शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
2
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
3
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
4
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
5
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
6
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
7
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
8
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
9
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
10
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
11
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
12
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
13
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
14
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
15
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
16
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
17
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
18
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
19
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

‘ती’ वाघीण नरभक्षक नसल्याचा समितीचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:48 IST

देसाईगंज व आरमोरी तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या वाघीणीला वन विभागाने जेरबंद केल्यानंतर नागपुर येथील गोरेवाडा येथे हलविण्यात आले.

ठळक मुद्देवाघाला पकडणार : कोढाळा जंगलात केले होते जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईग्ांज : देसाईगंज व आरमोरी तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या वाघीणीला वन विभागाने जेरबंद केल्यानंतर नागपुर येथील गोरेवाडा येथे हलविण्यात आले. वनविभागााने पकडलेली वाघीण नरभक्षक आहे किंवा नाही याची शहानिशा करण्यासाठी तज्ज्ञाची समिती ठरविण्यात आली होती. या समितीने जेरबंद केलेली वाघीण नरभक्षक नसल्याचे समितीने ठरविले आहे. यामुळे परिसरात मानवाची शिकार केलेल्या वाघाला पकडण्यासाठी पुन्हा वनविभागाला प्रयत्न करावे लागणार आहेत.देसाईग्ांज तालुक्यातील कोंढाळा व आरमोरी तालुक्यातील रवी व आरसोडा या भागात नरभक्षक वाघाने दोन नागरिक व पाळीव जनावरांची शिकार केल्यामुळे संपूर्ण परीसर वाघाच्या दहशतीत होते. वाघ पकडण्यासाठी वनविभागाने सर्वप्रकारचे प्रयत्न चालविले होते. वन विभागाच्या सततच्या प्रयत्नाअंती १२ आॅगस्ट रोजी वाघाला पकडण्यात यश प्राप्त झाले. मात्र पकडलेला वाघ नसुन वाघीन असल्याचे स्पष्ट झाले. परिसरात नर व मादा वाघ असल्याचे वनविभागाने आधिच स्पष्ट केले होते. पकडलेल्या वाघीणीला वनविभागाने नागपूर येथील गोरेवाडा पाठविण्यात आले. वाघीनीची देखरेख करण्यासाठी राज्य स्तरीय समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये नागपूर येथील पशुवैद्यकिय महाविद्यालयाचे सहा प्रमुख डॉ.एन.एन. झाडे, उपविभागीय वनअधिकारी एस.बी. फुले, उत्तम सावंत, जी. के वशिष्ठ, नंदकिशोर काळे, सामपुडा फाउंडेशनचे प्रमुख किशोर रिठे, डॉ. विनोद धुत, डॉ.ए. डी. कलकुटे आणि जिल्हा वन्यजीव अधीक्षक कुंदन हाटे समितीत होते. स्थापन केलेल्या समितीने वाघीनी बाबतचा अहवाल राज्य शासनाकडे सादर केला आहे. अहवालात जेरबंद केलेली वाघीण उत्तम अवस्थेत असून तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडले जावे तसेच ती नरभक्षक नसल्याचे देखील अहवालात नमुद करण्यात आले आहे. देसाईग्ांज व आरमोरी तालुक्यात वाघाने लवाजी मेश्राम व वामन मराप्पा यांना वाघाने ठार केले. त्यामुळे शिकार केलेल्या ईसमांना वाघाने मारले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाघीणीला पकडण्यासाठी वनविभागाला दोन महिन्याचा कालावधी लागला होता. आता पुन्हा वाघाला पकडण्यासाठी लागणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. नरभक्षक वाघ रवी गावाच्या जंगलात कायम असल्याने या वाघाकडून नागरिकांवर आणखी हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.