. जिल्हा प्रशासन आणि वन विभागाकडून त्या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्यापही तो वाघ सापडला नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

(बॉक्स)

मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना

वाईल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाच्या चमूत पशुवैद्यकीय अधिकारी, शास्त्रज्ञ, बायोलॉजिस्ट आशा तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असतो. त्यांच्या माध्यमातून नरभक्षक वाघाचा शास्त्रोक्त पद्धतीने शोध घेऊन भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी दीर्घकालीन उपाय करण्यात येणार असल्याचे यावेळी पालकमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.