शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
4
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
5
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
6
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
7
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
8
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
9
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
10
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
11
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
12
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
13
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
14
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
15
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
16
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
17
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
18
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
19
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
20
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल

३० वर्षांनंतर कार्यालय इमारतींची दुरूस्ती

By admin | Updated: December 30, 2014 23:35 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर असलेल्या बॅरेकमधील इमारतींच्या दुरूस्तीचे काम सुमारे ३० वर्षानंतर पहिल्यांदाच हाती घेण्यात आले आहे.

गडचिरोली : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर असलेल्या बॅरेकमधील इमारतींच्या दुरूस्तीचे काम सुमारे ३० वर्षानंतर पहिल्यांदाच हाती घेण्यात आले आहे. जिल्हा निर्मितीनंतर गडचिरोली येथे अनेक शासकीय कार्यालये निर्माण करण्यात आली. मात्र प्रत्येकच शासकीय कार्यालयाला सुसज्ज इमारत बांधून देणे अशक्य होते. त्यामुळे शासनाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर मोठमोठे चार बॅरेक बांधले. या इमारतींमध्ये जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, अन्न व औषध प्रशासन विभाग, जिल्हा माहिती कार्यालय, रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा दुग्ध कार्यालय, राज्य शासनाचा पाणीपुरवठा विभाग, नगर रचना कार्यालय आदी जवळपास २० ते २५ कार्यालये या ठिकाणी स्थापन करण्यात आले. सदर इमारतींचे बांधकाम १९८३ ते १९८५ या कालावधीत करण्यात आले. शासकीय खर्च वाचविण्यासाठी या इमारतींवर सिमेंटने बनलेले पत्रे टाकण्यात आले. ३० वर्षांमध्ये छतावरील पत्रे अनेक ठिकाणी तुटले होते. त्यामुळे पावसाचे पाणी कार्यालयामध्ये गळत असल्याने येथील कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. त्याचबरोबर महत्वाचे दस्ताऐवजही खराब होण्याला सुरूवात झाली होती. त्यामुळे या बॅरेकची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिक व या कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांकडून शासनाकडे करण्यात येत होती. मात्र चारही बॅरेकच्या दुरूस्तीसाठी लाखो रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याने शासनाकडून दुरूस्तीसाठी दुर्लक्ष केले जात होते. दस्ताऐवजाला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन शासनाने सदर बॅरेकच्या दुरूस्तीसाठी निधी मंजूर केला आहे. त्यातून या बॅरेकच्या दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. या बॅरेकमधील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय असलेले पहिले बॅरेक असून याच बॅरेकपासून दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. जुने पत्रे बदलवून त्या ठिकाणी नवीन पत्रे टाकण्यात येत आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणचे आडे मोडले असून सदर आडेही बदलविले जात आहेत. आजपर्यंत गळत्या छताखाली नागरिकांची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. कार्पोरेट लूकप्रमाणे सदर कार्यालय दिसणार नाही. मात्र ऊन, वारा, पाऊस यापासून किमान संरक्षण होणार आहे. त्यामुळे कार्यालयाच्या दुरूस्तीचे काम त्वरेने पूर्ण करण्याची मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)