शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

३० वर्षांनंतर कार्यालय इमारतींची दुरूस्ती

By admin | Updated: December 30, 2014 23:35 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर असलेल्या बॅरेकमधील इमारतींच्या दुरूस्तीचे काम सुमारे ३० वर्षानंतर पहिल्यांदाच हाती घेण्यात आले आहे.

गडचिरोली : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर असलेल्या बॅरेकमधील इमारतींच्या दुरूस्तीचे काम सुमारे ३० वर्षानंतर पहिल्यांदाच हाती घेण्यात आले आहे. जिल्हा निर्मितीनंतर गडचिरोली येथे अनेक शासकीय कार्यालये निर्माण करण्यात आली. मात्र प्रत्येकच शासकीय कार्यालयाला सुसज्ज इमारत बांधून देणे अशक्य होते. त्यामुळे शासनाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर मोठमोठे चार बॅरेक बांधले. या इमारतींमध्ये जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, अन्न व औषध प्रशासन विभाग, जिल्हा माहिती कार्यालय, रोजगार व स्वयंरोजगार कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा दुग्ध कार्यालय, राज्य शासनाचा पाणीपुरवठा विभाग, नगर रचना कार्यालय आदी जवळपास २० ते २५ कार्यालये या ठिकाणी स्थापन करण्यात आले. सदर इमारतींचे बांधकाम १९८३ ते १९८५ या कालावधीत करण्यात आले. शासकीय खर्च वाचविण्यासाठी या इमारतींवर सिमेंटने बनलेले पत्रे टाकण्यात आले. ३० वर्षांमध्ये छतावरील पत्रे अनेक ठिकाणी तुटले होते. त्यामुळे पावसाचे पाणी कार्यालयामध्ये गळत असल्याने येथील कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. त्याचबरोबर महत्वाचे दस्ताऐवजही खराब होण्याला सुरूवात झाली होती. त्यामुळे या बॅरेकची दुरूस्ती करण्याची मागणी नागरिक व या कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांकडून शासनाकडे करण्यात येत होती. मात्र चारही बॅरेकच्या दुरूस्तीसाठी लाखो रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याने शासनाकडून दुरूस्तीसाठी दुर्लक्ष केले जात होते. दस्ताऐवजाला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन शासनाने सदर बॅरेकच्या दुरूस्तीसाठी निधी मंजूर केला आहे. त्यातून या बॅरेकच्या दुरूस्तीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. या बॅरेकमधील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय असलेले पहिले बॅरेक असून याच बॅरेकपासून दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. जुने पत्रे बदलवून त्या ठिकाणी नवीन पत्रे टाकण्यात येत आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणचे आडे मोडले असून सदर आडेही बदलविले जात आहेत. आजपर्यंत गळत्या छताखाली नागरिकांची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. कार्पोरेट लूकप्रमाणे सदर कार्यालय दिसणार नाही. मात्र ऊन, वारा, पाऊस यापासून किमान संरक्षण होणार आहे. त्यामुळे कार्यालयाच्या दुरूस्तीचे काम त्वरेने पूर्ण करण्याची मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)