शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
4
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
5
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
6
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
7
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
8
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
9
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
10
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
11
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
12
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
13
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
14
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
15
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
16
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
17
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
18
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
19
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
20
कोल्हापुरातील शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट! शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

लोकप्रतिनिधी लॉयड्सच्या दलालासारखे वागतात

By admin | Updated: May 27, 2017 01:21 IST

गेल्या तीन वर्षात भाजप सरकारने नवीन कामांना मंजुरी देण्याऐवजी काँग्रेसच्या काळात मंजुर झालेल्या कामांचे लोकार्पण करण्याचेच काम केले आहे.

उसेंडी यांचा आरोप : काँग्रेसच्या कार्यकाळातील कामांचे आता करताहेत लोकार्पण लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गेल्या तीन वर्षात भाजप सरकारने नवीन कामांना मंजुरी देण्याऐवजी काँग्रेसच्या काळात मंजुर झालेल्या कामांचे लोकार्पण करण्याचेच काम केले आहे. शेतकऱ्यांना धोका देऊन हे सरकार केवळ उद्योगपतींचे हित जोपासत आहे. लॉयड्स मेटल्ससाठी वनकायदा धाब्यावर बसविण्यात आला. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी लॉयड्सचे दलाल असल्यासारखे वागतात, असा आरोप काँग्र्र्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांनी पत्रपरिषदेत केला. शुक्रवारी गडचिरोलीत आयोजित पत्रपरिषदेत डॉ.उसेंडी यांनी भाजप सरकारचा कार्यकाळ आणि काँग्रेसबद्दल केल्या गेलेला अपप्रचार याचा पंचनामा केला. काँग्रेसने भ्रष्टाचार केल्याचा गवगवा भाजपने सतत केला. पण गेल्या तीन वर्षात भ्रष्टाचार करणाऱ्यांना गजाआड का केले नाही? असा सवाल उसेंडी यांनी केला. गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात सिंचनाचा कोणताही नवीन प्रकल्प मंजूर केला नाही. जे आधी मंजूर झाले त्यांनाही पुरेसा निधी दिला नाही. शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सिंचन प्रकल्पांसाठी वनकायद्याची अडचण दाखविली जाते. गोंडवाना विद्यापाठीसाठी वनविभागाची जमीन उपलब्ध करून दिली नाही. स्टेडियमसाठीही तीच अडचण दाखविली आहे. पण लॉयड्स मेटल्सला सूरजागडमध्ये उत्खनन करू देण्यासाठी शेकडो वृक्षांची कटाई केली जाते. त्यावेळी मात्र वनकायद्याची अडचण येत नाही. त्यामुळे हे सरकार शेतकरीधार्जिणे नसून उद्योगपतींना धार्जिणे आहेत, असा आरोप उसेंडी यांनी केला. जिल्ह्यात ११ लाख हेक्टर (७८ टक्के) वनजमीन आहे. त्यापैकी अर्धा टक्का जमीन जरी दिली तरी सिंचन प्रकल्प पूर्ण होतील असे उसेंडी म्हणाले. गेल्या तीन वर्षात या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतले नाही. त्यांना कोणतीही मदत दिलेली नाही. एवढेच नाही निवडणूक प्रचारात शेतमालाला दीड पट भाव देण्याच्या थापा मारणाऱ्यांनी आधीच्या सरकारने दिलेले शेतमालाचे हमीभावही कमी केले. काँग्र्रेसच्या कार्यकाळातील अनेक निर्णयांना त्यावेळी विरोध केला पण सत्तेत आल्यानंतर त्याच निर्णयांची अंमलबजावणी केल्याचे उसेंडी म्हणाले. या पत्रपरिषदेला काँग्रेसचे पदाधिकारी हसनभाई गिलाणी, पी.टी.मसरान, नगरसेवक सतीश विधाते, प्रभाकर वासेकर, काशिनाथ भडके, समशेरखा पठाण, रजनिकांत मोटघरे, कुणाल पेंदोरकर आदी उपस्थित होते. प्रकल्प उभारल्याशिवाय उत्खनन कसे? ज्या कोसनरीत मुख्यमंत्र्यांनी लॉयड्स मेटल प्रकल्पाची कोनशिला ठेवली त्या ठिकाणी हा प्रकल्प सुरू होणार की नाही, याबद्दल साशंकता आहे. मुळात प्रकल्प उभारणी केल्याशिवाय उत्खननाची परवानगी देणेच गैर आहे. असे असताना लॉयड्सकडून उत्खनन कसे सुरू आहे? असा सवाल करीत हे उत्खनन बंद पाडण्यासाठी आम्ही रस्त्यावरून उतरून आंदोलन करू, असा इशारा उसेंडी यांनी दिला.